शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

जिल्ह्यातील दहावीचे ४०८४४ विद्यार्थी थेट अकरावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ...

सांगली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिली ते आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल. यामुळे जिल्ह्यातील ४० हजार ८४४ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, परीक्षा रद्दच्या निर्णयावर काही पालक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून मुलांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नववी आणि अकरावीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ऑनलाइन वर्गात ५० ते ६० टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. तेवढ्यात नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट वरच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे दरम्यान होणार होती. विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होता. तोपर्यंत ती परीक्षाही रद्दचा निर्णय झाला. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. सर्व बोर्डांच्या निर्णयामध्ये समानता राहावी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल.

काही पालक आणि शिक्षकांना हा निर्णय रुचलेला नाही. इतर वर्गाचे ठीक आहे; पण दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय चुकीचा आहे. या विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष असते, त्यांचे योग्य मूल्यमापन होणार नाही, अशी भीती ते व्यक्त करतात.

चौकट

बारावीची परीक्षा मे महिन्यात

बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिलपासून सुरू होणार होती. जिल्ह्यात ३३ हजार ९० विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. परीक्षा दोन दिवसांवर आली असताना पुढे ढकलण्यात आली आहे. ती मेच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.