शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगलीत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचे नीट परीक्षा केंद्र सुुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:25 IST

सांगली : एनटीएच्यावतीने घेतली जाणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी देतात. परीक्षेसाठी त्यांना अन्य जिल्ह्यांत जावे लागते. ...

सांगली : एनटीएच्यावतीने घेतली जाणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी देतात. परीक्षेसाठी त्यांना अन्य जिल्ह्यांत जावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व जिल्ह्यातील परीक्षार्थींची मोठी संख्या पाहता नीट परीक्षेचे केंद्र सांगलीत करण्याची मागणी जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी केली आहे.

ॲड. शिंदे यांनी सांगितले की, या परीक्षेतून एमबीबीएस, बीडीएस यासह आयुष विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. व्हेटर्नरी शिक्षणक्रम, शासकीय, अनुदानित व खासगी महाविद्यालयांतील बीपीटीएच, बीपीओ, बीएएसपीएल, बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठीही परीक्षा आवश्यक आहे. जिल्ह्यात ८ अभियांत्रिकी, ३ एमबीबीएस, २ बीडीएस, ३ बीएएमएस, ३ बीएचएमएस तसेच फार्मसी, आर्किटेक्चर महाविद्यालये आहेत. त्यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या परीक्षा जिल्ह्यात होतात. एकूण १४८ महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कोल्हापूर, पुण्याला जावे लागते.

ॲड. शिंदे यांनी यासाठी नीटच्या संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे. पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. यावेळी डाॅ. विशाल मगदूम उपस्थित होते.

निवेदनावर ॲड. अरुणा शिंदे, अमित पंडित, डाॅ. कल्याणी जगदाळे-बावचकर, प्रा. योगेश पाटील, संभाजी पोळ, किरण एरंडोले, प्रा. रोहित कुंभारकर यांच्याही सह्या आहेत.

चौकट

वीस हजारांवर विद्यार्थी

सध्या कोरोना व लॉकडाऊन काळात हा प्रवास धोकादायक आहे. गेल्यावर्षीही परीक्षेला हजर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. हे पाहता सांगली जिल्ह्यातच परीक्षा केंद्रे सुरू करणे सर्वांसाठी योग्य व सुरक्षित ठरणार आहे. सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी यंदा परीक्षेला बसतील असा अंदाज आहे. शेजारच्या कोल्हापूरमधील काही शहरांतूनही विद्यार्थी सांगलीला येऊ शकतात, त्यामुळे त्यांची संख्या २० हजारांवर जाऊ शकते. त्यांच्यासाठी सांगली हे केंद्र सोयीचे ठरेल.