शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेच्या कालव्याला भेगा

By admin | Updated: May 14, 2016 00:51 IST

अधिकाऱ्यांच्या चुकांचा फटका : क्षमतेपेक्षा जादा पाणी भरल्याने धोका

अतुल जाधव / देवराष्ट्रे ताकारी उपसा योजनेच्या टप्पा क्र. ३ जवळ मुख्य कालव्याची दारे बंद केल्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी तुंबले गेले. त्यामुळे मुख्य कालव्याचा भराव भिंतीला चार ते पाच सेंटीमीटर रुंदीच्या भेगा पडल्या आहेत. या भेगा तीन ते चार ठिकाणी पडल्या असून त्यांची लांबी एक किलोमीटरवर आहे. यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे. जेथे भेगा पडल्या आहेत, तेथील भरावाची उंची ३० ते ४० फूट असल्याने कधीही हा भराव ढासळण्याची शक्यता आहे. ताकारी उपसा योजनेच्या टप्पा क्र. तीनजवळची मुख्य कालव्याची दारे पाणी चालू असताना एका अभियंत्याने बंद करायला लावली. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली. योजनेच्या आठही पंपांचे सर्व पाणी टप्पा क्र. ३ हौदात सोडले. या हौदाची पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे पाणी हौद भरून ओढ्या-ओघळीला जाऊ लागले. मात्र दारे खुली केली नाहीत. त्यामुळे पाणी वाढत गेले. ही पातळी टप्पा क्र. ३ पासून पाठीमागे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत गेली. कालवा क्षमतेपेक्षा अधिक भरला. पाणी बाहेर पडू लागले. भराव, भिंती खचू लागल्या. नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी दक्षता म्हणून कालवा सुरू केला, तेव्हा दारे खुली करण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत मुख्य कालव्याच्या भरावाला चार ते सेंटीमीटर रुंदीच्या भेगा पडल्या होत्या. अशा भेगा तीन ते चार ठिकाणी पडल्या असून याची लांबी एक किलोमीटरवर अधिक आहे. या कालव्याचा भराव खचण्याचा किंवा फुटण्याचा धोका लक्षात घेऊन रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक पाटबंधारे विभागाने थांबवली आहे. दक्ष नागरिक व कर्मचारी यांच्या जागरुकपणामुळे धोका तात्पुरता तरी टळला आहे. मुख्य कालव्याच्या भराव भिंतीला पडलेल्या भेगा धोकादायक आहेत. या भरावावरून जड वाहन गेले तर हा भराव खचू अथवा ढासळू शकतो. यामुळे कालवा फुटून पाणी इतरत्र पसरू शकते. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे ताकारी योजनेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम न केल्यास मुख्य कालव्याला धोका निर्माण होऊ शकतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या वांगी सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले की, याबाबत आम्ही वरिष्ठांशी चर्चा केली असून याबाबत लवकरच निर्णय होईल.