शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ताकारी, टेंभू पाणी योजनेचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात!

By admin | Updated: November 9, 2014 23:30 IST

भाजप नेते कोणता निर्णय घेणार, याकडे आता दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

रजाअली पीरजादे - शाळगाव -ताकारी, टेंभू योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, याबाबत भाजप नेते कोणता निर्णय घेणार, याकडे आता दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.ताकारी, टेंभू किंवा म्हैसाळ योजनेची वीजबिले आजपर्यंत टंचाई निधीतूनभरली आहेत. आता पुन्हा वीज बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता हा वीजबिलाचा प्रश्न भाजपच्या कोर्टात गेला आहे. आजपर्यंत वीजबिलाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, तेव्हा आघाडी काळात भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना यांनी नेहमीच आवाज उठवला होता.आता परिस्थिती बदलली आहे. आज भाजप सत्ताधारी पक्ष बनला आहे, तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहेत. निवडणुकांच्या काळात पाणीप्रश्नासाठी भाजपने मते मागितली होती. साहजिकच आता जिल्ह्यातील भाजप नेते पाणी प्रश्नावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय साखर कारखान्यांनी ताकारी, टेंभू योजनेसाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून लाखो रुपये कापून घेतले आहेत. त्याचा हिशेब कारखानदार आणि टेंभू, ताकारीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही. त्याबाबत काय निर्णय होणार, याकडेही लोकांच्या नजरा लागल्या लागून राहिले आहेत. वस्तुत: युतीच्या काळात ताकारी, टेंभू योजना कार्यान्वित झाल्या. त्यानंतर आघाडी सरकार सत्तेवर आले; परंतु आघाडी सरकारने १५ वर्षांच्या कालावधित या योजना पूर्ण केल्या नाहीत. त्याचा फटका निवडणुकीत आघाडीला बसला. दुसरीकडे निवडणुका काळात भाजपने पाणी योजना पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते खा. संजयकाका पाटील, अजित घोरपडे, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख हे आता काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ताकारी असो, म्हैसाळ असो किंवा टेंभू योजना असो, या सर्वच योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या आहेत. ताकारी योजनेची कामे जवळजवळ पूर्ण होत आली आहेत, तर आशिया खंडातील सर्वात मोठी टेंभू योजना पूर्ण झालेली नाही. निवडणूक काळात राज्यकर्त्यांनी या आज रोजी वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. वीजबिलाचा प्रश्न ऐरणीवरवीज बिलासाठी आघाडी सरकारने पैशाची तरतूद करून ठेवल्याचे कॉँग्रेसचे नेते सांगत आहेत. रब्बी हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामाबरोबर उसासाठीही आज पाण्याची गरज आहे. यासाठी वीजबिले तातडीने भरून योजना सुरू करण्याची मागणी होत आहे.