शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...तर माणगंगेकाठची सात लाख हेक्टर शेती ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

अविनाश बाड आटपाडी : नैसर्गिक उताराने कृष्णा नदीचे पाणी माणगंगा नदीत आल्याने एकदा योजना पूर्णत्वास आला की पुन्हा वीजबिल ...

अविनाश बाड

आटपाडी : नैसर्गिक उताराने कृष्णा नदीचे पाणी माणगंगा नदीत आल्याने एकदा योजना पूर्णत्वास आला की पुन्हा वीजबिल किंवा कोणताही खर्च नाही. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा उपसा सिंचन योजनांच्या मोटारी बुडतात; पण या योजनेत बोगद्याने मोठ्या प्रमाणात, शून्य खर्चात दरवर्षी कृष्णा नदीचे पाणी उताराने माणगंगा नदीत सोडता येणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात दुष्काळी भागात पाणी आले, तर माणगंगा नदीकाठावरील सात लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. याशिवाय माणगंगा नदीबरोबर पिंगळी, येरळा, अग्रणी या नद्या ही प्रवाहीत होतील.

या प्रकल्पाच्या बोगद्याचा व्यास जितका मोठा, तितके पुराचे पाणी दुष्काळी भागात अधिक मोठ्या प्रमाणात येईल आणि कृष्णा काठावरील हानी टळणार आहे. धोम धरणावरून काढलेल्या बोगद्याला वडूज (जि. सातारा) जवळच्या लेंढूर ओढ्याजवळ येरळवाडी तलावात पाणी सोडल्यास ते पुढे येरळा नदीला मिळते. याशिवाय अग्रणी नदीही या प्रकल्पात प्रवाही करता येईल.

या प्रकल्पासाठी धोम धरण ते पिंगळी या बोगद्याची जागा वगळता कुठे जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार नाही. कुठेही पंपाने पाणी उचलावे लागत नसल्याने विजेचा प्रश्न नाही. गोंदवले बुद्रुकपासून ते माणगंगा नदीचा भीमा नदीच्या संगमापर्यंत सुमारे १६५ कि. मी. अंतरावरील नदीवर असणारे सर्व बंधारे, तलावांना पाणी मिळेल.

चौकट

इंग्रजांची चूक आपण दुरुस्त करू!

इंग्रजांनी १८८२ मध्ये बांधलेल्या राजेवाडी तलावाचे पाणी थेट सोलापूर जिल्ह्यातील शेतीला बोगदे आणि कालव्याने नेले. ते बोगदे आणि कालवे अद्याप सुस्थितीत आहेत. मात्र राजेवाडी तलावात पाणी नसते. या योजनेद्वारे या तलावात पाणी सोडल्यास सोलापूर जिल्ह्यात कालव्याद्वारे आणि तलावातून माणगंगा नदीत पाणी सोडून इंग्रजांनी केलेला अन्याय आपण दूर करू शकतो.

कोट

कृष्णा नदीवर नैसर्गिक उताराने पाणी नेणारी अशी दुसरी योजना नाही. कोयनेवर लेकटॅपिंग करून वीजनिर्मिती केल्यानंतर जे पाणी उताराने समुद्राकडे जाते, तशी ही योजना दुष्काळी भागाकडे त्या भागातील कोरड्या नदीने जाते. केंद्रीय जल आयोगाने या योजनेला मान्यता दिली आहे.

- दिनकर पवार, निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग.