शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

राजकीय संघर्षाचा सभासदांना फटका

By admin | Updated: July 24, 2014 22:45 IST

प्रश्न सुटेना : समाधानकारक तोडग्याची प्रतीक्षाच

शरद जाधव- भिलवडी  ,तासगाव साखर कारखाना सुरूवातीपासूनच राजकीय संघर्षात अडकला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासद तसेच कामगारांची मात्र या साठमारीत ससेहोलपट झाली आहे. कारखानाप्रश्नी अनेकवेळा आंदोलने होऊनही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या झेंड्याखाली आर. आर. पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील यांच्याविरोधात दिनकरआबा पाटील, पृथ्वीराज देशमुख या नेत्यांमध्ये झालेल्या लढतीत काँग्रेसने १९ जागा मिळविल्या, तर दिनकरआबा गटाला एक जागा मिळाली. यावेळी आर. आर. पाटील अध्यक्ष, तर महेंद्र लाड उपाध्यक्ष झाले.दहा महिन्यांच्या कालावधीनंतर ग्रामविकासमंत्रीपदी निवड झाल्याने आर. आर. पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावेळी प्रा. राम उगळे यांची वर्णी लागली. २००१ मध्ये दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि सर्व संचालकांनी राजीनामे दिले. शासनाने कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. २००१-०२ च्या गळीत हंगामात कारखाना बंद राहिला. २००२-२००३ मध्ये प्रशासक व कामगारांनी कारखाना चालविला. २००३-२००४, २००४-२००५ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना बंद राहिला. २००५-२००६ पासून राज्य सहकारी बँकेने सहा वर्षांसाठी उगार शुगरकडे भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. दोन गळीत हंगाम कारखाना सुस्थितीमध्ये चालला, पण २००७ ला आर. आर. पाटील व संजयकाका पाटील यांच्यामध्ये राष्ट्रवादीने राजकीय तंटामुक्ती केली. उगार कारखान्याशी केलेला करार गुंडाळून २००७-२००८ पासून सहा वर्षांसाठी कारखाना गणपती संघाकडे गेला. राज्य बँकेने गणपती संघाशी केलेल्या विक्री व्यवहाराविरोधात २०१० ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी याचिका दाखल करून विक्री व्यवहारास स्थगिती मिळवली. २०१२-१३ च्या गळीत हंगामासाठी संघाने मुदत वाढवून घेऊन कारखाना चालविला.२५ आॅक्टोबर २०१३ ला उच्च न्यायालयाने विक्री प्रक्रिया रद्द केली असली, तरीही सहकार प्राधिकरण न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राज्य बँकेचा कारखान्यावर कागदोपत्री ताबा आहे. डॉ. कदम व आर. आर. पाटील सुरुवातीपासूनच कारखान्याच्या कारभारात सक्रिय होते. आबा व खा. संजय पाटील यांच्यामध्ये समझोता असल्याने पतंगरावांनी लक्ष घातले नाही, तर आबांनी आपण वेळ आल्यावर बोलू, असे भाष्य करून विषय टाळला, पण संजय पाटील यांच्याशी समझोता फिसकटल्यानंतर त्यांनी कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, अशी भूमिका घेतली. डॉ. कदम यांनी सोनहिरा कारखान्याच्या माध्यमातून १० कोटी ५१ लाखांची निविदाही भरली; पण संजय पाटील यांनी यंत्रसामग्री काढून नेल्याने व पुरेसा अवधी हाती नसल्याने कारखाना गळीत हंगामात सुरू होऊ शकला नाही. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य बँकेवर दबाव आणून निर्णय घेण्यास भाग पाडावे लागेल. मोठ्या प्रमाणात होणारा ऊस हक्काचा कारखाना असताना दुसरीकडे कशाला पाठवायचा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. (समाप्त)२५ आॅक्टोबर २०१३ ला उच्च न्यायालयाने विक्री प्रक्रिया रद्द केली असली, तरीही सहकार प्राधिकरण न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राज्य बँकेचा कारखान्यावर कागदोपत्री ताबा आहे. असे जरी असले तरी अखेरचा प्रयत्न म्हणून आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य बँकेवर दबाव आणून निर्णय घेण्यास भाग पाडावे लागेल. तासगाव व पलूस तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारा ऊस गाळपासाठी हक्काचा कारखाना असताना दुसरीकडे कशाला पाठवायचा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.