शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

शिवरायांच्या कृषी धोरणांची आज गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST

शिरटे : छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची होती. त्यामुळेच एकाही शेतकऱ्याने शिवशाहीत आत्महत्या केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या वाटेत ...

शिरटे : छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची होती. त्यामुळेच एकाही शेतकऱ्याने शिवशाहीत आत्महत्या केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या वाटेत फुले टाकली; पण कधी खिळे ठोकले नाहीत. आज देशाला छत्रपतींच्या कृषी धोरणांची गरज असून, श्रमकरी व कष्टकऱ्यांच्या घामाला किंमत मिळाली पाहिजे हेच शिवचरित्रातून शिकावे लागेल, असे मत इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवचरित्रातून आज काय शिकावे’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण, सुशांत पाटील उपस्थित होते.

डॉ. कोकाटे म्हणाले, पती निधनानंतर सती जाण्याची प्रथा नाकारणाऱ्या राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना घडवले. त्याच छत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी स्वतःच्या सुनेला युद्ध आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य दिले होते. मानव ही एकच जात असल्याचे छत्रपतींनी आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवले होते. प्रास्तविक स्वाती मोहिते यांनी केले. अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्ष वनिता मोहिते, सचिव निवास पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास पवार यांनी आभार मानले.

चाैकट

कृषी कायद्याने नुकसानच

डॉ. कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केंद्राने केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून, शेतकऱ्याचे आर्थिक जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. पंजाबमधील हुशार शेतकऱ्यांना हा कायदा समजला असल्यानेच त्यांनी आंंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु, त्यांच्या वाटेतही खिळे ठोकण्याचे काम सरकारने केले आहे.