शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

विद्यापीठ उपकेंद्राचा संघर्ष पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात मंजूर झाल्याने खानापूर घाटमाथा आक्रमक झाला आहे. कोणत्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात मंजूर झाल्याने खानापूर घाटमाथा आक्रमक झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत उपकेंद्र खानापुरातच व्हावे यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींसह विद्यार्थी व सामाजिक संस्थांनी कंबर कसली आहे.

विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी करण्यासाठी २०१४ ला समिती गठित करण्यात आली होती. त्यावेळी या समितीने खानापूर व पेड या दोन गावांतील जागांची पाहणी केली. त्यानंतर समितीने खानापूर येथील जागा सोईस्कर असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडे २०१५ ला उपकेंद्राच्या उभारणीसाठी जागा आरक्षित करण्याचे पत्र दिले. मात्र, त्याबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या समितीने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन जागा आरक्षित करण्याची आठवण करून दिली. परंतु, या उपकेंद्राच्या उभारणीचा प्रश्न प्रलंबित राहिला.

दरम्यानच्या काळात तासगाव तालुक्यातील काही नेतेमंडळींनी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात, तर काहींनी सांगलीला करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान केल्या. याची माहिती खानापूर घाटमाथ्यावर समजताच सर्वपक्षीय कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आक्रमक झाले. त्यांनी तातडीची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत हे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, यासाठी एकजूट केली. मात्र नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात करण्यासाठी मान्यता दिली. त्यामुळे खानापूरचा घाटमाथा पुन्हा आक्रमक झाला आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित बैठक घेऊन तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट :

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

तासगाव येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विधिमंडळात ताकदीने मांडण्यासाठी आ. अनिल बाबर यांना खानापूर उपकेंद्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने साकडे घातले आहे, तर महाआघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे याबाबतची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. सदाशिवराव पाटील यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.