शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहावीचे ४०८४४ विद्यार्थी थेट अकरावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ...

सांगली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल. यामुळे जिल्ह्यातील ४० हजार ८४४ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, परीक्षा रद्दच्या निर्णयावर काही पालक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून मुलांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नववी आणि अकरावीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ऑनलाइन वर्गात ५० ते ६० टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. तेवढ्यात नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट वरच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे दरम्यान होणार होती. विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होता. तोपर्यंत ती परीक्षाही रद्दचा निर्णय झाला. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. सर्व बोर्डांच्या निर्णयामध्ये समानता राहावी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल.

काही पालक आणि शिक्षकांना हा निर्णय रुचलेला नाही. इतर वर्गाचे ठीक आहे; पण दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय चुकीचा आहे. या विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष असते, त्यांचे योग्य मूल्यमापन होणार नाही, अशी भीती ते व्यक्त करतात.

चौकट

बारावीची परीक्षा मे महिन्यात

बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिलपासून सुरू होणार होती. जिल्ह्यात ३३ हजार ९० विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. परीक्षा दोन दिवसांवर आली असताना पुढे ढकलण्यात आली आहे. ती मेच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.