शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

ताकारी, टेंभू पाणी योजनेचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात!

By admin | Updated: November 9, 2014 23:30 IST

भाजप नेते कोणता निर्णय घेणार, याकडे आता दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

रजाअली पीरजादे - शाळगाव -ताकारी, टेंभू योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, याबाबत भाजप नेते कोणता निर्णय घेणार, याकडे आता दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.ताकारी, टेंभू किंवा म्हैसाळ योजनेची वीजबिले आजपर्यंत टंचाई निधीतूनभरली आहेत. आता पुन्हा वीज बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता हा वीजबिलाचा प्रश्न भाजपच्या कोर्टात गेला आहे. आजपर्यंत वीजबिलाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, तेव्हा आघाडी काळात भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना यांनी नेहमीच आवाज उठवला होता.आता परिस्थिती बदलली आहे. आज भाजप सत्ताधारी पक्ष बनला आहे, तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहेत. निवडणुकांच्या काळात पाणीप्रश्नासाठी भाजपने मते मागितली होती. साहजिकच आता जिल्ह्यातील भाजप नेते पाणी प्रश्नावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय साखर कारखान्यांनी ताकारी, टेंभू योजनेसाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून लाखो रुपये कापून घेतले आहेत. त्याचा हिशेब कारखानदार आणि टेंभू, ताकारीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही. त्याबाबत काय निर्णय होणार, याकडेही लोकांच्या नजरा लागल्या लागून राहिले आहेत. वस्तुत: युतीच्या काळात ताकारी, टेंभू योजना कार्यान्वित झाल्या. त्यानंतर आघाडी सरकार सत्तेवर आले; परंतु आघाडी सरकारने १५ वर्षांच्या कालावधित या योजना पूर्ण केल्या नाहीत. त्याचा फटका निवडणुकीत आघाडीला बसला. दुसरीकडे निवडणुका काळात भाजपने पाणी योजना पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते खा. संजयकाका पाटील, अजित घोरपडे, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख हे आता काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ताकारी असो, म्हैसाळ असो किंवा टेंभू योजना असो, या सर्वच योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या आहेत. ताकारी योजनेची कामे जवळजवळ पूर्ण होत आली आहेत, तर आशिया खंडातील सर्वात मोठी टेंभू योजना पूर्ण झालेली नाही. निवडणूक काळात राज्यकर्त्यांनी या आज रोजी वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. वीजबिलाचा प्रश्न ऐरणीवरवीज बिलासाठी आघाडी सरकारने पैशाची तरतूद करून ठेवल्याचे कॉँग्रेसचे नेते सांगत आहेत. रब्बी हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामाबरोबर उसासाठीही आज पाण्याची गरज आहे. यासाठी वीजबिले तातडीने भरून योजना सुरू करण्याची मागणी होत आहे.