शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘अनमोल गोष्टी सांगा’ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: December 24, 2015 00:50 IST

‘लोकमत बाल विकास मंच’चे आयोजन : इस्लामपुरात तीन गटात १८८ स्पर्धकांचा सहभाग

इस्लामपूर : ‘लोकमत’ बालविकास मंच आणि स्वराज्य फौंडेशनच्यावतीने ‘अनमोल गोष्टी’ स्पर्धा उत्साहात झाल्या. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत १८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कष्टाचे फळ, पर्यावरण, श्रध्दा, खरे बोल, वृक्षारोपण, पालकांवरील विश्वास अशा वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धकांनी गोष्टी सांगितल्या.येथील यशवंत हायस्कूलमध्ये या स्पर्धा झाल्या. नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्वराज्यच्या अध्यक्षा संगीता शहा, मुख्याध्यापक डी. टी. पाटील, आर. पी. बल्लाळ, संदेश शहा, कविता शहा उपस्थित होते.झिंजाड म्हणाले, ‘लोकमत’ बालविकास मंचच्या या व्यासपीठामुळे गोष्टी सांगण्याच्या मुलांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला प्रोत्साहन मिळत आहे. आजीच्या गोष्टींचा हा अनमोल ठेवा जपण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते नववी अशा तीन गटात झाल्या. स्पर्धकांनी दोन मिनिटांच्या अवधित तात्पर्यासह गोष्टी सांगून उपस्थितांना थक्क करुन सोडले. स्पर्धकांनी सर्व विषयांवरील गोष्टींचे सदारीकरण केले. माजी मुख्याध्यापक अण्णासाहेब यादव, डी. बी. पाटील, गौरी परमणे, रोमा पारेख यांनी परीक्षण केले.स्पर्धेतील विजेत्यांना जय जिनेंद्र गु्रपचे राकेश कोठारी, नीलेश शहा, राहुल पारेख, भूषण शहा यांच्याहस्ते अनुक्रमे एक हजार, ५0१ व ३0१ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नैना शहा, पल्लवी शहा, नेहा शहा यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर) स्पर्धेतील गटनिहाय विजेते : श्रावणी तोडकर (प्रथम), आर्यन मोरे (द्वितीय), प्रांजली पाटील (तृतीय). चौथी ते सहावी- श्रावणी जाधव (प्रथम), स्वप्नील केसरे (द्वितीय), सम्राज्ञी दळवी (तृतीय). सातवी ते नववी- अभिषेक पाटील (प्रथम), शर्वरी पाटील (द्वितीय) व अभिषेक रोकडे (तृतीय).