शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक नेत्यांमुळेच कोंडीत!

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

वाळवा-शिराळ्याचे चित्र : राजू शेट्टी, जयंतरावांकडे लक्ष, गळीत हंगामावर प्रश्नचिन्ह

अशोक पाटील - इस्लामपूर--साखर कारखानदारांचे नेते आमदार जयंत पाटील ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यास आग्रही आहेत, परंतु त्यांच्या स्वत:च्याच राजारामबापू कारखान्याने एकरकमी एफआरपी दिलेली नाही, तर दुसरीकडे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एफआरपीसाठी आंदोलनाचा फड पेटवण्याच्या तयारीत आहेत. तथापि स्वाभिमानीच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भूमिका बदलली असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरच तोफ डागली आहे. गळीत हंगामाआधी स्वाभिमानी संघटना एफआरपी दरासाठी आंदोलनाचा फड पेटवण्याच्या तयारीला लागली आहे, तर दुसरीकडे वाळवा, शिराळ्यातील साखर कारखानदारांचे नेते आमदार जयंत पाटील यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत गळीत हंगाम सुरू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.यावर्षी पावसाने दडी मारली आहे. विहिरी, नदीला कमी प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे ऊस जगवण्याची कसरत करावी लागत आहे. कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस नेणे गरजेचे आहे. परंतु आमदार पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. या दोघांच्या भूमिकेमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे.वारणा-कृष्णा खोऱ्यात ऊस उत्पादकांची संख्या मोठी आहे. सध्या त्यांच्या हातात उसाचे पैसे पडले नसल्याने दिवाळीची खरेदी अद्याप झालेली नाही. त्यामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. पतसंस्था, खासगी सावकारांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे पैशाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे.ऊस गेला शेजारच्या जिल्ह्यातया परिसरातील बहुतांशी बड्या शेतकऱ्यांनी परिसरातील कारखाना सुरू होण्याअगोदरच शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पाठवला आहे. सभासदांच्या उसाला वेळेत तोड मिळाली नाही, तर बाहेरचे कारखाने ऊस पळवणारच. जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या चुकीच्या धोरणामुळे आता शेतकरी ऊस सोडून इतर पिकांकडे वळू लागला आहे.पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील पाणीसाठा कमी झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत ऊस गळितासाठी गेला पाहिजे. शासनाने जाहीर केलेली एफआरपी मिळणारच आहे. ती टप्प्या-टप्प्याने मिळाली तरी गैर नाही. नुसत्या एफआरपीसाठी आंदोलन करणे म्हणजे शेट्टी आणि खोत यांचा ढोंगीपणा आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी ते आता ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन सरकारला भीती दाखवत आहेत.- बी. जी. पाटील, संस्थापक, बळिराजा संघटना.