शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

शिवरायांच्या कृषी धोरणांची आज गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST

शिरटे : छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची होती. त्यामुळेच एकाही शेतकऱ्याने शिवशाहीत आत्महत्या केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या वाटेत ...

शिरटे : छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची होती. त्यामुळेच एकाही शेतकऱ्याने शिवशाहीत आत्महत्या केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या वाटेत फुले टाकली; पण कधी खिळे ठोकले नाहीत. आज देशाला छत्रपतींच्या कृषी धोरणांची गरज असून, श्रमकरी व कष्टकऱ्यांच्या घामाला किंमत मिळाली पाहिजे हेच शिवचरित्रातून शिकावे लागेल, असे मत इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवचरित्रातून आज काय शिकावे’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण, सुशांत पाटील उपस्थित होते.

डॉ. कोकाटे म्हणाले, पती निधनानंतर सती जाण्याची प्रथा नाकारणाऱ्या राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना घडवले. त्याच छत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी स्वतःच्या सुनेला युद्ध आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य दिले होते. मानव ही एकच जात असल्याचे छत्रपतींनी आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवले होते. प्रास्तविक स्वाती मोहिते यांनी केले. अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्ष वनिता मोहिते, सचिव निवास पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास पवार यांनी आभार मानले.

चाैकट

कृषी कायद्याने नुकसानच

डॉ. कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केंद्राने केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून, शेतकऱ्याचे आर्थिक जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. पंजाबमधील हुशार शेतकऱ्यांना हा कायदा समजला असल्यानेच त्यांनी आंंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु, त्यांच्या वाटेतही खिळे ठोकण्याचे काम सरकारने केले आहे.