शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ उपकेंद्राचा संघर्ष पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात मंजूर झाल्याने खानापूर घाटमाथा आक्रमक झाला आहे. कोणत्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात मंजूर झाल्याने खानापूर घाटमाथा आक्रमक झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत उपकेंद्र खानापुरातच व्हावे यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींसह विद्यार्थी व सामाजिक संस्थांनी कंबर कसली आहे.

विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी करण्यासाठी २०१४ ला समिती गठित करण्यात आली होती. त्यावेळी या समितीने खानापूर व पेड या दोन गावांतील जागांची पाहणी केली. त्यानंतर समितीने खानापूर येथील जागा सोईस्कर असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडे २०१५ ला उपकेंद्राच्या उभारणीसाठी जागा आरक्षित करण्याचे पत्र दिले. मात्र, त्याबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या समितीने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन जागा आरक्षित करण्याची आठवण करून दिली. परंतु, या उपकेंद्राच्या उभारणीचा प्रश्न प्रलंबित राहिला.

दरम्यानच्या काळात तासगाव तालुक्यातील काही नेतेमंडळींनी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात, तर काहींनी सांगलीला करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान केल्या. याची माहिती खानापूर घाटमाथ्यावर समजताच सर्वपक्षीय कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आक्रमक झाले. त्यांनी तातडीची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत हे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, यासाठी एकजूट केली. मात्र नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात करण्यासाठी मान्यता दिली. त्यामुळे खानापूरचा घाटमाथा पुन्हा आक्रमक झाला आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित बैठक घेऊन तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट :

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

तासगाव येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवावा लागणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विधिमंडळात ताकदीने मांडण्यासाठी आ. अनिल बाबर यांना खानापूर उपकेंद्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाने साकडे घातले आहे, तर महाआघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे याबाबतची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. सदाशिवराव पाटील यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे खानापूर मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.