शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

माणूस जोडण्याइतकी दुसरी श्रीमंती नाही

By admin | Updated: June 28, 2016 00:37 IST

तारा भवाळकर : वाळव्यात क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी स्मृतिदिनी अभिवादन

वाळवा : आपल्याला संपत्तीचा वारसा पुढे न्यायचा नसतो, तर गुणांचा वारसा पुढे न्यायचा असतो. माणूस जोडण्याइतकी मोठी श्रीमंती जगात दुसरी कुठलीही नाही, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. तारा भवाळकर यांनी सोमवारी केले.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा यांच्यावतीने आयोजित क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी (आईसाहेब) यांच्या २७ व्या स्मृतिदिन समारंभ सभेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी होते. कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, हुतात्मा दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, जयवंत अहिर, कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस प्रमुख उपस्थित होते. डॉ. भवाळकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील क्रांतिकारकांची जी नोंद इतिहासात व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. त्याचा एक सलग इतिहास आपल्या महाराष्ट्राला आवश्यक आहे. सध्या इतिहासाची मोठी उलथापालथ होत आहे. मात्र ग्रामीण क्रांतिकारकांच्या नोंदींचा सलग एक इतिहास व्हायला पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा आणि क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी (आईसाहेब) यांचा इतिहास समाजासमोर आला पाहिजे.प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, मोठ्या माणसांची स्मारके ही लोकांच्या हृदयात उभी करायची असतात. ती दगड-धोंड्यात उभी करायची नसतात. मुलींनी बुद्धिमान, चारित्र्यसंपन्न असले पाहिजे. क्रांतिमाता लक्ष्मीबाई (आईसाहेब) यांच्यासारखे निर्भय असले पाहिजे. न शिकलेली माणसेही अनुभवाने समृद्ध असतात. जगातली कुठलीही शक्ती माझ्यावर अन्याय करू लागली, तर मी त्याविरुद्ध लढेन, ही क्रांतिकारी शक्ती आजच्या मुलींमध्ये असली पाहिजे.वैभव नायकवडी म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी कारावासही भोगला. पण स्वातंत्र्यानंतर त्या स्वातंत्र्यसैनिक म्हणून कुठेही मिरवत बसल्या नाहीत. आपल्याला इतिहास माहिती नसेल, तर आपण वर्तमानात काय करणार व भविष्य तरी काय घडविणार? हा मोठा प्रश्न आहे.लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. राजा माळी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके यांनी आभार मानले.कार्यक्रमास सरपंच गौरव नायकवडी, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, हुतात्मा बॅँकेचे अध्यक्ष किरणदादा नायकवडी, बी. आर. थोरात, यशवंत बाबर, सावकर कदम, नंदू पाटील, विशाखा कदम, व्ही. डी. वाजे, पोपट फाटक, दीपक पाटील, जयकर चव्हाण, सुरेश होरे, मुख्याध्यापक एस. पी. होरे, प्रा. मधुकर वायदंडे, अनिल शेजाळे उपस्थित होते. (वार्ताहर)