शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कोरोनास्थिती बिघडू नये यासाठी कठोर उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

सांगली : राज्यातील काही भागांत कोरोनास्थिती गंभीर बनत आहे. जिल्ह्यात अद्याप तरी सर्व स्थिती नियंत्रणात असून संख्याही कमी होत ...

सांगली : राज्यातील काही भागांत कोरोनास्थिती गंभीर बनत आहे. जिल्ह्यात अद्याप तरी सर्व स्थिती नियंत्रणात असून संख्याही कमी होत आहे. तरीही कोरोनाविषयक खबरदारी न घेतल्यास गंभीर स्थिती पुन्हा उद्भवू शकते. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजनांवर भर दिला असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आता केवळ दंड वसूल न करता त्यांंच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. नियंत्रणात असलेली कोरोनास्थिती बिघडू नये यासाठी प्रसंगी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.

कोरोना उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी असल्याने सध्या पूर्ण स्थिती नियंत्रणात आहे. पण यामुळे बेफिकीरपणे वागणे बंद झाले पाहिजे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

प्रशासन नियम बनवत असले तरी त्याचे नागरिकांनी पालन करत आपली जबाबदारी दाखवून द्यावी. जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी झाल्याने अनेक जण बिनधास्त फिरत आहेत. असे केल्यास आता कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार सभा, आंदोलने, मोर्चे, मेळावे आदींना पायबंद घालण्यात आला आहे. लग्न समारंभात उपस्थित राहण्यास पन्नास व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक जणांची उपस्थिती लक्षात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यजमानांसह मंगल कार्यालयाच्या मालकांवरही कारवाई होईल. दंडाचीही रक्कम आता २० हजारांपर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.

चौकट

शाळा, महाविद्यालये सुरूच राहणार

जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन हाेत असल्याने सर्व ठिकाणी शाळा सुरूच राहणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.