शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST

फोटो - सुरेंद्र दुपटे शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करीत एसटी महामंडळाने रातराणी गाड्या ...

फोटो - सुरेंद्र दुपटे

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करीत एसटी महामंडळाने रातराणी गाड्या सुरू केल्या खऱ्या पण अजूनही या गाड्यांना प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. रातराणी बसेस रिकाम्याच धावत आहेत. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स मात्र हाऊसफुल्ल आहेत.

लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळाला गेल्या तीन महिन्यात २५ कोटीपेक्षा अधिकचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यात मुंबई, पुणे, हैद्राबाद, शेगाव या मार्गांवर रातराणी बस सुरू केल्या. पण या बसेसला प्रतिसाद नाही. आठवड्यातील तीन दिवस प्रवासी असतात, तर उर्वरित दिवशी प्रवाशांची संख्या अगदीच कमी असते. त्यामुळे शेगाव मार्गावरील रातराणी बस बंद करण्यात आली. खासगी ट्रॅव्हल्स मात्र हैद्राबाद, बंगळुरू, मुंबई, लातूर, नांदेड, औरंगाबाद मार्गावर धावत आहेत. या ट्रॅव्हल्सला मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.

चौकट

एसटीच्या सुरू असलेल्या रातराणी

१. मिरज - मुंबई

२. आटपाडी - हैद्राबाद

३. तासगाव - मुंबई

४. जत - मुंबई

५. सांगली - शेगाव (बंद)

चौकट

एसटीच्या रातराणी सेमी स्लीपर

१. एसटी महामंडळाकडून मुंबई, हैद्राबाद मार्गावर फेऱ्या सुरू आहेत. त्यातील रातराणी बसेस सेमी स्लीपर आहेत. बसमधील १५ सीट या स्लीपर, तर उर्वरित आसन आहेत.

२. जिल्ह्यात शिवनेरीच्या गाड्या नाहीत. पण शिवशाही आहे. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने शिवशाही बंदच आहेत.

चौकट

एसटीबरोबरीने तिकीट

सध्या कोरोनामुळे एसटी व ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. एसटीच्या रातराणीला तसा प्रतिसाद कमी आहे. एसटी व ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरातही फारसा फरक नाही. मुंबईसाठी एसटीकडून ७०० रुपये तिकीट दर आहे, तर ट्रॅव्हल्सकडून गर्दी असेल तर ८०० आणि गर्दी कमी असेल तर ६०० रुपये दर आहे.

चौकट

स्वच्छ व आरामदायी प्रवास म्हणून

१. एसटीच्या बसपेक्षा नेहमीच ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असतो. गाड्या स्वच्छ असतात. गर्दी नसेल तेव्हा एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सचे तिकीट दर कमी केलेले असतात. उलट एसटीचे दर नेहमीच स्थिर असतात. - राजू पटेल

२.एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असला तरी सुरक्षित प्रवासासाठी महामंडळच अधिक चांगले. मुंबई, पुण्यापर्यंतच्या प्रवाशांसाठी एसटीचाच वापर करतो. ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या तिकीट दरात दररोज बदल होतो. त्यापेक्षा एसटीचे दर स्थिर असतात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूकही होत नाही. - संजय चव्हाण