शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांत कठोर पावले उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील गावभेटीमध्ये केले. यावेळी त्यांनी टेस्टिंग वाढविणे, विलगीकरण कक्ष सक्षम करण्याच्या सूचनाही केल्या.

मंत्री पाटील यांनी साखराळे, तांबवे, नेर्ले, पेठ, रेठरे धरण या गावांना भेटी देऊन तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी व गावकऱ्यांना सूचनाही केल्या. आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्यधिकारी डॉ. साकेत पाटील या दौऱ्यात सहभागी झाले होते.

ते म्हणाले, ज्या घरात वेगळी खोली, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे, तिथे विलगीकरण शक्य आहे. मात्र, ज्या घरात अशी व्यवस्था नसेल, त्या घरातील रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षातच यायला हवेत. ज्या कुटुंबात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्या कुटुंबातील, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट व्हायला हवी.

डॉ. चौधरी यांनी घराबाहेर फिरणारे कोरोनाबाधित रुग्ण, गर्दी करणारे, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या, तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचना केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दररोज टेस्टिंग व्हायला हवे. प्रथम संख्या वाढलेली दिसेल. मात्र, त्या-त्या गावात कोरोना आटोक्यात येऊ शकतो.

यावेळी बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, संग्राम पाटील, संजय पाटील, आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, ब्रह्मानंद पाटील, संगीता पाटील, संपतराव पाटील, श्यामराव पाटील उपस्थित होते.