शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये मिळणार शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या सुरू असलेल्या निर्बंधांची एक जूनला मुदत संपणार असल्याने ...

सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या सुरू असलेल्या निर्बंधांची एक जूनला मुदत संपणार असल्याने त्यानंतर शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांची संख्या स्थिर राहिल्याने हा निर्णय होऊ शकतो. मात्र, राज्य शासनाच्या नियमावलीवरच कितपत शिथिलता द्यायची हे ठरणार आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. बाधितांची संख्या वाढतच चालल्याने लॉकडाऊनला चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. आता एक जूनला त्याची मुदत संपणार आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर आहे. दररोज सरासरी एक हजार ते बाराशे रूग्ण आढळून येत आहेत, तर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर २८ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आला आहे. यापेक्षाही कमी प्रमाण आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पॉझिटिव्हिटी दर व मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे सध्या जिल्हा ‘रेड झोन’मध्ये असला तरीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा विचार सुरू आहे.

पालकमंत्री जयंत पाटील यांनीही याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देश दिले असले तरी पॉझिटिव्हिटीचा टक्का, मृत्यू संख्येतील वाढ हे मुद्दे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. मात्र, लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत मागणी वाढत असल्याने योग्य त्या उपाययोजना राबवून दिलासा देण्याचा निर्णय होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. राज्य शासनाने याबाबत घेतलेल्या निर्णयांचीच अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

कोट

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात राज्य शासन जे निर्देश देईल। त्याचे पालन करण्यात येणार आहे. शासनाने याबाबत सुधारित आदेश दिल्यास त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येणार आहे.

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी.