शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

...तर माणगंगेकाठची सात लाख हेक्टर शेती ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

अविनाश बाड आटपाडी : नैसर्गिक उताराने कृष्णा नदीचे पाणी माणगंगा नदीत आल्याने एकदा योजना पूर्णत्वास आला की पुन्हा वीजबिल ...

अविनाश बाड

आटपाडी : नैसर्गिक उताराने कृष्णा नदीचे पाणी माणगंगा नदीत आल्याने एकदा योजना पूर्णत्वास आला की पुन्हा वीजबिल किंवा कोणताही खर्च नाही. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा उपसा सिंचन योजनांच्या मोटारी बुडतात; पण या योजनेत बोगद्याने मोठ्या प्रमाणात, शून्य खर्चात दरवर्षी कृष्णा नदीचे पाणी उताराने माणगंगा नदीत सोडता येणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात दुष्काळी भागात पाणी आले, तर माणगंगा नदीकाठावरील सात लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. याशिवाय माणगंगा नदीबरोबर पिंगळी, येरळा, अग्रणी या नद्या ही प्रवाहीत होतील.

या प्रकल्पाच्या बोगद्याचा व्यास जितका मोठा, तितके पुराचे पाणी दुष्काळी भागात अधिक मोठ्या प्रमाणात येईल आणि कृष्णा काठावरील हानी टळणार आहे. धोम धरणावरून काढलेल्या बोगद्याला वडूज (जि. सातारा) जवळच्या लेंढूर ओढ्याजवळ येरळवाडी तलावात पाणी सोडल्यास ते पुढे येरळा नदीला मिळते. याशिवाय अग्रणी नदीही या प्रकल्पात प्रवाही करता येईल.

या प्रकल्पासाठी धोम धरण ते पिंगळी या बोगद्याची जागा वगळता कुठे जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार नाही. कुठेही पंपाने पाणी उचलावे लागत नसल्याने विजेचा प्रश्न नाही. गोंदवले बुद्रुकपासून ते माणगंगा नदीचा भीमा नदीच्या संगमापर्यंत सुमारे १६५ कि. मी. अंतरावरील नदीवर असणारे सर्व बंधारे, तलावांना पाणी मिळेल.

चौकट

इंग्रजांची चूक आपण दुरुस्त करू!

इंग्रजांनी १८८२ मध्ये बांधलेल्या राजेवाडी तलावाचे पाणी थेट सोलापूर जिल्ह्यातील शेतीला बोगदे आणि कालव्याने नेले. ते बोगदे आणि कालवे अद्याप सुस्थितीत आहेत. मात्र राजेवाडी तलावात पाणी नसते. या योजनेद्वारे या तलावात पाणी सोडल्यास सोलापूर जिल्ह्यात कालव्याद्वारे आणि तलावातून माणगंगा नदीत पाणी सोडून इंग्रजांनी केलेला अन्याय आपण दूर करू शकतो.

कोट

कृष्णा नदीवर नैसर्गिक उताराने पाणी नेणारी अशी दुसरी योजना नाही. कोयनेवर लेकटॅपिंग करून वीजनिर्मिती केल्यानंतर जे पाणी उताराने समुद्राकडे जाते, तशी ही योजना दुष्काळी भागाकडे त्या भागातील कोरड्या नदीने जाते. केंद्रीय जल आयोगाने या योजनेला मान्यता दिली आहे.

- दिनकर पवार, निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग.