शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शिक्षकांकडून २ फेब्रुवारीची डेडलाईन

By admin | Updated: January 14, 2015 00:29 IST

बेमुदत शाळा बंदचा इशारा : विविध मागण्यांसाठी सांगलीत मोर्चा, निदर्शने

सांगली : शिक्षक भरतीवरील बंदी उठवण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, २ फेब्रुवारीपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड, सचिव जयसिंग पाटील यांनी केले. आंदोलनामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्थाचालक आदी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विजय गायकवाड म्हणाले की, शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन दुर्लक्ष करीत आहे. शिक्षक भरती करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, आदी मागण्यांसाठी १९९८ पासून शिक्षकांचा लढा सुरू आहे. आता याकडे दुर्लक्ष झाल्यास २ फेब्रुवारीपासून बेमुदत शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल. शासनाने तशी वेळ येऊ देऊ नये. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. शिक्षक भरतीवरील बंदी उठवा, शिक्षकेतर सेवकांची संख्या कमी करणारा नवीन आकृतीबंद रद्द करण्यात यावा, तुकड्यांची संख्या कमी करण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, शाळांचे थकित वेतनेतर अनुदान एकरकमी देण्यात यावे, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे, शिक्षण विभागाचे महसूल विभागात विलिनीकरण थांबवण्यात यावे, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, टीईटी योजना रद्द करण्यात यावी. मोर्चाची सुरुवात येथील पुष्पराज चौकातून करण्यात आली. मोर्चा राममंदिर, काँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आंदोलनामध्ये माजी आमदार शरद पाटील व भगवानराव साळुंखे, सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. पाटील, सचिव एस. के. पाटील, प्रभाकर खाडिलकर, रावसाहेब पाटील, संजय धामणगावकर, रघुनाथ सातपुते, अर्जुन सावंत, बाबूराव साळुंखे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)तर दहावी, बारावी परीक्षेवर बहिष्कारशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर, आगामी दहावी, बारावीच्या परीक्षेवर संपूर्ण राज्यात बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा विजय गायकवाड यांनी दिला. आजच्या आंदोलनात रयत शिक्षण संस्था वगळता सर्व शिक्षण संस्था सहभागी झाल्याने सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद होत्या.