शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांमध्ये बापाचा धाक आणि आईची हाक हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 00:49 IST

इंद्रजित देशमुख : जिल्ह्यातील गुरुजनांना दिला संस्काराचा मूलमंत्र

सांगली : संस्कारक्षम विद्यार्थी घडवायचा असेल, तर सर्वप्रथम शिक्षकांमध्ये ते गुण असणे आवश्यक आहे. आपल्या विद्यार्थ्यांवर अफाट प्रेम करताना, शिक्षकाच्या एका डोळ्यात प्रेम असायला हवे, तर एका डोळ्यात मुलांच्या चिंतेने वेदना असायला हव्यात. विद्यार्थ्यांच्या यशासाठी धडपडणाराच खरा शिक्षक असून, शिक्षकांमध्ये बापाचा धाक आणि आईची हाक असायला हवी, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ विचारवंत आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी शनिवारी केले. ‘लोकमत’च्यावतीने आयोजित जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांच्या गौरव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुगंध आणि जगण्यामध्ये क्षमता निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थी जेथे चुकतो, तेथे त्याला समजावणे आणि बरोबर असेल तर त्याला आधार देण्याचे काम आई-वडिलांइतकेच आत्मियतेने केवळ शिक्षकच करू शकतो. सध्या समाजात वाढत असलेला भ्रष्टाचार आणि स्वैराचारावर नियंत्रण आणण्यासाठी व संस्कारक्षम पिढीचा आग्रह कायम राखण्यासाठी शिक्षकांनी नावीन्याचा ध्यास घ्यावा. ते म्हणाले की, जिथे शाळा सुटल्यानंतरही मुलांची पावले घुटमळतात आणि सकाळी आपसुकपणे शाळेकडे वळतात, तीच शाळा खऱ्याअर्थाने आदर्श शाळा असते. त्यामुुळे शिक्षकांना बाहेरचा त्रास कितीही असला तरी, वर्गातील त्यांचा प्रवेश आनंददायी असायला हवा. शिक्षकांमध्ये असणारी ऊर्जा आणि शिकविण्यातील जिवंतपणाच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतो. (प्रतिनिधी) तीन वर्गात विभागलेला समाजच खरे आव्हान एखाद्या गोष्टीवर कार्य केल्यानंतरच संस्कार निर्माण होत असतात. ज्याप्रमाणे पावसाचा एक थेंब शिंपल्यात पडला, तर त्याचा मोती होतो. तसेच तोच थेंब नागाच्या तोंडात पडला, तर त्याचे विष होते. अगदी त्याचप्रमाणे सध्या विभागलेला समाज हाच शिक्षकांसमोर पिढी घडविण्यासाठीचे आव्हान आहे. ‘आहे रे’, ‘नाही रे’, ‘खूपच आहे रे’ या समाजात असलेल्या तीन वर्गांना एकरूप करीत संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.