शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

तांदुळवाडी अपहार २.८७ लाखाचा

By admin | Updated: July 28, 2014 23:22 IST

फौजदारी कारवाई होणार : दोषी पाचजणांना रक्कम भरण्याचे आदेश

सांगली : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील पाणी पुरवठा योजनेत २ लाख ८७ हजार ८५५ रुपयांचा अपहार झाल्याचे फेरचौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, सचिव, तांत्रिक सेवा पुरवठादार, सामाजिक लेखा परीक्षण समिती अध्यक्ष आणि उपअभियंत्यांना दोषी धरले असून, त्यांनी अपहाराची रक्कम सात दिवसांत भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वेळेत पैसे न भरल्यास फौजदारी कारवाई करून २००८ पासून दहा टक्के व्याजासह रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा परिषद प्रशासनाने नोटिसीद्वारे दिला आहे.तांदुळवाडी येथील गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन आॅगस्ट २००८ रोजी भारत निर्माण योजनेतून ६३ लाखांची योजना मंजूर करण्यात आली होती. यापैकी २० लाखांचा पहिला हप्ता मिळाला असून, त्यातूनच मुख्य दाबनलिका, गावातील अंतर्गत वितरण व्यवस्था आणि महावितरणचा वीज पुरवठा आदी कामावर खर्च दाखविला होता. या कामामध्ये घोटाळा झाल्याची गावातील ग्रामस्थांच्यावतीने भानुदास मोटे, संतोष साळुंखे, बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीमध्ये ३ लाख ५० हजारांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. घोटाळ्यास पाणी पुरवठा अध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव अस्मिता पाटील, सामाजिक लेखापरीक्षणाचे अध्यक्ष विठ्ठल कांबळे, तांत्रिक सेवा पुरवठादार श्रीकांत पाटील यांना दोषी धरून चौघांकडून अपहाराची रक्कम वसुलीचे आदेश देण्यात आले होते. फौजदारी कारवाईचा आदेशही झाला होता; परंतु राजकीय दबावामुळे वसुलीला स्थगिती मिळाली. त्यानंतर छोटे पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांना फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी करून त्यांनी अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. यामध्ये पाणी पुरवठा समिती अध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव अस्मिता पाटील, सामाजिक लेखा परीक्षणचे अध्यक्ष विठ्ठल कांबळे, तांत्रिक सेवा पुरवठादार श्रीकांत पाटील यांच्याबरोबरच शिराळा पंचायत समितीकडील उपअभियंता एस. एस. खैरमोडे यांनाही दोषी धरले आहे. दोषींनी सात दिवसांत अपहाराची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून दहा टक्के व्याजाने आॅगस्ट २००८ पासून वसूल करण्यात येतील, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)सुधारित प्रस्तावातही बोगस कागदपत्रेतांदुळवाडी गावासाठी भारत निर्माण योजनेतून ६३ लाखांची पाणी योजना मंजूर झाली होती. या निधीतील २० लाख खर्च करून पावणेतीन लाखांचा अपहार झाला आहे. एवढ्यावरही गावातील पदाधिकारी थांबले नसून, त्यांनी सुधारित योजना राष्ट्रीय पेयजल योजना टप्पा दोनमधून १ कोटी ९ लाख मंजूर करून घेतले. सुधारित प्रस्ताव देतानाही महावितरण वीज पुरवठ्यासह अन्य कागदपत्रे बोगस जोडून शासनाची फसवणूक केली. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्य शासनाने सध्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला स्थगिती दिली आहे, अशी माहिती भानुदास मोटे यांनी दिली.