शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माणूस जोडण्याइतकी दुसरी श्रीमंती नाही

By admin | Updated: June 28, 2016 00:37 IST

तारा भवाळकर : वाळव्यात क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी स्मृतिदिनी अभिवादन

वाळवा : आपल्याला संपत्तीचा वारसा पुढे न्यायचा नसतो, तर गुणांचा वारसा पुढे न्यायचा असतो. माणूस जोडण्याइतकी मोठी श्रीमंती जगात दुसरी कुठलीही नाही, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. तारा भवाळकर यांनी सोमवारी केले.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा यांच्यावतीने आयोजित क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी (आईसाहेब) यांच्या २७ व्या स्मृतिदिन समारंभ सभेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी होते. कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, हुतात्मा दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, जयवंत अहिर, कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस प्रमुख उपस्थित होते. डॉ. भवाळकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील क्रांतिकारकांची जी नोंद इतिहासात व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. त्याचा एक सलग इतिहास आपल्या महाराष्ट्राला आवश्यक आहे. सध्या इतिहासाची मोठी उलथापालथ होत आहे. मात्र ग्रामीण क्रांतिकारकांच्या नोंदींचा सलग एक इतिहास व्हायला पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा आणि क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी (आईसाहेब) यांचा इतिहास समाजासमोर आला पाहिजे.प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, मोठ्या माणसांची स्मारके ही लोकांच्या हृदयात उभी करायची असतात. ती दगड-धोंड्यात उभी करायची नसतात. मुलींनी बुद्धिमान, चारित्र्यसंपन्न असले पाहिजे. क्रांतिमाता लक्ष्मीबाई (आईसाहेब) यांच्यासारखे निर्भय असले पाहिजे. न शिकलेली माणसेही अनुभवाने समृद्ध असतात. जगातली कुठलीही शक्ती माझ्यावर अन्याय करू लागली, तर मी त्याविरुद्ध लढेन, ही क्रांतिकारी शक्ती आजच्या मुलींमध्ये असली पाहिजे.वैभव नायकवडी म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी कारावासही भोगला. पण स्वातंत्र्यानंतर त्या स्वातंत्र्यसैनिक म्हणून कुठेही मिरवत बसल्या नाहीत. आपल्याला इतिहास माहिती नसेल, तर आपण वर्तमानात काय करणार व भविष्य तरी काय घडविणार? हा मोठा प्रश्न आहे.लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. राजा माळी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके यांनी आभार मानले.कार्यक्रमास सरपंच गौरव नायकवडी, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, हुतात्मा बॅँकेचे अध्यक्ष किरणदादा नायकवडी, बी. आर. थोरात, यशवंत बाबर, सावकर कदम, नंदू पाटील, विशाखा कदम, व्ही. डी. वाजे, पोपट फाटक, दीपक पाटील, जयकर चव्हाण, सुरेश होरे, मुख्याध्यापक एस. पी. होरे, प्रा. मधुकर वायदंडे, अनिल शेजाळे उपस्थित होते. (वार्ताहर)