शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:25 IST

सांगली : जूनच्या सुरुवातीस दणक्यात प्रारंभ करणाऱ्या पावसामध्ये अद्यापही खंड सुरुच आहे. शासकीय दफ्तरी मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १३३.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्यक्षात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा चिंतेत आहे.जिल्ह्यात अद्याप सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. पेरणीअभावी बियाणे आणि खतांची गोदामे फुल्ल असून कोट्यवधी रुपयांचा माल ...

सांगली : जूनच्या सुरुवातीस दणक्यात प्रारंभ करणाऱ्या पावसामध्ये अद्यापही खंड सुरुच आहे. शासकीय दफ्तरी मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १३३.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्यक्षात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा चिंतेत आहे.जिल्ह्यात अद्याप सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. पेरणीअभावी बियाणे आणि खतांची गोदामे फुल्ल असून कोट्यवधी रुपयांचा माल पडून असल्याचे चित्र दिसत आहे. ६० हेक्टरवर भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरीची पेरणी झाली आहे.दररोजच्या नवीन हवामान अंदाजामुळे बळीराजा मात्र चांगलाच गोंधळला आहे. यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून मिळाल्यानंतर सर्वांना अपेक्षा होती ती दमदार पावसाची. परंतु नवीन अंदाजानुसार मान्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागामार्फत वर्तविले जात आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही पाऊस न पडल्याने पेरण्यांवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात चालूवर्षी खरीप हंगामासाठी दोन लाख ९० हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्यावतीने तयारी सुरु केली होती. ज्वारीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापाठोपाठ सोयाबीनचा ५८ हजार ८०० हेक्टरवर पेरा होईल. हंगामासाठी सव्वा लाख टन खत लागेल. युरिया, डीएपी, एस.एस.पी., एमओपी, याशिवाय अन्य मिश्रखते मागविण्यात आली आहेत. मागणीनुसार निम्म्याहून अधिक खताचा पुरवठा झाला आहे. परंतु पावसाअभावी खत पडून राहिल्याचे दिसून येते. पेरण्यांसाठी ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली आहे. सरकारी व खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाणांचा पुरवठा सुरु झाला आहे.जिल्ह्यात सुमारे साठ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांचा समावेश आहे. शिराळ्यात भाताची धूळवाफेवर पेरणी झाली. वाळवा, पलूस, मिरज पश्चिम भाग या नदीकाठावर सोयाबीन आणि भुईमुगाची टोकण पूर्ण झाली आहे. परंतु पाऊस नसल्याने वाढीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी जमिनीची मशागत शेतकºयांनी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी २७ जून २०१७ अखेर सरासरी ८९.८ टक्के, तर यावर्षी याच तारखेला दि. २७ जून २०१८ अखेरपर्यंत १३३.४ टक्के पाऊस पडला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकºयांनी पाऊस नसल्यामुळे पेरण्या थांबविल्या आहेत. मृग नक्षत्र सुरु होऊन सात-आठ दिवस उलटल्यानंतर देखील पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही.पिकांसह कडधान्याच्या पेरण्या करतात, परंतु पाऊस नसल्याने याचा परिणाम उत्पादनावरही होऊन उत्पादनात घट होणार आहे. जून महिन्यातील मृग नक्षत्र हे खरिपातील पेरण्यांसाठी पोषक वातावरण असलेले नक्षत्र मानले जाते. साधारणपणे जून महिन्यात पेरणीयोग्य जोरदार पाऊस झाला, तर शेतकरी पेरणीस सुरुवात करतो. जून महिन्यात पिकाची पेरणी झाली की मग ही पिके वेळेत येतात. पुढील रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थित नियोजन करता येते. त्यामुळे जून महिन्यात पेरणी करण्याकडे शेतकºयांचा जास्त कल असतो. नक्षत्राच्या कालावधीनुसार पिकांची पेरणी केल्यास पिके रोगराईला बळी न पडता उत्पन्नही चांगले मिळते, असे अनेक शेतकºयांचे मत आहे.जिल्ह्यातील पाऊस(सरासरी टक्केवारी)तालुका २७ जून २०१७ २७ जून २०१८मिरज ४७.५ १८१.७जत १४९.९ ११८.५खानापूर ७२.३ १६९.१वाळवा ६२.६ ९५.७तासगाव ४९.२ ५८.१शिराळा ७५.७ १०७.९आटपाडी २१७.१ १२३.२क़महांकाळ २५९.२ १०२.६पलूस ५४.२ ४२.४कडेगाव ६९.३ ४८खतांची गोदामे फुल्लखरीप हंगामासाठी दोन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी सव्वा लाख मेट्रिक टन खत लागणार आहे. याशिवाय ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली. हंगामासाठी कृषी सेवा केंद्रांची खते आणि बियाणांची गोदामे फुल्ल आहेत. परंतु आतापर्यंत अवघ्या दहा टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस नसल्याने पेरण्या पूर्णपणे थांबल्या असल्याने गोदामातील बियाणे आणि खते पडून असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.