शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांत कठोर पावले उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील गावभेटीमध्ये केले. यावेळी त्यांनी टेस्टिंग वाढविणे, विलगीकरण कक्ष सक्षम करण्याच्या सूचनाही केल्या.

मंत्री पाटील यांनी साखराळे, तांबवे, नेर्ले, पेठ, रेठरे धरण या गावांना भेटी देऊन तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी व गावकऱ्यांना सूचनाही केल्या. आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्यधिकारी डॉ. साकेत पाटील या दौऱ्यात सहभागी झाले होते.

ते म्हणाले, ज्या घरात वेगळी खोली, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे, तिथे विलगीकरण शक्य आहे. मात्र, ज्या घरात अशी व्यवस्था नसेल, त्या घरातील रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षातच यायला हवेत. ज्या कुटुंबात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्या कुटुंबातील, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट व्हायला हवी.

डॉ. चौधरी यांनी घराबाहेर फिरणारे कोरोनाबाधित रुग्ण, गर्दी करणारे, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या, तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचना केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दररोज टेस्टिंग व्हायला हवे. प्रथम संख्या वाढलेली दिसेल. मात्र, त्या-त्या गावात कोरोना आटोक्यात येऊ शकतो.

यावेळी बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, संग्राम पाटील, संजय पाटील, आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, ब्रह्मानंद पाटील, संगीता पाटील, संपतराव पाटील, श्यामराव पाटील उपस्थित होते.