शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

तासगावातील टंचाई भाजपनिर्मित

By admin | Updated: August 20, 2015 22:49 IST

महादेव पाटील यांचा आरोप : बैलगाड्यांसह कॉँग्रेसचा निषेध मोर्चा

तासगाव : तासगाव तालुक्यात निर्माण झालेली पाण्याची टंचाई ही निसर्गनिर्मित नसून, भाजपनिर्मित आहे. तालुक्यातील पाणी योजनांना पाणी सोडले, तर ही टंचाईची परिस्थिती राहणार नाही. मात्र आपल्या कारखान्याचे उसाचे पैसे न देणारे भाजपचे खासदार मात्र, शेतकऱ्यांनी पाण्याचे पैसे भरावेत, असे आवाहन साळसूदपणे करीत आहेत. जर पाणी योजना सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी दिला. तासगाव तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाकडे भाजप सरकार करीत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ तासगाव तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने शेकडो बैलगाड्यांसह आयोजित निषेध मोर्चात महादेव नाना पाटील बोलत होते. यावेळी तासगावचे नगराध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.महादेव पाटील म्हणाले, पावसाळा निम्मा संपला, मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गाववाड्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील तलाव व विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.राज्यात काँग्रेसचे सरकार असताना या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी योजना तयार केल्या. या भागातील दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र आताचे भाजप सरकार पश्चिम महाराष्ट्रावर सूड उगवतेय का? असे विचारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तासगावच्या हक्काचे पाणी शिल्लक असताना, केवळ पैसे भरण्याचा तगादा लावून, पाणी सोडलेले नाही. मात्र भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार आहे. त्यांचे प्रेम उद्योगपतींवरच आहे. केवळ अनुशेषाच्या नावाखाली आमच्या शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी तहसील कार्यालयाजवळ झालेल्या सभेत तासगावचे नगराध्यक्ष संजय पवार, तासगाव-कवठेमहांकाळ युवकचे अध्यक्ष महेश पाटील, नंदू मंडले, नामदेव माळी, डॉ. संतोष पाटील, बाळासाहेब डुबल यांची भाषणे झाली. मोर्चात संताजी पाटील, भगवान कदम, विलास पवार, भास्कर डुबल, शरद जाधव, सतीश काटे, बाबूराव माळी, नीलेश पाटील, हणमंत अडसूळ, विनायक पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. तासगाव शहरातील भिलवडी नाक्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. दुष्काळाची वाढती दाहकता व तालुक्यातील बंद असलेल्या पाणी योजनांविरोधात जनतेत खदखणारा असंतोष या काँग्रेसच्या मोर्चात पहायला मिळाला. (वार्ताहर)