शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

एसटीची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST

फोटो - सुरेंद्र दुपटे शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करीत एसटी महामंडळाने रातराणी गाड्या ...

फोटो - सुरेंद्र दुपटे

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करीत एसटी महामंडळाने रातराणी गाड्या सुरू केल्या खऱ्या पण अजूनही या गाड्यांना प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. रातराणी बसेस रिकाम्याच धावत आहेत. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स मात्र हाऊसफुल्ल आहेत.

लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळाला गेल्या तीन महिन्यात २५ कोटीपेक्षा अधिकचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यात मुंबई, पुणे, हैद्राबाद, शेगाव या मार्गांवर रातराणी बस सुरू केल्या. पण या बसेसला प्रतिसाद नाही. आठवड्यातील तीन दिवस प्रवासी असतात, तर उर्वरित दिवशी प्रवाशांची संख्या अगदीच कमी असते. त्यामुळे शेगाव मार्गावरील रातराणी बस बंद करण्यात आली. खासगी ट्रॅव्हल्स मात्र हैद्राबाद, बंगळुरू, मुंबई, लातूर, नांदेड, औरंगाबाद मार्गावर धावत आहेत. या ट्रॅव्हल्सला मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.

चौकट

एसटीच्या सुरू असलेल्या रातराणी

१. मिरज - मुंबई

२. आटपाडी - हैद्राबाद

३. तासगाव - मुंबई

४. जत - मुंबई

५. सांगली - शेगाव (बंद)

चौकट

एसटीच्या रातराणी सेमी स्लीपर

१. एसटी महामंडळाकडून मुंबई, हैद्राबाद मार्गावर फेऱ्या सुरू आहेत. त्यातील रातराणी बसेस सेमी स्लीपर आहेत. बसमधील १५ सीट या स्लीपर, तर उर्वरित आसन आहेत.

२. जिल्ह्यात शिवनेरीच्या गाड्या नाहीत. पण शिवशाही आहे. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने शिवशाही बंदच आहेत.

चौकट

एसटीबरोबरीने तिकीट

सध्या कोरोनामुळे एसटी व ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. एसटीच्या रातराणीला तसा प्रतिसाद कमी आहे. एसटी व ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरातही फारसा फरक नाही. मुंबईसाठी एसटीकडून ७०० रुपये तिकीट दर आहे, तर ट्रॅव्हल्सकडून गर्दी असेल तर ८०० आणि गर्दी कमी असेल तर ६०० रुपये दर आहे.

चौकट

स्वच्छ व आरामदायी प्रवास म्हणून

१. एसटीच्या बसपेक्षा नेहमीच ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असतो. गाड्या स्वच्छ असतात. गर्दी नसेल तेव्हा एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सचे तिकीट दर कमी केलेले असतात. उलट एसटीचे दर नेहमीच स्थिर असतात. - राजू पटेल

२.एसटीपेक्षा ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी असला तरी सुरक्षित प्रवासासाठी महामंडळच अधिक चांगले. मुंबई, पुण्यापर्यंतच्या प्रवाशांसाठी एसटीचाच वापर करतो. ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या तिकीट दरात दररोज बदल होतो. त्यापेक्षा एसटीचे दर स्थिर असतात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूकही होत नाही. - संजय चव्हाण