शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

दुकानांचे मालक आम्ही की शासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST

सांगली : कडक लॉकडाऊन करताना पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना शासनाने, प्रशासनाने विश्वासात घेतले नाही. दुकानांचे मालक आम्ही आहोत की शासन, ...

सांगली : कडक लॉकडाऊन करताना पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना शासनाने, प्रशासनाने विश्वासात घेतले नाही. दुकानांचे मालक आम्ही आहोत की शासन, असा संतप्त सवाल व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली आहे.

शहा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शासनाने आणखी लॉकडाऊन वाढविला. आमचीच दुकाने बंद ठेवताना आम्हालाच विश्वासात घेतले गेले नाही. नक्की या दुकानांचे मालक आम्हीच आहोत की आणखी कुणी आहे? हे तरी प्रशासनाने सांगावे म्हणजे आमची येणी-देणी, जबाबदाऱ्या यातून तरी आम्ही मोकळे होऊ.

कोरोनाची स्थिती आम्हास समजत नाही असे आहे का? व्यापारी सगळे जाणून आहेत. आमचे लोक मृत्युमुखी पडले आहेत, पण आता व्यवसाय यापेक्षा जास्त काळ बंद ठेवू शकत नाही. पुणे, मुंबई या महानगरांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी काही वेळ व्यापार करण्यास परवानगी दिली असताना सांगली जिल्ह्यातच पूर्ण व्यापार बंद ठेवण्याचे आदेश कशासाठी दिले जात आहेत. प्रशासनाचे आम्ही शत्रू आहोत का, असा सवाल आता आम्हाला पडत आहे.

कडक लॉकडाऊन जाहीर करायचे होते, तर ते पहिल्यापासून का केले नाही. आज प्रशासन व्यापाऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देत आहे. गुन्हेगार असल्यासारखे वागवत आहे. रस्त्यावर अपमान करणे, मारणे, शर्टाला धरून ओढणे, अवास्तव दंड लावणे, अशा स्वरूपाची कारवाई केली जात आहे.

आम्हाला दंड लावून, काठीने मारून तरी तुम्हाला त्या वेदना समजल्या का? याप्रश्नी व्यापाऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. वेगळे वळण लागू नये यासाठी जिल्हाधिकारी यांना दि १५ मे रोजी सकाळी ११ वाजता आम्ही सर्व असोसिएशनचे अध्यक्ष भेटणार आहोत.

चौकट

लोकप्रतिनिधी काय करणार आहेत?

लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांना राज्य किंवा केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी काही करणार आहेत की नाही? सर्वपक्षीय नेत्यांनी याबाबत त्यांची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन शहा यांनी केले आहे.