शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : आमदार अनिल बाबर यांच्या आदेशानंतर ताकारी योजनेचे पाणी पाटबंधारे विभागाने आळसंद तलावात सोडल्याने विटा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : आमदार अनिल बाबर यांच्या आदेशानंतर ताकारी योजनेचे पाणी पाटबंधारे विभागाने आळसंद तलावात सोडल्याने विटा शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाबर यांनी मंगळवारी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्यासमवेत बैठक घेऊन ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात तातडीने सोडून तलाव पाण्याने पूर्ण भरून घ्यावा, अशी सूचना केली.

विटा शहराला घोगाव पाणी योजनेतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्याला पूरक योजना म्हणून आळसंद तलावाचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात घेत आहे. मात्र, घोगाव ते आळसंद जलशुद्धीकरण केंद्र या टप्प्यात मोठी गळती असल्याने दहा लाख लिटर पाणी वाया जात आहे. आळसंद तलावातही पाणी नसल्याने विटा शहराला पाणीटंचाई निर्माण झाल्याचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी विरोधी नगरसेवक अमोल बाबर, अमर शितोळे यांना सांगितले होते.

परिणामी विटा शहरात चार दिवसांनी पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत होता. नगरसेवक बाबर व शितोळे यांनी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडून विटेकर नागरिकांचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी विनंती आ. बाबर यांना केली होती.

त्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांनी मंगळवारी आळसंद तलावाची पाहणी केली. अधीक्षक अभियंता नाईक यांच्याशी बैठक घेऊन आळसंद तलावातून विटा शहराला पिण्याचा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विटेकर नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून मोठे हाल सुरू आहेत. आळसंद तलावातून विटा शहरासह ग्रामीण भागातील काही गावांनासुद्धा पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात तातडीने सोडून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावा, अशी सूचना केली. नाईक यांनी ताकारी योजनेचे पाणी सोडण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. त्यानुसार मंगळवारी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडले आहे. यामुळे विटा शहराचा पिण्याचा पाणीप्रश्न संपुष्टात येणार असून, आ. अनिल बाबर यांच्यामुळे विटेकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.