शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ उपकेंद्राचा संघर्ष पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात मंजूर झाल्याने खानापूर घाटमाथा आक्रमक झाला आहे. कोणत्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात मंजूर झाल्याने खानापूर घाटमाथा आक्रमक झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत उपकेंद्र खानापुरातच व्हावे यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींसह विद्यार्थी व सामाजिक संस्थांनी कंबर कसली आहे.

विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी करण्यासाठी २०१४ ला समिती गठित करण्यात आली होती. त्यावेळी या समितीने खानापूर व पेड या दोन गावांतील जागांची पाहणी केली. त्यानंतर समितीने खानापूर येथील जागा सोईस्कर असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडे २०१५ ला उपकेंद्राच्या उभारणीसाठी जागा आरक्षित करण्याचे पत्र दिले. मात्र, त्याबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या समितीने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन जागा आरक्षित करण्याची आठवण करून दिली. परंतु, या उपकेंद्राच्या उभारणीचा प्रश्न प्रलंबित राहिला.

दरम्यानच्या काळात तासगाव तालुक्यातील काही नेतेमंडळींनी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात, तर काहींनी सांगलीला करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान केल्या. याची माहिती खानापूर घाटमाथ्यावर समजताच सर्वपक्षीय कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आक्रमक झाले. त्यांनी तातडीची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत हे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, यासाठी एकजूट केली. मात्र नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात करण्यासाठी मान्यता दिली. त्यामुळे खानापूरचा घाटमाथा पुन्हा आक्रमक झाला आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित बैठक घेऊन तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट :

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

तासगाव येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विधिमंडळात ताकदीने मांडण्यासाठी आ. अनिल बाबर यांना खानापूर उपकेंद्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने साकडे घातले आहे, तर महाआघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे याबाबतची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. सदाशिवराव पाटील यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.