शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात मोठ्या गावांत नेत्यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. ...

सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सासुरवाडी असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथे त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे पानिपत झाले असून, तेथे चुलत मेहुण्याने भाजपची सत्ता आणली आहे.

मिरज तालुक्यातील कवलापूर आणि तुंग या मोठ्या गावांत राष्ट्रवादीची सत्ता आली, तर पूर्व भागातील मालगावात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. म्हैसाळ येथे जयंत पाटील यांचे सख्खे मेहुणे राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे यांच्या गटाची सत्ता उलथवून लावून चुलत मेहुणे तथा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी भाजपचा झेंडा रोवला.

तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी तीन बिनविरोध झाल्या असून, तेथे राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील गटाची सत्ता आली आहे. तालुक्यातील एकूण २१ ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले, तर खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आठ ग्रामपंचायती जिंकल्या. आठ गावांत संयुक्त पॅनलने यश मिळवले, तर दोन गावांत पक्षविरहित आघाड्या सत्तेवर आल्या. सावळज, येळावी येथे राष्ट्रवादीने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. जत तालुक्यात २९ पैकी नऊ गावांत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे. ११ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने, तर ९ ठिकाणी भाजपने सत्तेचा दावा केला आहे. येथे काँग्रेसचे आ. विक्रमसिंह सावंत यांना मोठ्या गावांत धक्का बसला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीने सहा, भाजपने दोन, अजितराव घोरपडे गटाने दोन, तर राष्ट्रवादी आणि घोरपडे गटाने संयुक्तपणे दोन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. आटपाडीत नऊपैकी दोन बिनविरोध झाल्या, तर चार शिवसेनेने आणि तीन भाजपने जिंकल्या. भाजपचे नेते, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख गटाला शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी धक्का दिला, तर खानापूर तालुक्यात १३ पैकी ११ गावांत आ. बाबर गटानेच बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते, माजी आ. सदाशिवराव पाटील गटाला तीन, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळाली.

कडेगाव तालुक्यांत सर्वच्या सर्व नऊ ग्रामपंचायती ताब्यात घेत काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख गटाचा धुव्वा उडवला. पलूस तालुक्यात १२ पैकी विश्वजीत कदम आणि राष्ट्रवादीचे आ. अरुण लाड यांच्या संयुक्त आघाडीने पाच, कदम गटाने चार, तर स्थानिक आघाडीने तीन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.