शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्लेसह यांत काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

चोरट्यांचे लागेबांधे सराफांशी!

By admin | Updated: February 12, 2015 00:39 IST

आटपाडी तालुक्यातील प्रकार : पोलीस तपासात स्पष्ट, कठोर कारवाईची मागणी

अविनाश बाड- आटपाडीतील चोरटे तालुक्यात चोऱ्या करुन इथल्याच काही सराफांना चोरीचे दागिने विकत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या या हव्यासापोटी काही सराफांची करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. घरफोड्यांवर पोलीस कारवाई करतात, मात्र चोरीचे दागने विकत घेणारे हे ‘बडे चोर’ समाजात उजळ माथ्याने वावरतात. त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत चोऱ्या थांबणे कठीण असल्याने, पोलिसांनी अशा सराफांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.आटपाडी तालुका म्हणजे वारंवार भीषण दुष्काळाला सामोरा जाणारा तालुका. या तालुक्यात शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची दुकाने व्यवस्थित चालत नाहीत. मात्र काही सराफ व्यावसायिकांना कायम तेजीचे दिवस कसे असतात, हे कुणालाही न सुटलेले कोडे आहे. सोन्यात मिसळल्या जाणाऱ्या पावडरपासून ते चोरीचे दागिने घेण्यापर्यंत इथल्या सराफांबद्दल नागरिकांत नेहमी चर्चा सुरु असते. आलिशान गाड्यांतून फिरणाऱ्या काही तरुणांवर सोन्याच्या पावडरच्या तस्करीचा शिक्का बसला आहे. उदरनिर्वाहासाठी दरवर्षी ४0 ते ५0 हजारजण स्थलांतर करणाऱ्या आटपाडी तालुक्यात होणारा सोन्या-चांदीचा व्यवहार मात्र आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.आटपाडी पोलिसांनी पकडलेल्या पाचजणांच्या घरफोडीच्या टोळीतील अटक केलेले अजय राजा पवार (वय १९, रा. आटपाडी) आणि धर्मेंद्र वंगाड्या काळे (२४, रा. विठलापूर) आणि उर्वरित तिघेही संशयित तालुक्यातीलच आहेत. अटक केलेल्या दोघांनी चोरलेला ऐवज आटपाडी आणि तासगावमधील सराफांना विकल्याची माहिती तपासात पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या सराफांकडून हे दागिनेही हस्तगत केले आहेत. अनेक चोऱ्यांमध्ये अटक केलेले संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यावर पुन्हा जामिनावर बाहेर येतात आणि बाहेर येताच पुन्हा चोऱ्या करतात. पुन्हा ते दागिने विकतात. कधी पोलिसांच्या हाती लागलेच, तर काही चोऱ्या निष्पन्न होतात. पुन्हा तेच ते दुष्टचक्र थांबविण्यासाठी संशयित आरोपींवर कठोर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. पण त्यांना साथ देऊन आपली घरे भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करणे, आता वाढते चोऱ्यांचे सत्र पाहता खूप गरजेचे झाले आहे.या व्यवहारात (?) चोरटे आणि सराफ यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या दलालांचीही सध्या चलती आहे. चोरीचा मामला असल्याने वाट्टेल त्या दराने आणि वाट्टेल तेवढे वजन सांगून चोरीचे दागिने खरेदी करुन पैसा मिळविला जात आहे. नंतर हे चोरीचे सोने गाळून त्याचे नव्याने दागिने केले जात असल्याची चर्चा आहे.पोलिसांचेही उखळ पांढरे...चोरट्यांबरोबरच चोरीचे दागिने घेणाऱ्यांवर, दागिने विक्रीसाठी दलाली करुन चोरट्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली, तर चोऱ्या थांबू शकतात. पण पोलीस चोरांवर गुन्हे दाखल करतात, व्यापाऱ्यांकडून ‘माल’ वसूल करतात. गुन्हा दाखल होईल या भीतीने व्यापारीही पोलिसांपुढे खिसा रिकामा करतात. या सगळ्यात चोर आणि पोलीसच फक्त कायम फायद्यात रहात आहेत. अनेक चोऱ्यांतील चोर सापडूनही सगळा ऐवज विशेषत: रोख रक्कम मिळून येतानाही, ही रक्कम कुणाचे खिसे भरते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळे चोऱ्यांचे दुष्टचक्रही थांबत नाही. अप्रामाणिकपणे चोरीचा माल घेणे किंवा चोरीचा माल माहिती असूनही ठेवून घेणे हा गुन्हा आहे. भारतीय दंडविधान संहिता कलम ४११ नुसार तीन वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड, शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकते.- अ‍ॅड. धनंजय पाटीलअध्यक्ष, आटपाडी तालुका राष्ट्रवादी वकील संघटना