शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

प्रक्रिया सुरू : तीन दिवस प्रवेश, सांगलीतील विविध महाविद्यालयांकडून अर्जांची विक्री

सांगली : दहावीची गुणपत्रके सोमवारी वितरित करण्यात आल्याने मंगळवारी महाविद्यालयात आकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी मंगळवारी शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर पालकांचीही झुंबड उडाली होती. ही प्रवेश प्रक्रिया आता १९ जूनपर्यंत चालणार आहे. अकरावीसाठी १६ ते १९ जूनदरम्यान प्रवेश अर्जांची विक्री व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामुळे शहरातील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, मथुबाई गरवारे महाविद्यालय, जी. ए. कॉलेज, चंपाबेन शहा महाविद्यालय, चिंतामणी महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय आदी ठिकाणी मंगळवारी सकाळपासून गर्दी झाली होती. आज अर्ज स्वीकारण्याची जरी प्रक्रिया सुरु झाली असली तरी, आज केवळ अर्ज वितरितच करण्यात आले. उद्यापासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज देणे व स्वीकारणे शुक्रवारपर्यंत चालणार आहे. २० ते २३ जूनपर्यंत प्रवेश अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तपासणी व गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी २४ जूनरोजी संबंधित महाविद्यालयाच्या फलकावर लावण्यात येणार आहे. त्यानंतर २५ ते २९ जूनदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश शिल्लक राहिल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ३० जून ते १ जुलै दरम्यान प्रवेश दिला जाणार आहे. पुन्हा रिक्त जागेसाठी व ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना २ ते ३ जुलैपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. अकरावीचे वर्ग ७ जुलैपासून सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)कोणी वंचित राहणार नाहीदहावीच्या परीक्षेस जिल्ह्यातून ६१० शाळांमधील ४२ हजार २३० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र त्यातील ४२ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ३९ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस बसलेल्या २३ हजार ४१९ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ९०७ विद्यार्थी, तर १८ हजार ७१३ विद्यार्थिनींपैकी १७ हजार ८८० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. अकरावी प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर यादव यांनी दिली.