शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2017 00:06 IST

शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू

कोकरूड : बांबरवाडी (ता. शिराळा) येथील शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली असून, याबाबतची नोंद कोकरूड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बांबरवाडी येथील गणेश लक्ष्मण कदम (वय ११), अरुण लक्ष्मण कदम (६) व हर्षद हरिबा कदम (८) हे तीन सख्खे चुलत भाऊ बांबरवाडीच्या पश्चिमेला शेततळ्यामध्ये दुपारी दोनच्या सुमारास पोहण्यास गेले होते. या शेततळ्याच्या एका कोपऱ्यात पाणी असल्याने गणेश व अरुण हे दोघे सख्खे भाऊ पाण्यात आंघोळीसाठी उतरले, तर हर्षद हा शेजारीच उभा होता. यावेळी अरुण हा पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेला गणेशही पाण्यात बुडाला. हे दोघे पाण्यात दिसत नसल्याने हर्षद घाबरून गेला. त्याने घराकडे धाव घेत जवळच असलेल्या गणेशच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर गणेशच्या आईसह वाडीतील लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली; मात्र गणेश व अरुण दोघेही सापडले नाहीत. मात्र त्यांचे कपडे शेजारीच असल्याने पाण्यात शोध घेतला असता शेततळ्याच्या एका बाजूला असलेल्या पाच ते सहा फूट खड्ड्यात गणेश व अरुण यांचे मृतदेह मिळून आले.याबाबतची नोंद कोकरूड पोलिसात करण्यात आली असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे करत आहेत. (वार्ताहर)वडील मुंबईत माथाडी कामगारगणेश व अरुण हे सख्खे भाऊ असून, गणेश हा गुढे येथील कमला माधव विद्यालयात शिकत असून, त्याने सहावीची परीक्षा दिली आहे, तर अरुण हा जवळच अंगणवाडीमध्ये शिकत आहे. गणेश व अरुण यांचे वडील लक्ष्मण कदम हे मुंबई येथे माथाडी कामगार आहेत, तर आई दोन्ही मुलांसह बांबरवाडी येथे राहते. दोन्ही भावंडांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली होती.