शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

‘टेंभू’ कोणा एकट्याची जहागिरी नव्हे

By admin | Updated: October 22, 2015 00:52 IST

वैभव पाटील : संपतराव देशमुखच ‘टेंभू’चे खरे जनक

विटा : टेंभू उपसा योजना ही खानापूर मतदार संघातील प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याची व महत्त्वाकांक्षी योजना आहे. उगीच कोणी तरी ‘टेंभू’चे जे काय आहे ते मला एकट्यालाच सगळे कळते आणि योजना चालू आहे ती माझ्यामुळेच, अशा संभ्रमात कोणी राहू नये व त्यावर कोणी हुकूमशाही पध्दतीने मतही व्यक्त करू नये. कारण ती कुणा एकट्या घरची जहागिरी नाही, अशी टीका विट्याचे नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर केली. नगराध्यक्ष अ‍ॅड. पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षाच्या काळात आम्ही ‘टेंभू’साठी जे काही प्रयत्न केले व त्यासाठी जो लढा उभारला, तो एकट्याचा नव्हता. लढा एकटा कोणीच उभारू शकत नाही. त्यावेळी आमच्यासोबत पत्रकार, राजकीय संघटना, शेतकरी व सर्व स्तरातून प्रयत्न झाले. सरकारला तत्कालीन आमदारांनी सकारात्मकरित्या पटवून दिल्यानेच पाणी आले आहे. आता पारे व ढवळेश्वर तलावात पाणी येणार असल्याची घोषणा केली जात आहे. ती आम्ही गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचेच फलित आहे.गेल्या दोन महिन्यांपासून विटा पालिकेने स्वाइन फ्लूच नव्हे, तर कोणतेही साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले आहेत. यापुढेही ते अखंडपणे सुरूच राहणार आहेत.त्यामुळे विटेकर नागरिकांच्या आरोग्याचे पुतना-मावशीचे प्रेम दर्शविण्यापूर्वी टीका करणाऱ्यांनी आपल्या गावाची परिस्थिती पाहावी. विकासाच्या लांब गप्पा मारण्यापूर्वी पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या गावातील स्मशानभूमीचे पत्रे बदलावेत, असा सल्लाही नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिला. (वार्ताहर)उगीच उर बडवून घेऊ नये...टेंभू उपसा सिंचन योजनेवर मत व्यक्त करणे, हा तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. यावर कोणी हुकूमशाही पध्दतीने मत व्यक्त करू नये. टेंभू योजनेचे खरे जनक संपतराव देशमुखच आहेत. त्यामुळे कोणी तरी उगीच उर बडवून घेऊ नये. शांतपणे योजनेतील त्रुटी, मतदार संघातील ४५-४६ गावे जी पाण्यापासून वंचित आहेत, त्यांच्याबाबतीत चुकलेले नियोजन मान्य करून त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही नगराध्यक्ष वैभव पाटील यावेळी म्हणाले.