शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

शहरातील २५ हून अधिक विहिरींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकींच्या विहिरी गायब होऊ लागल्या आहेत. शहराचा विस्तार वाढू लागल्याने विहिरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकींच्या विहिरी गायब होऊ लागल्या आहेत. शहराचा विस्तार वाढू लागल्याने विहिरी मुजवून त्यावर काँक्रीटचे जंगल उभे राहू लागले आहे. जवळपास २५ हून अधिक विहिरी बुजविल्या आहेत. त्यावर महापालिका, जिल्हा प्रशासनाचे कसलेही निर्बंध नसल्याने विहिरी बुजविण्याचा सपाटा सुरूच आहे.

शहरात केवळ खासगी मालकीच्याच नव्हे, तर सार्वजनिक मालकीच्या विहिरींची चोरी झाली आहे. अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली विहिरी बुजविल्या जात आहेत. विशेषत: उपनगराचा विस्तार वाढू लागल्यानंतर या प्रकारात वाढ झाली. पूर्वी शहराचा आजूबाजूला शेतीक्षेत्र होती. तिथे विहिरी होत्या. पण आता त्या गायब झाल्या आहेत.

चौकट

हे घ्या पुरावे

१. महापालिका मुख्यालयाच्या दक्षिण बाजूला पूर्वी विहीर होती. वीस वर्षांपूर्वी या विहिरीवर स्लॅब टाकून ती बुजविण्यात आली. आता तिथे वाहनांचे पार्किंग आहे.

२. संजयनगर परिसरात एक विहिरी होती, तसेच त्या लगत मुरुम काढल्याने खणही तयार झाली होती, पण आता विहीर व खण बुजवून तिथे घरकूल योजना राबविण्यात आली आहे.

३. नेमीनाथनगर येथेही एका खासगी जागेत रस्त्यालगतच विहीर होती. आता तिथे रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे.

चौकट

नाल्यांचा प्रवाह थांबविला, उभारल्या इमारती

१. सांगली-इस्लापूर बायपास रस्त्यालगतच्या शेरीनाला परिसरात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह वळवून प्लाॅट पाडण्यात आले आहे. तिथे इमारती, अपार्टमेंट उभारल्या आहेत.

२. विजयनगर परिसरातील कुंभारमळा परिसरातही नाल्यावर अपार्टमेंट बांधले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हा परिसर पाण्याखाली जातो.

चौकट

स्थानिक प्रशासन म्हणते...

खासगी मालकीच्या जागेतील विहिरी परस्परच बुजविल्या जातात. ते आमच्याकडे परवानगीसाठी येत नाहीत. सार्वजनिक विहिरीबाबत मात्र पालिकेने त्याचे पुनर्भरण केले आहे. जिल्हाधिकारी बंगल्यासह मिरजेतील एका विहिरीचे पुनर्भरण करून तेथील पाण्याचा वापर सुरू केला आहे.

- अमीर मुलाणी, पाणीपुरवठा विभाग

चौकट

तलावांचे सुशोभीकरण

महापालिका क्षेत्रात काळी खण व मिरजेचे गणेश तलाव या दोन्ही जतन केले जात आहे. दोन्ही तलावांच्या सुशोभीकरणावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे खर्च होतात. सध्या काळी खण सुशोभीकरणाचा दीड कोटीचे कामही हाती घेण्यात आले आहे.

चौकट

- पाण्याचे मूळ स्रोताचे जतन करण्याची गरज आहे. विहीर, तलावाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांची आहे. विहिरी बुजविल्यामुळे पर्यावरणावरही त्याचा परिणाम होतो. त्यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे.

- अजित पाटील, पर्यावरणप्रेमी

-