शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

भिलवडीत महावितरणचा मनमानी कारभार थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार तत्काळ सुधारण्याची गरज आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी

: भिलवडी (ता. पलूस) येथील महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार तत्काळ सुधारण्याची गरज आहे. भारनियमनानंतरही शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा होत नाही. याकडे कुणाचेच लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले की, महावितरणाच्या भिलवडी कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यामुळे रोहित्र जळणे, तांत्रिक दोष काढण्यासाठी कर्मचारी दोन दिवसांतूनही तेथे पोहोचत नाही. अगाप सोयाबीनची लागवड सुरू आहे. ऊस पिकास उन्हाळ्यात वारंवार पाणी द्यावे लागत आहे. भिलवडी व परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणाकडे सुरळीत वीजपुरवठा व्हावा व होणारे नुकसान थांबवावे यासाठी अनेक वेळा तक्रारी देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. वेळेत वीज पुरवठा होत नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. महावितरणने अपुरी कर्मचारी संख्या असल्याने अत्यावश्यक सेवा म्हणून तत्काळ कर्मचारी भरती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संग्राम पाटील, भिलवडीचे माजी सरपंच शहाजी गुरव, चंद्रकांत पाटील, कुमार पाटील, प्रताप पाटील, आदी उपस्थित होते.