शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:25 IST

सांगली : जूनच्या सुरुवातीस दणक्यात प्रारंभ करणाऱ्या पावसामध्ये अद्यापही खंड सुरुच आहे. शासकीय दफ्तरी मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १३३.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्यक्षात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा चिंतेत आहे.जिल्ह्यात अद्याप सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. पेरणीअभावी बियाणे आणि खतांची गोदामे फुल्ल असून कोट्यवधी रुपयांचा माल ...

सांगली : जूनच्या सुरुवातीस दणक्यात प्रारंभ करणाऱ्या पावसामध्ये अद्यापही खंड सुरुच आहे. शासकीय दफ्तरी मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १३३.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्यक्षात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा चिंतेत आहे.जिल्ह्यात अद्याप सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. पेरणीअभावी बियाणे आणि खतांची गोदामे फुल्ल असून कोट्यवधी रुपयांचा माल पडून असल्याचे चित्र दिसत आहे. ६० हेक्टरवर भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरीची पेरणी झाली आहे.दररोजच्या नवीन हवामान अंदाजामुळे बळीराजा मात्र चांगलाच गोंधळला आहे. यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून मिळाल्यानंतर सर्वांना अपेक्षा होती ती दमदार पावसाची. परंतु नवीन अंदाजानुसार मान्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागामार्फत वर्तविले जात आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही पाऊस न पडल्याने पेरण्यांवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात चालूवर्षी खरीप हंगामासाठी दोन लाख ९० हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्यावतीने तयारी सुरु केली होती. ज्वारीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापाठोपाठ सोयाबीनचा ५८ हजार ८०० हेक्टरवर पेरा होईल. हंगामासाठी सव्वा लाख टन खत लागेल. युरिया, डीएपी, एस.एस.पी., एमओपी, याशिवाय अन्य मिश्रखते मागविण्यात आली आहेत. मागणीनुसार निम्म्याहून अधिक खताचा पुरवठा झाला आहे. परंतु पावसाअभावी खत पडून राहिल्याचे दिसून येते. पेरण्यांसाठी ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली आहे. सरकारी व खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाणांचा पुरवठा सुरु झाला आहे.जिल्ह्यात सुमारे साठ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांचा समावेश आहे. शिराळ्यात भाताची धूळवाफेवर पेरणी झाली. वाळवा, पलूस, मिरज पश्चिम भाग या नदीकाठावर सोयाबीन आणि भुईमुगाची टोकण पूर्ण झाली आहे. परंतु पाऊस नसल्याने वाढीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी जमिनीची मशागत शेतकºयांनी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी २७ जून २०१७ अखेर सरासरी ८९.८ टक्के, तर यावर्षी याच तारखेला दि. २७ जून २०१८ अखेरपर्यंत १३३.४ टक्के पाऊस पडला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकºयांनी पाऊस नसल्यामुळे पेरण्या थांबविल्या आहेत. मृग नक्षत्र सुरु होऊन सात-आठ दिवस उलटल्यानंतर देखील पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही.पिकांसह कडधान्याच्या पेरण्या करतात, परंतु पाऊस नसल्याने याचा परिणाम उत्पादनावरही होऊन उत्पादनात घट होणार आहे. जून महिन्यातील मृग नक्षत्र हे खरिपातील पेरण्यांसाठी पोषक वातावरण असलेले नक्षत्र मानले जाते. साधारणपणे जून महिन्यात पेरणीयोग्य जोरदार पाऊस झाला, तर शेतकरी पेरणीस सुरुवात करतो. जून महिन्यात पिकाची पेरणी झाली की मग ही पिके वेळेत येतात. पुढील रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थित नियोजन करता येते. त्यामुळे जून महिन्यात पेरणी करण्याकडे शेतकºयांचा जास्त कल असतो. नक्षत्राच्या कालावधीनुसार पिकांची पेरणी केल्यास पिके रोगराईला बळी न पडता उत्पन्नही चांगले मिळते, असे अनेक शेतकºयांचे मत आहे.जिल्ह्यातील पाऊस(सरासरी टक्केवारी)तालुका २७ जून २०१७ २७ जून २०१८मिरज ४७.५ १८१.७जत १४९.९ ११८.५खानापूर ७२.३ १६९.१वाळवा ६२.६ ९५.७तासगाव ४९.२ ५८.१शिराळा ७५.७ १०७.९आटपाडी २१७.१ १२३.२क़महांकाळ २५९.२ १०२.६पलूस ५४.२ ४२.४कडेगाव ६९.३ ४८खतांची गोदामे फुल्लखरीप हंगामासाठी दोन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी सव्वा लाख मेट्रिक टन खत लागणार आहे. याशिवाय ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली. हंगामासाठी कृषी सेवा केंद्रांची खते आणि बियाणांची गोदामे फुल्ल आहेत. परंतु आतापर्यंत अवघ्या दहा टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस नसल्याने पेरण्या पूर्णपणे थांबल्या असल्याने गोदामातील बियाणे आणि खते पडून असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.