शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यात हजारावर ग्रंथपाल ‘पूर्णवेळ’च्या प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 20:42 IST

पंधरा वर्षांच्या मागणीनुसार खासगी अनुदानित शाळांमधील १६१५ पैकी केवळ ६०० अर्धवेळ ग्रंथपालांनाच सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देखासगी अनुदानित शाळांचा प्रश्न : केवळ सहाशे अर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ होणारराज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये २४०९ पूर्णवेळ ग्रंथपाल व २३२२ अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत

- राजेंद्र पाटील

कुरळप (जि. सांगली) : पंधरा वर्षांच्या मागणीनुसार खासगी अनुदानित शाळांमधील १६१५ पैकी केवळ ६०० अर्धवेळ ग्रंथपालांनाच सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु उर्वरित अर्धवेळ ग्रंथपालांची सेवा संपत आली तरी, पूर्णवेळ व्हायची शक्यता दिसत नाही.

राज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये २४०९ पूर्णवेळ ग्रंथपाल व २३२२ अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. अर्धवेळ ग्रंथपालांना सेवा संरक्षण नसल्याने त्यांना पूर्णवेळ ग्रंथपालाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातील १६१५ अर्धवेळ ग्रंथपाल सेवाज्येष्ठतेनुसार पात्र आहेत. मात्र केवळ ६०० ग्रंथपालांनाच पूर्णवेळ केले जाणार आहे. त्यासाठी अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे.

प्रथम नियुक्ती दिनांकानुसार ही सेवाज्येष्ठता ठरणार आहे. दरवर्षी संचमान्यता झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत रिक्त पदांचा आढावा घेण्यात येईल. तसेच पूर्णवेळ ग्रंथपालांची जिल्'ातील रिक्त पदांची संख्याही आरक्षणानुसार ठरवून यादी तयारी केली जाणार आहे. ग्रंथपालांची पदोन्नती करताना त्यास प्रथम तालुकास्तरावर न झाल्यास, जिल्'ात किंवा विभागीय स्तरावर समायोजन केले जाईल.

आॅनलाईन समायोजनाने मिळालेल्या शाळेत हजर न होणाऱ्या ग्रंथपालांना कायम अपात्र ठरविण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.सेवाज्येष्ठनेनुसार हजारावर ग्रंथपालांची सेवा वयोमानानुसार केवळ आठ ते दहा वर्षेच शिल्लक राहिली आहे. मात्र राज्य शासनाने उर्वरित अर्धवेळ ग्रंथपालांसाठी प्रत्येकवर्षी संचमान्यतेची अट घालून, उपलब्ध पदानुसार पूर्णवेळ पदोन्नती देण्याचे ठरवले आहे. तथापि असे करत असताना, बहुसंख्य ग्रंथपाल पूर्णवेळ होण्यापूर्वीच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा अनेकांना लाभ होणार नाही.

आघाडी शासनाच्या काळात चिपळूणकर समितीच्या अहवालानुसार राज्यातील माध्यमिक शाळांना प्रथमच १९९४ मध्ये ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, परिचर अशी विविध शिक्षकेतर पदे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी प्रयोगशाळा सहायक व परिचर ही पदे सेवा संरक्षण देऊन पूर्णवेळ कायम करण्यात आली; तर त्याच चिपळूणकर समितीने शाळेतील एक हजार विद्यार्थी संख्येची अट घालून पूर्णवेळ करण्याचे ठरवले; मात्र यामध्ये माध्यमिक शाळांतील केवळ शंभराच्या घरातच ग्रंथपाल पूर्णवेळ झाले, तर उर्वरित हजारावर ग्रंथपाल २५ वर्षांपासून अर्धवेळ पदावरच कार्यरत आहेत.

राज्य शासन दरवेळी नवनवीन अटी लादत आहे. यामुळे अर्धवेळ ग्रंथपाल ही संकल्पना बंद करण्याची मागणी राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर व राज्य ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली आहे.