शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

राजकीय संघर्षाचा सभासदांना फटका

By admin | Updated: July 24, 2014 22:45 IST

प्रश्न सुटेना : समाधानकारक तोडग्याची प्रतीक्षाच

शरद जाधव- भिलवडी  ,तासगाव साखर कारखाना सुरूवातीपासूनच राजकीय संघर्षात अडकला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासद तसेच कामगारांची मात्र या साठमारीत ससेहोलपट झाली आहे. कारखानाप्रश्नी अनेकवेळा आंदोलने होऊनही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या झेंड्याखाली आर. आर. पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील यांच्याविरोधात दिनकरआबा पाटील, पृथ्वीराज देशमुख या नेत्यांमध्ये झालेल्या लढतीत काँग्रेसने १९ जागा मिळविल्या, तर दिनकरआबा गटाला एक जागा मिळाली. यावेळी आर. आर. पाटील अध्यक्ष, तर महेंद्र लाड उपाध्यक्ष झाले.दहा महिन्यांच्या कालावधीनंतर ग्रामविकासमंत्रीपदी निवड झाल्याने आर. आर. पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावेळी प्रा. राम उगळे यांची वर्णी लागली. २००१ मध्ये दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि सर्व संचालकांनी राजीनामे दिले. शासनाने कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. २००१-०२ च्या गळीत हंगामात कारखाना बंद राहिला. २००२-२००३ मध्ये प्रशासक व कामगारांनी कारखाना चालविला. २००३-२००४, २००४-२००५ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना बंद राहिला. २००५-२००६ पासून राज्य सहकारी बँकेने सहा वर्षांसाठी उगार शुगरकडे भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. दोन गळीत हंगाम कारखाना सुस्थितीमध्ये चालला, पण २००७ ला आर. आर. पाटील व संजयकाका पाटील यांच्यामध्ये राष्ट्रवादीने राजकीय तंटामुक्ती केली. उगार कारखान्याशी केलेला करार गुंडाळून २००७-२००८ पासून सहा वर्षांसाठी कारखाना गणपती संघाकडे गेला. राज्य बँकेने गणपती संघाशी केलेल्या विक्री व्यवहाराविरोधात २०१० ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी याचिका दाखल करून विक्री व्यवहारास स्थगिती मिळवली. २०१२-१३ च्या गळीत हंगामासाठी संघाने मुदत वाढवून घेऊन कारखाना चालविला.२५ आॅक्टोबर २०१३ ला उच्च न्यायालयाने विक्री प्रक्रिया रद्द केली असली, तरीही सहकार प्राधिकरण न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राज्य बँकेचा कारखान्यावर कागदोपत्री ताबा आहे. डॉ. कदम व आर. आर. पाटील सुरुवातीपासूनच कारखान्याच्या कारभारात सक्रिय होते. आबा व खा. संजय पाटील यांच्यामध्ये समझोता असल्याने पतंगरावांनी लक्ष घातले नाही, तर आबांनी आपण वेळ आल्यावर बोलू, असे भाष्य करून विषय टाळला, पण संजय पाटील यांच्याशी समझोता फिसकटल्यानंतर त्यांनी कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, अशी भूमिका घेतली. डॉ. कदम यांनी सोनहिरा कारखान्याच्या माध्यमातून १० कोटी ५१ लाखांची निविदाही भरली; पण संजय पाटील यांनी यंत्रसामग्री काढून नेल्याने व पुरेसा अवधी हाती नसल्याने कारखाना गळीत हंगामात सुरू होऊ शकला नाही. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य बँकेवर दबाव आणून निर्णय घेण्यास भाग पाडावे लागेल. मोठ्या प्रमाणात होणारा ऊस हक्काचा कारखाना असताना दुसरीकडे कशाला पाठवायचा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. (समाप्त)२५ आॅक्टोबर २०१३ ला उच्च न्यायालयाने विक्री प्रक्रिया रद्द केली असली, तरीही सहकार प्राधिकरण न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राज्य बँकेचा कारखान्यावर कागदोपत्री ताबा आहे. असे जरी असले तरी अखेरचा प्रयत्न म्हणून आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य बँकेवर दबाव आणून निर्णय घेण्यास भाग पाडावे लागेल. तासगाव व पलूस तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारा ऊस गाळपासाठी हक्काचा कारखाना असताना दुसरीकडे कशाला पाठवायचा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.