शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २५ हून अधिक विहिरींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकींच्या विहिरी गायब होऊ लागल्या आहेत. शहराचा विस्तार वाढू लागल्याने विहिरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकींच्या विहिरी गायब होऊ लागल्या आहेत. शहराचा विस्तार वाढू लागल्याने विहिरी मुजवून त्यावर काँक्रीटचे जंगल उभे राहू लागले आहे. जवळपास २५ हून अधिक विहिरी बुजविल्या आहेत. त्यावर महापालिका, जिल्हा प्रशासनाचे कसलेही निर्बंध नसल्याने विहिरी बुजविण्याचा सपाटा सुरूच आहे.

शहरात केवळ खासगी मालकीच्याच नव्हे, तर सार्वजनिक मालकीच्या विहिरींची चोरी झाली आहे. अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली विहिरी बुजविल्या जात आहेत. विशेषत: उपनगराचा विस्तार वाढू लागल्यानंतर या प्रकारात वाढ झाली. पूर्वी शहराचा आजूबाजूला शेतीक्षेत्र होती. तिथे विहिरी होत्या. पण आता त्या गायब झाल्या आहेत.

चौकट

हे घ्या पुरावे

१. महापालिका मुख्यालयाच्या दक्षिण बाजूला पूर्वी विहीर होती. वीस वर्षांपूर्वी या विहिरीवर स्लॅब टाकून ती बुजविण्यात आली. आता तिथे वाहनांचे पार्किंग आहे.

२. संजयनगर परिसरात एक विहिरी होती, तसेच त्या लगत मुरुम काढल्याने खणही तयार झाली होती, पण आता विहीर व खण बुजवून तिथे घरकूल योजना राबविण्यात आली आहे.

३. नेमीनाथनगर येथेही एका खासगी जागेत रस्त्यालगतच विहीर होती. आता तिथे रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे.

चौकट

नाल्यांचा प्रवाह थांबविला, उभारल्या इमारती

१. सांगली-इस्लापूर बायपास रस्त्यालगतच्या शेरीनाला परिसरात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह वळवून प्लाॅट पाडण्यात आले आहे. तिथे इमारती, अपार्टमेंट उभारल्या आहेत.

२. विजयनगर परिसरातील कुंभारमळा परिसरातही नाल्यावर अपार्टमेंट बांधले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हा परिसर पाण्याखाली जातो.

चौकट

स्थानिक प्रशासन म्हणते...

खासगी मालकीच्या जागेतील विहिरी परस्परच बुजविल्या जातात. ते आमच्याकडे परवानगीसाठी येत नाहीत. सार्वजनिक विहिरीबाबत मात्र पालिकेने त्याचे पुनर्भरण केले आहे. जिल्हाधिकारी बंगल्यासह मिरजेतील एका विहिरीचे पुनर्भरण करून तेथील पाण्याचा वापर सुरू केला आहे.

- अमीर मुलाणी, पाणीपुरवठा विभाग

चौकट

तलावांचे सुशोभीकरण

महापालिका क्षेत्रात काळी खण व मिरजेचे गणेश तलाव या दोन्ही जतन केले जात आहे. दोन्ही तलावांच्या सुशोभीकरणावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे खर्च होतात. सध्या काळी खण सुशोभीकरणाचा दीड कोटीचे कामही हाती घेण्यात आले आहे.

चौकट

- पाण्याचे मूळ स्रोताचे जतन करण्याची गरज आहे. विहीर, तलावाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांची आहे. विहिरी बुजविल्यामुळे पर्यावरणावरही त्याचा परिणाम होतो. त्यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे.

- अजित पाटील, पर्यावरणप्रेमी

-