शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक नेत्यांमुळेच कोंडीत!

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

वाळवा-शिराळ्याचे चित्र : राजू शेट्टी, जयंतरावांकडे लक्ष, गळीत हंगामावर प्रश्नचिन्ह

अशोक पाटील - इस्लामपूर--साखर कारखानदारांचे नेते आमदार जयंत पाटील ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यास आग्रही आहेत, परंतु त्यांच्या स्वत:च्याच राजारामबापू कारखान्याने एकरकमी एफआरपी दिलेली नाही, तर दुसरीकडे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एफआरपीसाठी आंदोलनाचा फड पेटवण्याच्या तयारीत आहेत. तथापि स्वाभिमानीच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भूमिका बदलली असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरच तोफ डागली आहे. गळीत हंगामाआधी स्वाभिमानी संघटना एफआरपी दरासाठी आंदोलनाचा फड पेटवण्याच्या तयारीला लागली आहे, तर दुसरीकडे वाळवा, शिराळ्यातील साखर कारखानदारांचे नेते आमदार जयंत पाटील यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत गळीत हंगाम सुरू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.यावर्षी पावसाने दडी मारली आहे. विहिरी, नदीला कमी प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे ऊस जगवण्याची कसरत करावी लागत आहे. कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस नेणे गरजेचे आहे. परंतु आमदार पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. या दोघांच्या भूमिकेमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे.वारणा-कृष्णा खोऱ्यात ऊस उत्पादकांची संख्या मोठी आहे. सध्या त्यांच्या हातात उसाचे पैसे पडले नसल्याने दिवाळीची खरेदी अद्याप झालेली नाही. त्यामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. पतसंस्था, खासगी सावकारांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे पैशाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे.ऊस गेला शेजारच्या जिल्ह्यातया परिसरातील बहुतांशी बड्या शेतकऱ्यांनी परिसरातील कारखाना सुरू होण्याअगोदरच शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पाठवला आहे. सभासदांच्या उसाला वेळेत तोड मिळाली नाही, तर बाहेरचे कारखाने ऊस पळवणारच. जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या चुकीच्या धोरणामुळे आता शेतकरी ऊस सोडून इतर पिकांकडे वळू लागला आहे.पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील पाणीसाठा कमी झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत ऊस गळितासाठी गेला पाहिजे. शासनाने जाहीर केलेली एफआरपी मिळणारच आहे. ती टप्प्या-टप्प्याने मिळाली तरी गैर नाही. नुसत्या एफआरपीसाठी आंदोलन करणे म्हणजे शेट्टी आणि खोत यांचा ढोंगीपणा आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी ते आता ऊस उत्पादकांचे प्रश्न घेऊन सरकारला भीती दाखवत आहेत.- बी. जी. पाटील, संस्थापक, बळिराजा संघटना.