शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दु:खातील कुटुंबांना दिला ‘आधार’

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

फराळाचे वाटप : मिरजेत आधार संस्थेचा उपक्रम

मिरज : एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर वर्षभर त्या कुटुंबात कोणताही सण साजरा केला जात नाही. अशा दु:खी कुटुंबांना मिरजेतील आधार संस्थेतर्फे मागील सात वर्षांपासून दिवाळीत फराळ वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या संस्थेतर्फे फराळाचे साहित्य देऊन त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचा आधार दिला जात आहे. भारतीय समाजात दिवाळी सणाला मोठे महत्त्व आहे. फराळाचे विविध पदार्थ बनवून कुटुंबातील सदस्य, मित्र व नातेवाईकांसह त्याचा आस्वाद घेऊन दिवाळी सण साजरा करण्यात येतो. मात्र एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास दु:खामुळे वर्षभर त्या कुटुंबात दिवाळीसह इतरही सण साजरे केले जात नाहीत. अशावेळी त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याकडून फराळाचे साहित्य देण्याची प्रथा आहे. मात्र बदलत्या परिस्थितीत कुटुंबातील दुरावा वाढल्याने ही प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहे. दु:खात असलेल्यांना आधार देण्याची ही प्रथा जिवंत ठेवण्यासाठी फराळाचे पदार्थ देण्याचा उपक्रम मिरजेतील आधार संस्थेने सुरू केला आहे. शहरात गेल्या वर्षभरात निधन झालेल्या नागरिकांची माहिती संस्थेकडे संकलित करण्यात येते. संस्थेचे कार्यकर्ते याची नोंद ठेवतात व दिवाळीपूर्वी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातूनही माहिती घेण्यात येते. व्यक्तीचे निधन झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन संस्थेचे कार्यकर्ते फराळाचे साहित्य व सांत्वन पत्र देतात. संस्थेचे मोहन वाटवे, मकरंद देशपांडे, अमित पटवर्धन, प्रसन्न चिप्पलकट्टी, वाय. सी. कुलकर्र्णी यासाठी प्रयत्न करतात. (वार्ताहर)