शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दहा हजार सांगलीकर म्हणतात, कोणताच उमेदवार पसंत नाही...

By admin | Updated: October 23, 2014 00:07 IST

विधानसभा निवडणूक : ‘नोटा’ मताचा सर्वाधिक वापर, प्रत्येक मतदारसंघात लोकांनी नोंदविला नकाराधिकार--लोकमत विशेष

अंजर अथणीकर - सांगली -निवडणूक रिंगणातील कोणताही उमेदवार पसंत नाही म्हणून नकाराधिकार (नोटा) वापरण्याची सोय विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात याचा वापर तब्बल दहा हजार मतदारांनी केला आहे. या दहा हजार मतदारांना एकही उमेदवार अवडला नाही. यामुळे सर्वच पक्षांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या अधिकाराचा सर्वाधिक वापर मिरज मतदारसंघात, तर कमी वापर पलूस-कडेगाव मतदारसंघात झाला आहे. लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना नकारात्मक मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मतदान यंत्रावर (ईव्हीएम) सर्वात शेवटी याचे चिन्ह ठेवण्यात आले होते. वरून सर्व उमेदवारांची पाहणी करून यामधील कोणीही आवडले नाही तर शेवटी मतदारांसाठी ‘नोटा’ मतदानाचा पर्याय मतदारांना देण्यात आला होता. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ‘नोटा’चा अधिकार ९ हजार ७३८ मतदारांनी वापरला आहे. या मतदारांना एकही उमेदवार पसंत पडलेला नाही. एवढ्या मोठ्याप्रमाणात नकाराधिकाराचा वापर झाल्याने राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. प्रत्येक मतदारसंघात हजार ते दोन हजारपर्यंत मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड हजार मतदारांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘नोटा’चा वापर केला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र मोठ्याप्रमाणात याचा वापर झाल्याने राजकीय पक्षांवर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांनी चांगला उमेदवार दिला असता, तर नोटाचा वापर करण्याची वेळ मतदारांवर आली नसती. ‘नोटा’चा सर्वाधिक वापर झाला असला, तरी सध्या तरी त्याचा काहीच परिणाम होणार नाही. राजकीय पक्षांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीच याचा उपयोग होणार आहे. ‘नोटा’च्या वापराला काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. हा अधिकार नको, असे त्यांचे म्हणणे होते; मात्र काही मतदारांना कोणताच उमेदवार पसंत नाही, त्यांनी काय करायचे? त्यांनी आपले मत कसे व्यक्त करायचे, असा लढा दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ‘नोटा’चा अधिकार मतदारांना दिला आहे. याचे प्रमाण वाढल्यास भविष्यात याचा सर्वच पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.