शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा दर महिन्यात तीन हजाराने उतरला; शेतकरी म्हणतात, आता काय करू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST

सांगली : अतिवृष्टीमुळे ५० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित सोयाबीन शेतातून विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर ...

सांगली : अतिवृष्टीमुळे ५० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित सोयाबीन शेतातून विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर उतरले आहेत. आणखी किती दर खाली येणार हे माहीत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे जबर फटका बसला आहे.

भारत सरकारने विदेशातून १२ लाख टन जनुकीय सोयाबीन आणि सोयाबीन पेंड आयात केली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव प्रचंड कोसळले आहेत. सोयाबीनला ऑगस्टमध्ये प्रतिक्विंटल ८९४६ रुपये दर होता. सरकारने सोयाबीनची आयात करताच दि.२५ सप्टेंबररोजी ५७५० रुपये दर झाला आहे. क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर उतरला आहे. दरातील या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.

चौकट

सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल

महिना दर

जानेवारी २०२० : ४२१३

जून २०२० : ३८१४

ऑक्टोबर २०२० : ३९४४

जानेवारी २०२१ : ५०५८

जून २०२१ : ७१३०

सप्टेंबर २०२१ : ५७५०

चौकट

सोयाबीन पेरणी हेक्टरमध्ये

२०१८ : ५८८००

२०१९ : ५७१६१

२०२० : ४५१००

२०२१ : ५१७५५

चौकट

खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करु ?

कोट

अतिवृष्टीतून थोडेच सोयाबीनच पीक हाती लागले आहे. शेतात उभे असताना आठ-नऊ हजाराचा दर होता. आता काढणी करावयाची आहे, तर दर अर्ध्यावर आला आहे. आजच्या दरामध्ये वीस हजारही येणार नाहीत. पेरणीचा खर्चही निघणार नाही, परिस्थिती आहे.

- श्रीअंश लिंबीकाई, शेतकरी.

कोट

सध्या सोयाबीनचा दर पाच हजाराच्या आसपास आहे. यास काढायला साडेचार हजार रुपये लागत आहेत. मळणीही महागली आहे. दर वाढला म्हणून मजूर जादा पैसे घेत आहेत. असे असताना सोयाबीन तर कमी दरात विक्री होत आहे. प्रत्येक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाची शिक्षा भोगत आहे.

- विष्णू कदम, शेतकरी.

चौकट

विकण्याची घाई करू नका!

कोट

भारत सरकारने विदेशातील १२ लाख टन जनुकीय सोयाबीन आणि सोयाबीन पेंड आयात केल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. सध्या नवीन सोयाबीचीही आवक चालू झाली आहे. या सोयाबीनमध्ये मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्यामुळे कमी दराने खरेदी होत आहे.

-महावीर पाटील, व्यापारी.

कोट

बाजारभावाची चढ-उतार सामान्य व्यापाऱ्यांच्या आकलनाबाहेरची आहे. सोयाबीनला चांगला दर मिळत होता, तोपर्यंत केंद्र सरकारने आयात केली. यामुळे आठवड्यात अडीच हजाराने दर उतरले आहेत. भविष्यातील दराचेही काहीच सांगता येत नाही. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करु नये.

-महादेव कोरे, व्यापारी.