शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

राज्यात हजारावर ग्रंथपाल ‘पूर्णवेळ’च्या प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 20:42 IST

पंधरा वर्षांच्या मागणीनुसार खासगी अनुदानित शाळांमधील १६१५ पैकी केवळ ६०० अर्धवेळ ग्रंथपालांनाच सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देखासगी अनुदानित शाळांचा प्रश्न : केवळ सहाशे अर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ होणारराज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये २४०९ पूर्णवेळ ग्रंथपाल व २३२२ अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत

- राजेंद्र पाटील

कुरळप (जि. सांगली) : पंधरा वर्षांच्या मागणीनुसार खासगी अनुदानित शाळांमधील १६१५ पैकी केवळ ६०० अर्धवेळ ग्रंथपालांनाच सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु उर्वरित अर्धवेळ ग्रंथपालांची सेवा संपत आली तरी, पूर्णवेळ व्हायची शक्यता दिसत नाही.

राज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये २४०९ पूर्णवेळ ग्रंथपाल व २३२२ अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. अर्धवेळ ग्रंथपालांना सेवा संरक्षण नसल्याने त्यांना पूर्णवेळ ग्रंथपालाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातील १६१५ अर्धवेळ ग्रंथपाल सेवाज्येष्ठतेनुसार पात्र आहेत. मात्र केवळ ६०० ग्रंथपालांनाच पूर्णवेळ केले जाणार आहे. त्यासाठी अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे.

प्रथम नियुक्ती दिनांकानुसार ही सेवाज्येष्ठता ठरणार आहे. दरवर्षी संचमान्यता झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत रिक्त पदांचा आढावा घेण्यात येईल. तसेच पूर्णवेळ ग्रंथपालांची जिल्'ातील रिक्त पदांची संख्याही आरक्षणानुसार ठरवून यादी तयारी केली जाणार आहे. ग्रंथपालांची पदोन्नती करताना त्यास प्रथम तालुकास्तरावर न झाल्यास, जिल्'ात किंवा विभागीय स्तरावर समायोजन केले जाईल.

आॅनलाईन समायोजनाने मिळालेल्या शाळेत हजर न होणाऱ्या ग्रंथपालांना कायम अपात्र ठरविण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.सेवाज्येष्ठनेनुसार हजारावर ग्रंथपालांची सेवा वयोमानानुसार केवळ आठ ते दहा वर्षेच शिल्लक राहिली आहे. मात्र राज्य शासनाने उर्वरित अर्धवेळ ग्रंथपालांसाठी प्रत्येकवर्षी संचमान्यतेची अट घालून, उपलब्ध पदानुसार पूर्णवेळ पदोन्नती देण्याचे ठरवले आहे. तथापि असे करत असताना, बहुसंख्य ग्रंथपाल पूर्णवेळ होण्यापूर्वीच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा अनेकांना लाभ होणार नाही.

आघाडी शासनाच्या काळात चिपळूणकर समितीच्या अहवालानुसार राज्यातील माध्यमिक शाळांना प्रथमच १९९४ मध्ये ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, परिचर अशी विविध शिक्षकेतर पदे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी प्रयोगशाळा सहायक व परिचर ही पदे सेवा संरक्षण देऊन पूर्णवेळ कायम करण्यात आली; तर त्याच चिपळूणकर समितीने शाळेतील एक हजार विद्यार्थी संख्येची अट घालून पूर्णवेळ करण्याचे ठरवले; मात्र यामध्ये माध्यमिक शाळांतील केवळ शंभराच्या घरातच ग्रंथपाल पूर्णवेळ झाले, तर उर्वरित हजारावर ग्रंथपाल २५ वर्षांपासून अर्धवेळ पदावरच कार्यरत आहेत.

राज्य शासन दरवेळी नवनवीन अटी लादत आहे. यामुळे अर्धवेळ ग्रंथपाल ही संकल्पना बंद करण्याची मागणी राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर व राज्य ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली आहे.