शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
5
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
6
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
8
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
9
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
10
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
11
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
12
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
13
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
14
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
15
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
16
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
17
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
18
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
19
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
20
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग

सांगली जिल्ह्यात मोठ्या गावांत नेत्यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. ...

सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सासुरवाडी असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथे त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे पानिपत झाले असून, तेथे चुलत मेहुण्याने भाजपची सत्ता आणली आहे.

मिरज तालुक्यातील कवलापूर आणि तुंग या मोठ्या गावांत राष्ट्रवादीची सत्ता आली, तर पूर्व भागातील मालगावात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. म्हैसाळ येथे जयंत पाटील यांचे सख्खे मेहुणे राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे यांच्या गटाची सत्ता उलथवून लावून चुलत मेहुणे तथा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी भाजपचा झेंडा रोवला.

तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी तीन बिनविरोध झाल्या असून, तेथे राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील गटाची सत्ता आली आहे. तालुक्यातील एकूण २१ ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले, तर खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आठ ग्रामपंचायती जिंकल्या. आठ गावांत संयुक्त पॅनलने यश मिळवले, तर दोन गावांत पक्षविरहित आघाड्या सत्तेवर आल्या. सावळज, येळावी येथे राष्ट्रवादीने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. जत तालुक्यात २९ पैकी नऊ गावांत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे. ११ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने, तर ९ ठिकाणी भाजपने सत्तेचा दावा केला आहे. येथे काँग्रेसचे आ. विक्रमसिंह सावंत यांना मोठ्या गावांत धक्का बसला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीने सहा, भाजपने दोन, अजितराव घोरपडे गटाने दोन, तर राष्ट्रवादी आणि घोरपडे गटाने संयुक्तपणे दोन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. आटपाडीत नऊपैकी दोन बिनविरोध झाल्या, तर चार शिवसेनेने आणि तीन भाजपने जिंकल्या. भाजपचे नेते, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख गटाला शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी धक्का दिला, तर खानापूर तालुक्यात १३ पैकी ११ गावांत आ. बाबर गटानेच बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते, माजी आ. सदाशिवराव पाटील गटाला तीन, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळाली.

कडेगाव तालुक्यांत सर्वच्या सर्व नऊ ग्रामपंचायती ताब्यात घेत काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख गटाचा धुव्वा उडवला. पलूस तालुक्यात १२ पैकी विश्वजीत कदम आणि राष्ट्रवादीचे आ. अरुण लाड यांच्या संयुक्त आघाडीने पाच, कदम गटाने चार, तर स्थानिक आघाडीने तीन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.