शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभावी संस्थांमुळे सामान्यांना आधार

By admin | Updated: June 30, 2015 00:19 IST

जयंत पाटील : इस्लामपुरात रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टकडून अपंगांना मदत

इस्लामपूर : मुंबईतील रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान अशा सेवाभावी संस्था सामाजिक बांधिलकीतून गोर-गरिबांना मदतीचा हात देत असल्याने त्यांचे जीवन सुसह्य व समृध्द होत असल्याची भावना माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली़ येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या सभागृहात रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टने आमदार पाटील यांच्याहस्ते वाळवा तालुक्यातील अपंगांना तीनचाकी सायकली, जयपूर फूट, कुबड्या, बहिऱ्या व्यक्तींना श्रवणयंत्र, गोर-गरीब महिलांना साड्या, मुले-मुलींना कपडे वाटप करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने संयोजन केलेल्या या कार्यक्रमात डॉ़ संतोष भोसले, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत, बालाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला़ प्रबोधिनीचे कार्यवाह प्रा़ शामराव पाटील,जी़ आऱ शहा, पराग शहा, समन्वयक लक्ष्मण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.क्लिपबूट व कुबड्या मिळालेल्या सौ़ सुरेखा जाधव साखराळे, विद्यार्थिनी कु़ सुवर्णा भानुसे, बोरगाव यांनी कृतज्ञता व्यक्त केली़ घबकवाडी सर्जेराव घाडगे, येडेनिपाणी, शुभम थोरात, सुदाम कालेकर, वाळवा, राजाराम खोत, पडवळवाडी, अजित पाटील, दुधारी, विक्रम वाघमारे, इस्लामपूर, प्रकाश भक्ते, शिवपुरी यांना तीनचाकी सायकल, भास्कर पाटील, तांबवे, बाबासाहेब तवटे, नवेखेड यांना जयपूर फूट व कुबड्या, यश यादव, पडवळवाडी यास कुबड्या, दगडू सुपनेकर, नायकलवाडी यास कानाचे मशीन, वैष्णवी पाटील, इटकरे, सौ़ सुरेखा जाधव, साखराळे यांना क्लिपबूट व कुबड्या, महादेव जाधव, साखराळे यांना श्रवणयंत्र, श्रीकांत गायकवाड, शिरटे यास श्रवण यंत्र तसेच शेकडो महिला, मुले-मुलींना साड्या, कपडे वाटप करण्यात आले.अभियानचे संघटक कुमार पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले़ . याप्रसंगी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, विनायक कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)कृतज्ञतेची भावना...विविध सामाजिक संस्थांमुळे आजवर अनेक गरजुंना आधार मिळाला आहे. इस्लामपुरात आमदार जयंत पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानामुळे आजवर अनेकांना आधार मिळाला आहे. या अभियानातून होणारे आदर्शवत काम पाहून रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टनेही यामध्ये सहभागी होत मदतीचा हात दिला आहे. या कार्यक्रमात अनेकांना तीनचाकी सायकल, जयपूर फूट, कुबड्या, श्रवणयंत्र, साड्या, मुले-मुलींना कपडे वाटप करण्यात आले. यामुळे आजवर आपल्या अपंगत्वाशी झगडणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान बरेच काही सांगून गेले. यावेळी मनोगत व्यक्त करताना क्लिपबूट व कुबड्या मिळालेल्या सौ़ सुरेखा जाधव (रा. साखराळे), विद्यार्थिनी कु़ सुवर्णा भानुसे (रा. बोरगाव) यांनी कृतज्ञता व्यक्त केली़ घबकवाडी येथील अमित खोत, सौ़ माया खोत या आई-वडिलांनी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानमुळे मुलाचा पुनर्जन्म झाल्याची भावना व्यक्त केली.