शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

माणिकनाळमध्ये फळबागांचे दहा लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संख : माणिकनाळ (ता. जत) येथे वादळी वारे, वळीवाच्या पावसाने टोमॅटो, डाळिंब, चिंच, लिंबू, आंबा फळबागेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : माणिकनाळ (ता. जत) येथे वादळी वारे, वळीवाच्या पावसाने टोमॅटो, डाळिंब, चिंच, लिंबू, आंबा फळबागेचे नुकसान झाले आहे. विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आहेत. घराचे पत्रे उडून गेले आहेत. यामध्ये दहा लाखाचे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती अशी, पूर्व भागातील माणिकनाळ कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह वळीवाचा पाऊस झाला. वळीव पाऊस,वादळी वाऱ्यामुळे पंचवीस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लिंबू, आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. जिनेसाब चाँदसाब मुल्ला यांची द्राक्षे बागेतील ओळ पडली आहे. शिवाप्पा मल्लेशाप्पा कारकल, शंकर मारुती मुंजे या शेतकऱ्यांचे देशी आंबे पडले आहेत.

बसगोंडा रामगोंडा बगली, अमिनसाब दर्गा यांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. गजानन अमसिध्द घेरडी या शेतकऱ्याचे टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. गावठाण हद्दीतील चार विद्युत खांब मोडून पडले आहेत. वीजपुरवठा खंडित झाला आहे. नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यावेळी मंडल अधिकारी तळपे, तलाठी एम.व्ही बंडगर, कृषी सहाय्यक विजया राठोड, पंचायत समिती सदस्य ॲड. आडव्यापा घेरडे, शेतकरी उपस्थित होते.