शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

सेवाभावी संस्थांमुळे सामान्यांना आधार

By admin | Updated: June 30, 2015 00:19 IST

जयंत पाटील : इस्लामपुरात रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टकडून अपंगांना मदत

इस्लामपूर : मुंबईतील रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान अशा सेवाभावी संस्था सामाजिक बांधिलकीतून गोर-गरिबांना मदतीचा हात देत असल्याने त्यांचे जीवन सुसह्य व समृध्द होत असल्याची भावना माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली़ येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या सभागृहात रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टने आमदार पाटील यांच्याहस्ते वाळवा तालुक्यातील अपंगांना तीनचाकी सायकली, जयपूर फूट, कुबड्या, बहिऱ्या व्यक्तींना श्रवणयंत्र, गोर-गरीब महिलांना साड्या, मुले-मुलींना कपडे वाटप करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने संयोजन केलेल्या या कार्यक्रमात डॉ़ संतोष भोसले, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत, बालाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला़ प्रबोधिनीचे कार्यवाह प्रा़ शामराव पाटील,जी़ आऱ शहा, पराग शहा, समन्वयक लक्ष्मण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.क्लिपबूट व कुबड्या मिळालेल्या सौ़ सुरेखा जाधव साखराळे, विद्यार्थिनी कु़ सुवर्णा भानुसे, बोरगाव यांनी कृतज्ञता व्यक्त केली़ घबकवाडी सर्जेराव घाडगे, येडेनिपाणी, शुभम थोरात, सुदाम कालेकर, वाळवा, राजाराम खोत, पडवळवाडी, अजित पाटील, दुधारी, विक्रम वाघमारे, इस्लामपूर, प्रकाश भक्ते, शिवपुरी यांना तीनचाकी सायकल, भास्कर पाटील, तांबवे, बाबासाहेब तवटे, नवेखेड यांना जयपूर फूट व कुबड्या, यश यादव, पडवळवाडी यास कुबड्या, दगडू सुपनेकर, नायकलवाडी यास कानाचे मशीन, वैष्णवी पाटील, इटकरे, सौ़ सुरेखा जाधव, साखराळे यांना क्लिपबूट व कुबड्या, महादेव जाधव, साखराळे यांना श्रवणयंत्र, श्रीकांत गायकवाड, शिरटे यास श्रवण यंत्र तसेच शेकडो महिला, मुले-मुलींना साड्या, कपडे वाटप करण्यात आले.अभियानचे संघटक कुमार पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले़ . याप्रसंगी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, विनायक कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)कृतज्ञतेची भावना...विविध सामाजिक संस्थांमुळे आजवर अनेक गरजुंना आधार मिळाला आहे. इस्लामपुरात आमदार जयंत पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानामुळे आजवर अनेकांना आधार मिळाला आहे. या अभियानातून होणारे आदर्शवत काम पाहून रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टनेही यामध्ये सहभागी होत मदतीचा हात दिला आहे. या कार्यक्रमात अनेकांना तीनचाकी सायकल, जयपूर फूट, कुबड्या, श्रवणयंत्र, साड्या, मुले-मुलींना कपडे वाटप करण्यात आले. यामुळे आजवर आपल्या अपंगत्वाशी झगडणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान बरेच काही सांगून गेले. यावेळी मनोगत व्यक्त करताना क्लिपबूट व कुबड्या मिळालेल्या सौ़ सुरेखा जाधव (रा. साखराळे), विद्यार्थिनी कु़ सुवर्णा भानुसे (रा. बोरगाव) यांनी कृतज्ञता व्यक्त केली़ घबकवाडी येथील अमित खोत, सौ़ माया खोत या आई-वडिलांनी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानमुळे मुलाचा पुनर्जन्म झाल्याची भावना व्यक्त केली.