शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

औद्योगिक क्षेत्रात मंदीचा धूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:44 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : समृद्धीच्या चाकांवर स्वार होत धडधडणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील धुराड्यांमधून आता मंदीचा धूर ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : समृद्धीच्या चाकांवर स्वार होत धडधडणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील धुराड्यांमधून आता मंदीचा धूर सर्वदूर पसरत आहे. विविध कारणांनी आलेल्या मंदीमुळे उद्योजक, कामगार, छोटे व्यावसायिक, विक्रेते अशा घटकांनी बनलेल्या अर्थचक्राला मोठा दणका बसला आहे. औद्योगिक वसाहतींमधील ६० टक्के उलाढाल ठप्प झाली असून, ५० टक्के कामगारांच्या वेतनात आता कपात झाली आहे.सांगली, मिरज, कुपवाड या शहरी भागात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांनी या वसाहती भरल्या आहेत. अ‍ॅटोमोबाईल उद्योगांसाठी लागणाºया स्पेअर पार्टस्चे कारखाने, यंत्रमाग, फूड इंडस्ट्री, सिमेंट आर्टिकल्सचे कारखाने, अ‍ॅनिमल फूड अशाप्रकारचे उद्योग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चांगला रोजगार देत शहराच्या समृद्धीला बळ देण्याचे काम या औद्योगिक वसाहतींनी केले, मात्र आता मंदीच्या दाट अंध:कारात हे उद्योग चाचपडताना दिसत आहेत. येथील ६० टक्के उलाढाल ठप्प झाली असून ३० टक्के कारखान्यांनी उत्पादन बंद केले आहे. वस्त्रोद्योग आणि अ‍ॅटोमोबाईल कंपोनंट इंडस्ट्रीजला सर्वात मोठा दणका बसला आहे. कामगारांना आता महिन्यातील केवळ १५ दिवसच काम मिळत आहे. कामगारांचा पगार, अन्य खर्चाचा ताळमेळ पाहता, उत्पादित मालातून मिळणाºया नफ्यावर संक्रांत आली आहे. अनेक कारखाने तोट्यात गेल्याने त्यांना हा तोटा भरून काढण्याची चिंता सतावू लागली आहे.१६ हजार कामगारांवर सावट : सांगली, मिरज, कुपवाड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात सुमारे १६ हजार कामगार काम करतात. यातील ५ ते ६ हजार कामगार केवळ अ‍ॅटोमोबाईल कंपोनंट क्षेत्रातील आहेत. त्याखालोखाल वस्त्रोद्योगातील कामगारांची संख्या अधिक आहेत. त्यामुळे अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील कामगारांना मोठा फटका बसला आहे. हजारो कामगारांना आता निम्म्या वेतनात आपला संसार चालवावा लागत आहे. जवळपास ५० टक्के कामगारांना या मंदीचा मोठा फटका बसला आहे.काय आहेत कारणे1अ‍ॅटोमोबाईल इंडस्ट्रीजवर आलेल्या मंदीचे येथीलक्षेत्रावर सावट2करप्रणालीमुळे उत्पादन खर्चाचा ताळमेळ बिघडला3उत्पादित मालालामागणी घटली4संलग्न मोठ्या उद्योगांच्या अडचणीमुळे छोटे उद्योग संकटात5शासकीय मदतीचाअभाव6उद्योगांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी नाही7अनुदान योजनेचालाभ नाही8ग्रामीण अर्थव्यवस्थाबिघडल्याचा परिणामऔद्योगिकक्षेत्राची अपेक्षा1कर कमीकरावेत2विजेचे वाढलेलेदर कमी करावेत3सांगलीत मोठ्या उद्योगांच्या निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत4अडचणीतील उद्योगांना शासकीय मदत मिळावी5उद्योगांसाठीच्या शासकीय योजनांची जलदगतीने अंमलबजावणी व्हावी