शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : आमदार अनिल बाबर यांच्या आदेशानंतर ताकारी योजनेचे पाणी पाटबंधारे विभागाने आळसंद तलावात सोडल्याने विटा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : आमदार अनिल बाबर यांच्या आदेशानंतर ताकारी योजनेचे पाणी पाटबंधारे विभागाने आळसंद तलावात सोडल्याने विटा शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाबर यांनी मंगळवारी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्यासमवेत बैठक घेऊन ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात तातडीने सोडून तलाव पाण्याने पूर्ण भरून घ्यावा, अशी सूचना केली.

विटा शहराला घोगाव पाणी योजनेतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्याला पूरक योजना म्हणून आळसंद तलावाचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात घेत आहे. मात्र, घोगाव ते आळसंद जलशुद्धीकरण केंद्र या टप्प्यात मोठी गळती असल्याने दहा लाख लिटर पाणी वाया जात आहे. आळसंद तलावातही पाणी नसल्याने विटा शहराला पाणीटंचाई निर्माण झाल्याचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी विरोधी नगरसेवक अमोल बाबर, अमर शितोळे यांना सांगितले होते.

परिणामी विटा शहरात चार दिवसांनी पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत होता. नगरसेवक बाबर व शितोळे यांनी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडून विटेकर नागरिकांचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी विनंती आ. बाबर यांना केली होती.

त्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांनी मंगळवारी आळसंद तलावाची पाहणी केली. अधीक्षक अभियंता नाईक यांच्याशी बैठक घेऊन आळसंद तलावातून विटा शहराला पिण्याचा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विटेकर नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून मोठे हाल सुरू आहेत. आळसंद तलावातून विटा शहरासह ग्रामीण भागातील काही गावांनासुद्धा पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात तातडीने सोडून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावा, अशी सूचना केली. नाईक यांनी ताकारी योजनेचे पाणी सोडण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. त्यानुसार मंगळवारी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात सोडले आहे. यामुळे विटा शहराचा पिण्याचा पाणीप्रश्न संपुष्टात येणार असून, आ. अनिल बाबर यांच्यामुळे विटेकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.