शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

तासगावातील टंचाई भाजपनिर्मित

By admin | Updated: August 20, 2015 22:49 IST

महादेव पाटील यांचा आरोप : बैलगाड्यांसह कॉँग्रेसचा निषेध मोर्चा

तासगाव : तासगाव तालुक्यात निर्माण झालेली पाण्याची टंचाई ही निसर्गनिर्मित नसून, भाजपनिर्मित आहे. तालुक्यातील पाणी योजनांना पाणी सोडले, तर ही टंचाईची परिस्थिती राहणार नाही. मात्र आपल्या कारखान्याचे उसाचे पैसे न देणारे भाजपचे खासदार मात्र, शेतकऱ्यांनी पाण्याचे पैसे भरावेत, असे आवाहन साळसूदपणे करीत आहेत. जर पाणी योजना सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी दिला. तासगाव तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाकडे भाजप सरकार करीत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ तासगाव तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने शेकडो बैलगाड्यांसह आयोजित निषेध मोर्चात महादेव नाना पाटील बोलत होते. यावेळी तासगावचे नगराध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.महादेव पाटील म्हणाले, पावसाळा निम्मा संपला, मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गाववाड्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील तलाव व विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.राज्यात काँग्रेसचे सरकार असताना या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी योजना तयार केल्या. या भागातील दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र आताचे भाजप सरकार पश्चिम महाराष्ट्रावर सूड उगवतेय का? असे विचारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तासगावच्या हक्काचे पाणी शिल्लक असताना, केवळ पैसे भरण्याचा तगादा लावून, पाणी सोडलेले नाही. मात्र भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार आहे. त्यांचे प्रेम उद्योगपतींवरच आहे. केवळ अनुशेषाच्या नावाखाली आमच्या शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी तहसील कार्यालयाजवळ झालेल्या सभेत तासगावचे नगराध्यक्ष संजय पवार, तासगाव-कवठेमहांकाळ युवकचे अध्यक्ष महेश पाटील, नंदू मंडले, नामदेव माळी, डॉ. संतोष पाटील, बाळासाहेब डुबल यांची भाषणे झाली. मोर्चात संताजी पाटील, भगवान कदम, विलास पवार, भास्कर डुबल, शरद जाधव, सतीश काटे, बाबूराव माळी, नीलेश पाटील, हणमंत अडसूळ, विनायक पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. तासगाव शहरातील भिलवडी नाक्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. दुष्काळाची वाढती दाहकता व तालुक्यातील बंद असलेल्या पाणी योजनांविरोधात जनतेत खदखणारा असंतोष या काँग्रेसच्या मोर्चात पहायला मिळाला. (वार्ताहर)