शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार सांगलीकर म्हणतात, कोणताच उमेदवार पसंत नाही...

By admin | Updated: October 23, 2014 00:07 IST

विधानसभा निवडणूक : ‘नोटा’ मताचा सर्वाधिक वापर, प्रत्येक मतदारसंघात लोकांनी नोंदविला नकाराधिकार--लोकमत विशेष

अंजर अथणीकर - सांगली -निवडणूक रिंगणातील कोणताही उमेदवार पसंत नाही म्हणून नकाराधिकार (नोटा) वापरण्याची सोय विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात याचा वापर तब्बल दहा हजार मतदारांनी केला आहे. या दहा हजार मतदारांना एकही उमेदवार अवडला नाही. यामुळे सर्वच पक्षांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या अधिकाराचा सर्वाधिक वापर मिरज मतदारसंघात, तर कमी वापर पलूस-कडेगाव मतदारसंघात झाला आहे. लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना नकारात्मक मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मतदान यंत्रावर (ईव्हीएम) सर्वात शेवटी याचे चिन्ह ठेवण्यात आले होते. वरून सर्व उमेदवारांची पाहणी करून यामधील कोणीही आवडले नाही तर शेवटी मतदारांसाठी ‘नोटा’ मतदानाचा पर्याय मतदारांना देण्यात आला होता. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ‘नोटा’चा अधिकार ९ हजार ७३८ मतदारांनी वापरला आहे. या मतदारांना एकही उमेदवार पसंत पडलेला नाही. एवढ्या मोठ्याप्रमाणात नकाराधिकाराचा वापर झाल्याने राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. प्रत्येक मतदारसंघात हजार ते दोन हजारपर्यंत मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड हजार मतदारांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘नोटा’चा वापर केला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र मोठ्याप्रमाणात याचा वापर झाल्याने राजकीय पक्षांवर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांनी चांगला उमेदवार दिला असता, तर नोटाचा वापर करण्याची वेळ मतदारांवर आली नसती. ‘नोटा’चा सर्वाधिक वापर झाला असला, तरी सध्या तरी त्याचा काहीच परिणाम होणार नाही. राजकीय पक्षांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीच याचा उपयोग होणार आहे. ‘नोटा’च्या वापराला काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. हा अधिकार नको, असे त्यांचे म्हणणे होते; मात्र काही मतदारांना कोणताच उमेदवार पसंत नाही, त्यांनी काय करायचे? त्यांनी आपले मत कसे व्यक्त करायचे, असा लढा दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ‘नोटा’चा अधिकार मतदारांना दिला आहे. याचे प्रमाण वाढल्यास भविष्यात याचा सर्वच पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.