शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दु:खातील कुटुंबांना दिला ‘आधार’

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

फराळाचे वाटप : मिरजेत आधार संस्थेचा उपक्रम

मिरज : एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर वर्षभर त्या कुटुंबात कोणताही सण साजरा केला जात नाही. अशा दु:खी कुटुंबांना मिरजेतील आधार संस्थेतर्फे मागील सात वर्षांपासून दिवाळीत फराळ वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या संस्थेतर्फे फराळाचे साहित्य देऊन त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचा आधार दिला जात आहे. भारतीय समाजात दिवाळी सणाला मोठे महत्त्व आहे. फराळाचे विविध पदार्थ बनवून कुटुंबातील सदस्य, मित्र व नातेवाईकांसह त्याचा आस्वाद घेऊन दिवाळी सण साजरा करण्यात येतो. मात्र एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास दु:खामुळे वर्षभर त्या कुटुंबात दिवाळीसह इतरही सण साजरे केले जात नाहीत. अशावेळी त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याकडून फराळाचे साहित्य देण्याची प्रथा आहे. मात्र बदलत्या परिस्थितीत कुटुंबातील दुरावा वाढल्याने ही प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहे. दु:खात असलेल्यांना आधार देण्याची ही प्रथा जिवंत ठेवण्यासाठी फराळाचे पदार्थ देण्याचा उपक्रम मिरजेतील आधार संस्थेने सुरू केला आहे. शहरात गेल्या वर्षभरात निधन झालेल्या नागरिकांची माहिती संस्थेकडे संकलित करण्यात येते. संस्थेचे कार्यकर्ते याची नोंद ठेवतात व दिवाळीपूर्वी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातूनही माहिती घेण्यात येते. व्यक्तीचे निधन झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन संस्थेचे कार्यकर्ते फराळाचे साहित्य व सांत्वन पत्र देतात. संस्थेचे मोहन वाटवे, मकरंद देशपांडे, अमित पटवर्धन, प्रसन्न चिप्पलकट्टी, वाय. सी. कुलकर्र्णी यासाठी प्रयत्न करतात. (वार्ताहर)