शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या कृषी धोरणांची आज गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST

शिरटे : छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची होती. त्यामुळेच एकाही शेतकऱ्याने शिवशाहीत आत्महत्या केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या वाटेत ...

शिरटे : छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची होती. त्यामुळेच एकाही शेतकऱ्याने शिवशाहीत आत्महत्या केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या वाटेत फुले टाकली; पण कधी खिळे ठोकले नाहीत. आज देशाला छत्रपतींच्या कृषी धोरणांची गरज असून, श्रमकरी व कष्टकऱ्यांच्या घामाला किंमत मिळाली पाहिजे हेच शिवचरित्रातून शिकावे लागेल, असे मत इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवचरित्रातून आज काय शिकावे’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण, सुशांत पाटील उपस्थित होते.

डॉ. कोकाटे म्हणाले, पती निधनानंतर सती जाण्याची प्रथा नाकारणाऱ्या राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना घडवले. त्याच छत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी स्वतःच्या सुनेला युद्ध आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य दिले होते. मानव ही एकच जात असल्याचे छत्रपतींनी आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवले होते. प्रास्तविक स्वाती मोहिते यांनी केले. अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्ष वनिता मोहिते, सचिव निवास पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास पवार यांनी आभार मानले.

चाैकट

कृषी कायद्याने नुकसानच

डॉ. कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केंद्राने केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून, शेतकऱ्याचे आर्थिक जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. पंजाबमधील हुशार शेतकऱ्यांना हा कायदा समजला असल्यानेच त्यांनी आंंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु, त्यांच्या वाटेतही खिळे ठोकण्याचे काम सरकारने केले आहे.