शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

प्रक्रिया सुरू : तीन दिवस प्रवेश, सांगलीतील विविध महाविद्यालयांकडून अर्जांची विक्री

सांगली : दहावीची गुणपत्रके सोमवारी वितरित करण्यात आल्याने मंगळवारी महाविद्यालयात आकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी मंगळवारी शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर पालकांचीही झुंबड उडाली होती. ही प्रवेश प्रक्रिया आता १९ जूनपर्यंत चालणार आहे. अकरावीसाठी १६ ते १९ जूनदरम्यान प्रवेश अर्जांची विक्री व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामुळे शहरातील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, मथुबाई गरवारे महाविद्यालय, जी. ए. कॉलेज, चंपाबेन शहा महाविद्यालय, चिंतामणी महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय आदी ठिकाणी मंगळवारी सकाळपासून गर्दी झाली होती. आज अर्ज स्वीकारण्याची जरी प्रक्रिया सुरु झाली असली तरी, आज केवळ अर्ज वितरितच करण्यात आले. उद्यापासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज देणे व स्वीकारणे शुक्रवारपर्यंत चालणार आहे. २० ते २३ जूनपर्यंत प्रवेश अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तपासणी व गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी २४ जूनरोजी संबंधित महाविद्यालयाच्या फलकावर लावण्यात येणार आहे. त्यानंतर २५ ते २९ जूनदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश शिल्लक राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ३० जून ते १ जुलै दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. पुन्हा रिक्त जागेसाठी व ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना २ ते ३ जुलैपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. अकरावीचे वर्ग ७ जुलैपासून सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)कोणी वंचित राहणार नाहीदहावीच्या परीक्षेस जिल्ह्यातून ६१० शाळांमधील ४२ हजार २३० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र त्यातील ४२ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ३९ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस बसलेल्या २३ हजार ४१९ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ९०७ विद्यार्थी, तर १८ हजार ७१३ विद्यार्थिनींपैकी १७ हजार ८८० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. अकरावी प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांनी दिली.