शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

कालवा फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

प्रभाकर जाधव : जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

शेगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई निधीतून जत तालुक्यातील साठवण तलाव भरण्याचे आदेश दिले आहेत. म्हैसाळचे हे पाणी ३१ जुलैपर्यंत सोडले जाणार आहे. केवळ बारा दिवसच बिरनाळ तलावात पाणी सोडण्यात आले. मात्र पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पाच दिवसांच्या आत कालवा फोडून हे पाणी वळविले आहे. जतला पाणी येण्यासाठी शेतकऱ्यांनाच हा कालवा श्रमदानातून व स्वखर्चातून दुरुस्त करावा लागत आहे. मात्र या शेतकऱ्यांवर स्थानिक शेतकऱ्यांकडून हल्ले होत आहेत. प्रशासनाकडे याबाबत तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे. कालवा बेकायदेशीररित्या फोडणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करणारे शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटणार असल्याची माहिती अजिंक्यतारा फाऊंडेशनच्या अ‍ॅड. प्रभाकर जाधव यांनी दिली.जाधव म्हणाले की, बनाळी, वायफळपर्यंत सध्या पाणी पोहोचू शकते. कालव्याची अपूर्ण कामे केवळ पाच दिवसांत पूर्ण होऊ शकतात. त्याअगोदर प्रतापपूर, वाळेखिंडी, शेगाव, तिप्पेहळ्ळी हे तलाव म्हैसाळच्या पाणी योजनेतून भरणे गरजेचे आहे. मात्र पश्चिम भागातील शेतकरी कालवा फोडून जत तालुक्याला येणारे हे पाणी अडवून घेतात. आमच्या वाट्याचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. किमान जत उत्तर भागातील तलाव तातडीने भरणे आवश्यक आहे. टंचाई निधीतून कवठेमहांकाळ, मिरज, जत येथील साठवण तलाव भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. कुंभारी, शेगाव आदी गावांसह परिसरातील शेतकऱ्यांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच पैसे भरले आहेत. पाण्याचे नियोजन योग्यरितीने होण्यासाठी कालवे फोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटणार आहे. (वार्ताहर)