शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

सामान्यांच्या ताटातही आता तूरडाळीचा तडका

By admin | Updated: July 29, 2016 23:50 IST

शासनाचा निर्णय : जिल्ह्यातील ९७ हजार अंत्योदय, बीपीएल कार्डधारकांना मिळणार लाभ

शरद जाधव -- सांगली --सर्वसामान्यांचे जेवणाचे ताट परिपूर्ण करणाऱ्या डाळींच्या किमती वाढतच चालल्याने, त्यांचे बजेट अक्षरश: कोलमडून गेले आहे. डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला अपयश येत असल्याची तक्रार होत असताना, अखेर शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रास्त भाव दुकानातून तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून कमी किमतीत कार्डधारकांना तूरडाळ मिळणार असून जिल्ह्यातील ६१ हजार ६८५ बीपीएल, तर ३५ हजार ९६ अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. आॅगस्ट महिन्यासाठी जिल्ह्यासाठी ९६७.८० क्विंटल तूरडाळ उपलब्ध होणार असून या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना, तूरडाळीचा ‘तडका’ सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे.चाकरमान्यांचा डबा असो किंवा दैनंदिन आहार, डाळींचा वापर अनिवार्य ठरलेला असतो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून बाजारात मिळणाऱ्या डाळींच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत असून भाजीपाल्याच्या किमती वाढत चालल्याने डाळींचा पर्यायही त्यांच्या खिशाला चाट मारून जात होता. सरकारकडून डाळींचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करूनही बाजारपेठेत दर चढेच राहिल्याने सर्वसामान्यांच्या मासिक बजेटला कात्री लावावी लागत होती. दरम्यान, यामुळे वाढता असंतोष लक्षात घेता, राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने ७ हजारावर मेट्रिक टन तूरडाळीची आवश्यकता नोंदविली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६१ हजार ६८५ बीपीएल कार्डधारकांना, तर ३५ हजार ९६ अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. या योजनेतून मिळणारी डाळ अत्यंत कमी प्रमाणात असली तरी, यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य शासनाने तीन महिन्यासाठी प्रति शिधापत्रिकाधारकांना एक किलो तूरडाळ वितरणाचे नियोजन केले असून आॅगस्ट महिन्यासाठी ९६७.८ क्विंटल तूरडाळ वितरणाचे नियोजन आहे. या निर्णयाबरोबरच खुल्या बाजारातील तूरडाळीचे दरही नियंत्रणात आणण्यासाठीचे नियोजन शासनाने केले आहे. त्यानुसार किरकोळ दुकानदार, मॉल, बझार आदी ठिकाणी नियंत्रित दरामध्ये तूरडाळीचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र, या आदेशातही नियंत्रित दरानुसार प्रति ग्राहकाला केवळ एक किलोच तूरडाळ देण्याचे आदेश देण्यात आल्याने नियंत्रित दरात अधिक प्रमाणात डाळ मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. अशी मागणी असली तरी शासनाच्या या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे.शिधापत्रिकेवर : जादा तूरडाळ द्याशासनाच्या या निर्णयानुसार येत्या तीन महिन्यासाठी शिधापत्रिका धारकांना नियंत्रित दराने तूरडाळ देण्यात येणार आहे. मात्र, ही डाळ देताना महिन्याला केवळ एक किलोच देण्याचे आदेश असल्याने एक किलो डाळ महिनाभर पुरणार कशी? असा सवाल आता व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डाळीची मर्यादा वाढविण्याची मागणी आहे. तसेच केवळ तूरडाळच न देता सध्या जादा दराने विकल्या जाणाऱ्या इतर डाळीही रास्त भाव दुकानात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.