शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

प्रक्रिया सुरू : तीन दिवस प्रवेश, सांगलीतील विविध महाविद्यालयांकडून अर्जांची विक्री

सांगली : दहावीची गुणपत्रके सोमवारी वितरित करण्यात आल्याने मंगळवारी महाविद्यालयात आकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी मंगळवारी शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर पालकांचीही झुंबड उडाली होती. ही प्रवेश प्रक्रिया आता १९ जूनपर्यंत चालणार आहे. अकरावीसाठी १६ ते १९ जूनदरम्यान प्रवेश अर्जांची विक्री व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामुळे शहरातील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, मथुबाई गरवारे महाविद्यालय, जी. ए. कॉलेज, चंपाबेन शहा महाविद्यालय, चिंतामणी महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय आदी ठिकाणी मंगळवारी सकाळपासून गर्दी झाली होती. आज अर्ज स्वीकारण्याची जरी प्रक्रिया सुरु झाली असली तरी, आज केवळ अर्ज वितरितच करण्यात आले. उद्यापासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज देणे व स्वीकारणे शुक्रवारपर्यंत चालणार आहे. २० ते २३ जूनपर्यंत प्रवेश अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तपासणी व गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी २४ जूनरोजी संबंधित महाविद्यालयाच्या फलकावर लावण्यात येणार आहे. त्यानंतर २५ ते २९ जूनदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश शिल्लक राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ३० जून ते १ जुलै दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. पुन्हा रिक्त जागेसाठी व ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना २ ते ३ जुलैपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. अकरावीचे वर्ग ७ जुलैपासून सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)कोणी वंचित राहणार नाहीदहावीच्या परीक्षेस जिल्ह्यातून ६१० शाळांमधील ४२ हजार २३० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र त्यातील ४२ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ३९ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस बसलेल्या २३ हजार ४१९ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ९०७ विद्यार्थी, तर १८ हजार ७१३ विद्यार्थिनींपैकी १७ हजार ८८० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. अकरावी प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांनी दिली.