शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

तीन मंत्र्यांनी जनतेचा आवाज दडपला

By admin | Updated: August 24, 2014 22:36 IST

संजय पाटील : भिलवडी येथे स्वाभिमानीच्या मेळाव्यात प्रतिपादन

भिलवडी : गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील या तीन मंत्र्यांनी खुर्च्या सांभाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सामान्य जनतेचा आवाज दडपलाय. लाल दिव्याच्या गाड्या टिकविण्यासाठी तिघांनी जिल्ह्याचे राजकारण मॅच फिक्सिंगचा धंदा बनवून टाकले असल्याची टीका खासदार संजय पाटील यांनी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने भिलवडी येथे आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. राजू शेट्टी होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील, स्वाभिमानीचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा उपस्थित होते.खा. पाटील म्हणाले की, गृहमंत्र्यांना तासगाव कारखान्याच्या माध्यमातून माझी बदनामी करून मला राजकारणातून संपवायचे होते, तर वनमंत्र्यांना हा कारखाना बंद पाडून सोनहिरा व स्वत:चे दोन कारखाने चांगले चालवून तासगाव कारखाना गिळंकृत करायचा होता. मी पाप केले असते तर माझा मीच संपलो असतो. हिंमत असेल तर दोघांनी एकाच व्यासपीठावर येऊन तासगाव कारखानाप्रश्नी जनता दरबारासमोर चर्चा करावी.राजू शेट्टी म्हणाले, सामाजिक काम करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, सतीश शेट्टी यांची हत्या करणाऱ्यांचा शोध लावू न शकणारे आर. आर. पाटील सर्वात दुबळे व हतबल गृहमंत्री आहेत. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना आलेली सत्तेची मस्ती उतरण्याची वेळ आली आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रवक्ते महेश खराडे, बी. जी. पाटील, सयाजी मोरे, सावकार मदनाईक, बाबूराव मगदूम, महादेव महिंद, महावीर चौगुले, तानाजी भोई, विनोद वाळवेकर, महावीर नवले, उपस्थित होते. (वार्ताहर)