शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सांगली जिल्ह्यात मोठ्या गावांत नेत्यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. ...

सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये आठ तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये नेतेमंडळींना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सासुरवाडी असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथे त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे पानिपत झाले असून, तेथे चुलत मेहुण्याने भाजपची सत्ता आणली आहे.

मिरज तालुक्यातील कवलापूर आणि तुंग या मोठ्या गावांत राष्ट्रवादीची सत्ता आली, तर पूर्व भागातील मालगावात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. म्हैसाळ येथे जयंत पाटील यांचे सख्खे मेहुणे राष्ट्रवादीचे नेते मनोज शिंदे यांच्या गटाची सत्ता उलथवून लावून चुलत मेहुणे तथा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी भाजपचा झेंडा रोवला.

तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी तीन बिनविरोध झाल्या असून, तेथे राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील गटाची सत्ता आली आहे. तालुक्यातील एकूण २१ ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले, तर खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आठ ग्रामपंचायती जिंकल्या. आठ गावांत संयुक्त पॅनलने यश मिळवले, तर दोन गावांत पक्षविरहित आघाड्या सत्तेवर आल्या. सावळज, येळावी येथे राष्ट्रवादीने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. जत तालुक्यात २९ पैकी नऊ गावांत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे. ११ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने, तर ९ ठिकाणी भाजपने सत्तेचा दावा केला आहे. येथे काँग्रेसचे आ. विक्रमसिंह सावंत यांना मोठ्या गावांत धक्का बसला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीने सहा, भाजपने दोन, अजितराव घोरपडे गटाने दोन, तर राष्ट्रवादी आणि घोरपडे गटाने संयुक्तपणे दोन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. आटपाडीत नऊपैकी दोन बिनविरोध झाल्या, तर चार शिवसेनेने आणि तीन भाजपने जिंकल्या. भाजपचे नेते, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख गटाला शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी धक्का दिला, तर खानापूर तालुक्यात १३ पैकी ११ गावांत आ. बाबर गटानेच बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते, माजी आ. सदाशिवराव पाटील गटाला तीन, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळाली.

कडेगाव तालुक्यांत सर्वच्या सर्व नऊ ग्रामपंचायती ताब्यात घेत काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख गटाचा धुव्वा उडवला. पलूस तालुक्यात १२ पैकी विश्वजीत कदम आणि राष्ट्रवादीचे आ. अरुण लाड यांच्या संयुक्त आघाडीने पाच, कदम गटाने चार, तर स्थानिक आघाडीने तीन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.