शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

लस टंचाईमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST

सांगली : भिलवडी (ता. पलूस) आणि नांद्रे (ता. मिरज) येथील लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुकीचा प्रकार घडला आहे. लस ...

सांगली : भिलवडी (ता. पलूस) आणि नांद्रे (ता. मिरज) येथील लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुकीचा प्रकार घडला आहे. लस टंचाईस आरोग्य कर्मचारी जबाबदार नसतानाही त्यांच्यावर लसीकरण केंद्रावर हात उचलला जात असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. यावर त्वरित तोडगा काढावा, अन्यथा काम बंद करावे लागेल, असा इशारा आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी शुक्रवारी दिला.

ते म्हणाले की, राज्य शासनाकडूनच पुरेशी लस मिळत नाही तर आरोग्य कर्मचारी केंद्रावर कसे उपलब्ध करणार आहेत? लस संपल्यानंतर ग्रामस्थ कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलत आहेत. भिलवडी, नांद्रे लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. लस नसेल तर कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. यापुढे हल्ले सहन करणार नाही. लस टंचाईच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तोडगा काढावा. ऑनलाईन नोंदणीमुळे अन्य गावांतील लोकही नोंदणी करुन लसीसाठी येत आहेत. यामुळे गावातील लोक लसीकरणापासून वंचित राहात असल्यामुळे हा उद्रेक होत आहे. पुरेशा प्रमाणात लस येऊपर्यंत आरोग्य कर्मचारी लसीकरण थांबवतील.

चौकट

ग्रामदक्षता समितीतर्फे नोंदणी करा

गर्दी कमी करण्यासाठी ग्रामदक्षता समितीतर्फे नोंदणी करण्याची गरज आहे. त्यानंतर शासनाकडून जेवढी लस मिळेल, तेवढ्याच कुपनचे ग्रामपंचायतीने वाटप करावे. तेवढ्याच लोकांना लसीकरण केंद्रावर सोडण्यात यावे, असेही दत्तात्रय पाटील म्हणाले.