शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन मंत्र्यांनी जनतेचा आवाज दडपला

By admin | Updated: August 24, 2014 22:36 IST

संजय पाटील : भिलवडी येथे स्वाभिमानीच्या मेळाव्यात प्रतिपादन

भिलवडी : गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील या तीन मंत्र्यांनी खुर्च्या सांभाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सामान्य जनतेचा आवाज दडपलाय. लाल दिव्याच्या गाड्या टिकविण्यासाठी तिघांनी जिल्ह्याचे राजकारण मॅच फिक्सिंगचा धंदा बनवून टाकले असल्याची टीका खासदार संजय पाटील यांनी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने भिलवडी येथे आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. राजू शेट्टी होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील, स्वाभिमानीचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा उपस्थित होते.खा. पाटील म्हणाले की, गृहमंत्र्यांना तासगाव कारखान्याच्या माध्यमातून माझी बदनामी करून मला राजकारणातून संपवायचे होते, तर वनमंत्र्यांना हा कारखाना बंद पाडून सोनहिरा व स्वत:चे दोन कारखाने चांगले चालवून तासगाव कारखाना गिळंकृत करायचा होता. मी पाप केले असते तर माझा मीच संपलो असतो. हिंमत असेल तर दोघांनी एकाच व्यासपीठावर येऊन तासगाव कारखानाप्रश्नी जनता दरबारासमोर चर्चा करावी.राजू शेट्टी म्हणाले, सामाजिक काम करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, सतीश शेट्टी यांची हत्या करणाऱ्यांचा शोध लावू न शकणारे आर. आर. पाटील सर्वात दुबळे व हतबल गृहमंत्री आहेत. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना आलेली सत्तेची मस्ती उतरण्याची वेळ आली आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रवक्ते महेश खराडे, बी. जी. पाटील, सयाजी मोरे, सावकार मदनाईक, बाबूराव मगदूम, महादेव महिंद, महावीर चौगुले, तानाजी भोई, विनोद वाळवेकर, महावीर नवले, उपस्थित होते. (वार्ताहर)