शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांच्या ताटातही आता तूरडाळीचा तडका

By admin | Updated: July 29, 2016 23:50 IST

शासनाचा निर्णय : जिल्ह्यातील ९७ हजार अंत्योदय, बीपीएल कार्डधारकांना मिळणार लाभ

शरद जाधव -- सांगली --सर्वसामान्यांचे जेवणाचे ताट परिपूर्ण करणाऱ्या डाळींच्या किमती वाढतच चालल्याने, त्यांचे बजेट अक्षरश: कोलमडून गेले आहे. डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला अपयश येत असल्याची तक्रार होत असताना, अखेर शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रास्त भाव दुकानातून तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून कमी किमतीत कार्डधारकांना तूरडाळ मिळणार असून जिल्ह्यातील ६१ हजार ६८५ बीपीएल, तर ३५ हजार ९६ अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. आॅगस्ट महिन्यासाठी जिल्ह्यासाठी ९६७.८० क्विंटल तूरडाळ उपलब्ध होणार असून या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना, तूरडाळीचा ‘तडका’ सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे.चाकरमान्यांचा डबा असो किंवा दैनंदिन आहार, डाळींचा वापर अनिवार्य ठरलेला असतो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून बाजारात मिळणाऱ्या डाळींच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत असून भाजीपाल्याच्या किमती वाढत चालल्याने डाळींचा पर्यायही त्यांच्या खिशाला चाट मारून जात होता. सरकारकडून डाळींचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करूनही बाजारपेठेत दर चढेच राहिल्याने सर्वसामान्यांच्या मासिक बजेटला कात्री लावावी लागत होती. दरम्यान, यामुळे वाढता असंतोष लक्षात घेता, राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने ७ हजारावर मेट्रिक टन तूरडाळीची आवश्यकता नोंदविली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६१ हजार ६८५ बीपीएल कार्डधारकांना, तर ३५ हजार ९६ अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. या योजनेतून मिळणारी डाळ अत्यंत कमी प्रमाणात असली तरी, यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य शासनाने तीन महिन्यासाठी प्रति शिधापत्रिकाधारकांना एक किलो तूरडाळ वितरणाचे नियोजन केले असून आॅगस्ट महिन्यासाठी ९६७.८ क्विंटल तूरडाळ वितरणाचे नियोजन आहे. या निर्णयाबरोबरच खुल्या बाजारातील तूरडाळीचे दरही नियंत्रणात आणण्यासाठीचे नियोजन शासनाने केले आहे. त्यानुसार किरकोळ दुकानदार, मॉल, बझार आदी ठिकाणी नियंत्रित दरामध्ये तूरडाळीचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र, या आदेशातही नियंत्रित दरानुसार प्रति ग्राहकाला केवळ एक किलोच तूरडाळ देण्याचे आदेश देण्यात आल्याने नियंत्रित दरात अधिक प्रमाणात डाळ मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. अशी मागणी असली तरी शासनाच्या या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे.शिधापत्रिकेवर : जादा तूरडाळ द्याशासनाच्या या निर्णयानुसार येत्या तीन महिन्यासाठी शिधापत्रिका धारकांना नियंत्रित दराने तूरडाळ देण्यात येणार आहे. मात्र, ही डाळ देताना महिन्याला केवळ एक किलोच देण्याचे आदेश असल्याने एक किलो डाळ महिनाभर पुरणार कशी? असा सवाल आता व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डाळीची मर्यादा वाढविण्याची मागणी आहे. तसेच केवळ तूरडाळच न देता सध्या जादा दराने विकल्या जाणाऱ्या इतर डाळीही रास्त भाव दुकानात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.