शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

सोयाबीनचा दर महिन्यात तीन हजाराने उतरला; शेतकरी म्हणतात, आता काय करू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST

सांगली : अतिवृष्टीमुळे ५० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित सोयाबीन शेतातून विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर ...

सांगली : अतिवृष्टीमुळे ५० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित सोयाबीन शेतातून विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर उतरले आहेत. आणखी किती दर खाली येणार हे माहीत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे जबर फटका बसला आहे.

भारत सरकारने विदेशातून १२ लाख टन जनुकीय सोयाबीन आणि सोयाबीन पेंड आयात केली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव प्रचंड कोसळले आहेत. सोयाबीनला ऑगस्टमध्ये प्रतिक्विंटल ८९४६ रुपये दर होता. सरकारने सोयाबीनची आयात करताच दि.२५ सप्टेंबररोजी ५७५० रुपये दर झाला आहे. क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर उतरला आहे. दरातील या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.

चौकट

सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल

महिना दर

जानेवारी २०२० : ४२१३

जून २०२० : ३८१४

ऑक्टोबर २०२० : ३९४४

जानेवारी २०२१ : ५०५८

जून २०२१ : ७१३०

सप्टेंबर २०२१ : ५७५०

चौकट

सोयाबीन पेरणी हेक्टरमध्ये

२०१८ : ५८८००

२०१९ : ५७१६१

२०२० : ४५१००

२०२१ : ५१७५५

चौकट

खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करु ?

कोट

अतिवृष्टीतून थोडेच सोयाबीनच पीक हाती लागले आहे. शेतात उभे असताना आठ-नऊ हजाराचा दर होता. आता काढणी करावयाची आहे, तर दर अर्ध्यावर आला आहे. आजच्या दरामध्ये वीस हजारही येणार नाहीत. पेरणीचा खर्चही निघणार नाही, परिस्थिती आहे.

- श्रीअंश लिंबीकाई, शेतकरी.

कोट

सध्या सोयाबीनचा दर पाच हजाराच्या आसपास आहे. यास काढायला साडेचार हजार रुपये लागत आहेत. मळणीही महागली आहे. दर वाढला म्हणून मजूर जादा पैसे घेत आहेत. असे असताना सोयाबीन तर कमी दरात विक्री होत आहे. प्रत्येक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाची शिक्षा भोगत आहे.

- विष्णू कदम, शेतकरी.

चौकट

विकण्याची घाई करू नका!

कोट

भारत सरकारने विदेशातील १२ लाख टन जनुकीय सोयाबीन आणि सोयाबीन पेंड आयात केल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. सध्या नवीन सोयाबीचीही आवक चालू झाली आहे. या सोयाबीनमध्ये मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्यामुळे कमी दराने खरेदी होत आहे.

-महावीर पाटील, व्यापारी.

कोट

बाजारभावाची चढ-उतार सामान्य व्यापाऱ्यांच्या आकलनाबाहेरची आहे. सोयाबीनला चांगला दर मिळत होता, तोपर्यंत केंद्र सरकारने आयात केली. यामुळे आठवड्यात अडीच हजाराने दर उतरले आहेत. भविष्यातील दराचेही काहीच सांगता येत नाही. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करु नये.

-महादेव कोरे, व्यापारी.