शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

काँग्रेसच्या यशामागे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST

कडेगाव : महाविकास आघाडी सरकारमध्ये विश्वजित कदम यांना राज्यमंत्री पदी मिळालेली संधी आणि त्यानंतर त्यांनी केलेली कामगिरी, मतदारसंघातील ...

कडेगाव : महाविकास आघाडी सरकारमध्ये विश्वजित कदम यांना राज्यमंत्री पदी

मिळालेली संधी आणि त्यानंतर त्यांनी केलेली कामगिरी, मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन हेच कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामागचे कारण आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता ताब्यात असतानाही भाजपला एकाही ग्रामपंचायतीत सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही, यावर भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

पलूस-कडेगाव मतदारसंघात

गेल्या ३० वर्षांपासून कदम आणि देशमुख गटात सत्तासंघर्ष सुरू आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्याशी देशमुख गटाने झुंज देत गट मजबूत ठेवला. मात्र नुकत्याच झालेल्या नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली. कडेगाव तालुक्यातील रामापूर, येतगाव, शिवणी, कोतिज, कान्हरवाडी या गावात भाजपची सत्ता होती, मात्र काँग्रेसने येथील सत्ता हस्तगत केली. शिरसगाव, सोनकिरे, अंबक आणि ढाणेवाडी या गावात काँग्रेसने सत्ता कायम राखली. यामागे दिवंगत पतंगराव कदम यांनी उभे केलेले विधायक आणि संस्थात्मक काम आणि आमदार मोहनराव कदम यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे.

सोनहिरा कारखान्याने ३१७६ रुपये एकरकमी एफआरपीप्रमाणे ऊस दर दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महापूर आणि नंतर कोरोनाची स्थिती या संकटात जनतेच्या मदतीला धावलेल्या विश्वजित कदम यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. याचा फायदा काँग्रेसला झाला आहे.

चौकट :

‘पदवीधर’च्या अपयशाने निराशा

पुणे पदवीधर निवडणुकीत

भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख यांना

अपयशाला सामोरे जावे लागले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशा होती. ग्रामपंचायत निवडणुकांच्या

मोर्चे बांधणीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांचे फारसे लक्ष नव्हते. अशा स्थितीत बलाढ्य काँग्रेसशी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना एकाही गावात सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही.

फोटो : मोहनराव कदम,डॉ.विश्वजित कदम, पृथ्वीराज देशमुख,संग्रामसिंह देशमुख यांचा फोटो वापरणे