शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

विटा बसस्थानकातील स्वच्छता कार्यक्रम रोखला

By admin | Updated: November 9, 2014 23:41 IST

आगारप्रमुखांना घेराव : प्रोटोकॉल न पाळल्याच्या कारणावरून वादंग

विटा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शुक्रवारी विटा बसस्थानकात आयोजित केलेला स्वच्छता कार्यक्रम शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा कार्यक्रम राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आयोजित केला असून, तो राजकीय कार्यक्रम नसल्याचे सांगत महामंडळाचे अशासकीय संचालक अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी यशस्वी केला. मात्र, निमंत्रण पत्रिकेत नाव असतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सांगलीतील विभाग नियंत्रक दिलीप कदम यांनी या कार्यक्रमाकडेच पाठ फिरविली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शुक्रवारी ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमास विटा येथून सुरूवात करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अशासकीय सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते व विभाग नियंत्रक दिलीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली विटा बसस्थानकात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापून त्या वितरित करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव नसल्याने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता राजू जाधव, बच्चू नागराळे, जॅक सपकाळ, रवींद्र कदम, शेखर भिंगारदेवे, समीर कदम, हेमंत रोकडे, शिरीष शेटे आदी शिवसैनिकांनी प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल आगारप्रमुख दिलीप पाटील यांना त्यांच्या कार्यालयात घेराओ घातला. त्यांनी हा कार्यक्रम अ‍ॅड. मुळीक यांनी आयोजित केला असून, तो संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यामुळे शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. त्यानंतर अ‍ॅड. मुळीक यांनी उपस्थित शिवसैनिकांना हा देशपातळीवरचा सार्वजनिक कार्यक्रम असून तो राजकीय नसल्याचे सांगून प्रोटोकॉल काय आहे? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. या कार्यक्रमाला प्रोटोकॉलच उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.या प्रकारानंतर शिवसैनिक निघून गेल्यानंतर विटा बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संचालक अ‍ॅड. मुळीक, कामगार नेते बिराज साळुंखे, संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष नाथा रेणुशे, विलास यादव, डेपो सचिव पेंढारी, आगार व्यवस्थापक दिलीप पाटील, स्थानक प्रमुख एच. आर. कोळी, विनायक माळी, कार्यशाळा अधीक्षक पी. एस. शिंदे, दीपक रेडेकर, अ‍ॅड. संदीप मुळीक यांनी हातात झाडू घेऊन बसस्थानकाची स्वच्छता केली. (वार्ताहर)पत्रिकेवरील नावे वगळलीविटा शिवसेनेचे बच्चू नागराळे म्हणाले की, विटा बसस्थानकातील स्वच्छता कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आ. अनिल बाबर, नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे नव्हती. विटा आगाराने प्रोटोकॉल पाळला नसल्याचा जाब विचारल्याचे सांगितले.