शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सोयाबीनचा दर महिन्यात तीन हजाराने उतरला; शेतकरी म्हणतात, आता काय करू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST

सांगली : अतिवृष्टीमुळे ५० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित सोयाबीन शेतातून विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर ...

सांगली : अतिवृष्टीमुळे ५० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. उर्वरित सोयाबीन शेतातून विक्रीसाठी बाजारात येण्यापूर्वीच क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर उतरले आहेत. आणखी किती दर खाली येणार हे माहीत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे जबर फटका बसला आहे.

भारत सरकारने विदेशातून १२ लाख टन जनुकीय सोयाबीन आणि सोयाबीन पेंड आयात केली आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव प्रचंड कोसळले आहेत. सोयाबीनला ऑगस्टमध्ये प्रतिक्विंटल ८९४६ रुपये दर होता. सरकारने सोयाबीनची आयात करताच दि.२५ सप्टेंबररोजी ५७५० रुपये दर झाला आहे. क्विंटलला ३१९६ रुपयांनी दर उतरला आहे. दरातील या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.

चौकट

सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल

महिना दर

जानेवारी २०२० : ४२१३

जून २०२० : ३८१४

ऑक्टोबर २०२० : ३९४४

जानेवारी २०२१ : ५०५८

जून २०२१ : ७१३०

सप्टेंबर २०२१ : ५७५०

चौकट

सोयाबीन पेरणी हेक्टरमध्ये

२०१८ : ५८८००

२०१९ : ५७१६१

२०२० : ४५१००

२०२१ : ५१७५५

चौकट

खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करु ?

कोट

अतिवृष्टीतून थोडेच सोयाबीनच पीक हाती लागले आहे. शेतात उभे असताना आठ-नऊ हजाराचा दर होता. आता काढणी करावयाची आहे, तर दर अर्ध्यावर आला आहे. आजच्या दरामध्ये वीस हजारही येणार नाहीत. पेरणीचा खर्चही निघणार नाही, परिस्थिती आहे.

- श्रीअंश लिंबीकाई, शेतकरी.

कोट

सध्या सोयाबीनचा दर पाच हजाराच्या आसपास आहे. यास काढायला साडेचार हजार रुपये लागत आहेत. मळणीही महागली आहे. दर वाढला म्हणून मजूर जादा पैसे घेत आहेत. असे असताना सोयाबीन तर कमी दरात विक्री होत आहे. प्रत्येक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाची शिक्षा भोगत आहे.

- विष्णू कदम, शेतकरी.

चौकट

विकण्याची घाई करू नका!

कोट

भारत सरकारने विदेशातील १२ लाख टन जनुकीय सोयाबीन आणि सोयाबीन पेंड आयात केल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. सध्या नवीन सोयाबीचीही आवक चालू झाली आहे. या सोयाबीनमध्ये मॉईश्चरचे प्रमाण जास्त असल्यामुळे कमी दराने खरेदी होत आहे.

-महावीर पाटील, व्यापारी.

कोट

बाजारभावाची चढ-उतार सामान्य व्यापाऱ्यांच्या आकलनाबाहेरची आहे. सोयाबीनला चांगला दर मिळत होता, तोपर्यंत केंद्र सरकारने आयात केली. यामुळे आठवड्यात अडीच हजाराने दर उतरले आहेत. भविष्यातील दराचेही काहीच सांगता येत नाही. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करु नये.

-महादेव कोरे, व्यापारी.