शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २५ हून अधिक विहिरींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकींच्या विहिरी गायब होऊ लागल्या आहेत. शहराचा विस्तार वाढू लागल्याने विहिरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकींच्या विहिरी गायब होऊ लागल्या आहेत. शहराचा विस्तार वाढू लागल्याने विहिरी मुजवून त्यावर काँक्रीटचे जंगल उभे राहू लागले आहे. जवळपास २५ हून अधिक विहिरी बुजविल्या आहेत. त्यावर महापालिका, जिल्हा प्रशासनाचे कसलेही निर्बंध नसल्याने विहिरी बुजविण्याचा सपाटा सुरूच आहे.

शहरात केवळ खासगी मालकीच्याच नव्हे, तर सार्वजनिक मालकीच्या विहिरींची चोरी झाली आहे. अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली विहिरी बुजविल्या जात आहेत. विशेषत: उपनगराचा विस्तार वाढू लागल्यानंतर या प्रकारात वाढ झाली. पूर्वी शहराचा आजूबाजूला शेतीक्षेत्र होती. तिथे विहिरी होत्या. पण आता त्या गायब झाल्या आहेत.

चौकट

हे घ्या पुरावे

१. महापालिका मुख्यालयाच्या दक्षिण बाजूला पूर्वी विहीर होती. वीस वर्षांपूर्वी या विहिरीवर स्लॅब टाकून ती बुजविण्यात आली. आता तिथे वाहनांचे पार्किंग आहे.

२. संजयनगर परिसरात एक विहिरी होती, तसेच त्या लगत मुरुम काढल्याने खणही तयार झाली होती, पण आता विहीर व खण बुजवून तिथे घरकूल योजना राबविण्यात आली आहे.

३. नेमीनाथनगर येथेही एका खासगी जागेत रस्त्यालगतच विहीर होती. आता तिथे रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे.

चौकट

नाल्यांचा प्रवाह थांबविला, उभारल्या इमारती

१. सांगली-इस्लापूर बायपास रस्त्यालगतच्या शेरीनाला परिसरात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह वळवून प्लाॅट पाडण्यात आले आहे. तिथे इमारती, अपार्टमेंट उभारल्या आहेत.

२. विजयनगर परिसरातील कुंभारमळा परिसरातही नाल्यावर अपार्टमेंट बांधले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हा परिसर पाण्याखाली जातो.

चौकट

स्थानिक प्रशासन म्हणते...

खासगी मालकीच्या जागेतील विहिरी परस्परच बुजविल्या जातात. ते आमच्याकडे परवानगीसाठी येत नाहीत. सार्वजनिक विहिरीबाबत मात्र पालिकेने त्याचे पुनर्भरण केले आहे. जिल्हाधिकारी बंगल्यासह मिरजेतील एका विहिरीचे पुनर्भरण करून तेथील पाण्याचा वापर सुरू केला आहे.

- अमीर मुलाणी, पाणीपुरवठा विभाग

चौकट

तलावांचे सुशोभीकरण

महापालिका क्षेत्रात काळी खण व मिरजेचे गणेश तलाव या दोन्ही जतन केले जात आहे. दोन्ही तलावांच्या सुशोभीकरणावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे खर्च होतात. सध्या काळी खण सुशोभीकरणाचा दीड कोटीचे कामही हाती घेण्यात आले आहे.

चौकट

- पाण्याचे मूळ स्रोताचे जतन करण्याची गरज आहे. विहीर, तलावाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांची आहे. विहिरी बुजविल्यामुळे पर्यावरणावरही त्याचा परिणाम होतो. त्यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे.

- अजित पाटील, पर्यावरणप्रेमी

-