शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा राजकीय दुष्काळ संपविणार

By admin | Updated: August 23, 2014 00:07 IST

उद्धव ठाकरे : पंधरा वर्षांत ‘कृष्णा खोरे’चा बट्ट्याबोळ

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने कधीही शिवसेनेला आशीर्वाद दिलेला नाही. दरवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली, पण आघाडी सरकारने जनतेला काय दिले, याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. आघाडीच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पडले असून, आगामी विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा राजकीय दुष्काळ संपविणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी विटा येथील जाहीर मेळाव्यात केले. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानिमित्त विट्यातील महात्मा गांधी हायस्कूलच्या मैदानावर जाहीर मेळावा झाला. या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र हा शिवसेनेसाठी राजकीय दुष्काळी भागच राहिला आहे, तरीही आम्ही दुजाभाव केला नाही. संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, या भावनेतून युती शासनाच्या काळात काम केले. मात्र म्हैसाळ, टेंभूसह कृष्णा खोरे महामंडळाच्या योजना अजूनही कागदावरच आहेत. या योजना अर्धवट का आहेत, याचा जाब टगेगिरी करणाऱ्यांना विचारा. कराडमध्ये मुख्यमंत्र्यांची पोस्टर लावली आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांनी काय निर्णय घेतले? सांगली जिल्ह्यात तीन वजनदार मंत्री आहेत. सांगलीचे सोने व्हायला हवे होते, पण या मंत्र्यांनी ‘मी आणि माझे’ एवढ्यापुरताच विचार केला. त्यांनी स्वत:च्या संस्था मोठ्या केल्या. भूखंड ढापून ते / सहकारसम्राट झाले. जनता काहीशी बाजूला झाली तर हेच सहकारसम्राट रस्त्यावर येतील, अशी टीकाही त्यांनी तिन्ही मंत्र्यांवर केली. ते म्हणाले की, जत तालुक्यातील जनतेने पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची घोषणा केली. मी दुसऱ्याच दिवशी जतमध्ये येऊन जनतेला विश्वास दिला होता. जिल्ह्यातील एकही मंत्री त्यांना धीर देण्यासाठी गेला नाही. या मंत्र्यांनी बादलीभर पाण्यात जीव द्यायला हवा होता. युती शासनाने दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी टेंभूला मंजुरी दिली. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने कृष्णा खोरे मंडळाचा बट्ट्याबोळ केला आहे. हे सरकार आता शेवटची घटका मोजत आहे. त्यांना पाजायला पाणीही मिळणार नाही. टेंभू प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर महायुतीचे सरकार सत्तेत आणले पाहिजे. सभा, मोर्चांद्वारे योजना पूर्ण होणार नाही. त्यासाठी सरकार बदलण्याचेच आंदोलन करावे लागले. राज्यातील सत्ता महायुतीच्या हाती दिल्यास अपूर्ण प्रकल्प पूर्ण करूबाळासाहेब ठाकरे यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याची भूमिका पूर्वीच मांडली आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. आम्ही हिंदू आहोत, हे सांगण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. हिंदंूच्या सणांवर बंदी येत आहे. तोंडात बोळा आणि हात बांधून आम्ही सण साजरे करायचे का? हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. दोन महिन्यांतच युतीचे शासन येणार आहे. त्यामुळे कुणीही भगव्याच्या वाटेला जाऊ नये, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. अनिल बाबर म्हणाले की, राष्ट्रवादीची सर्व पथ्ये पाळून काम केले. वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडल्याची टीका काहीजण करीत आहेत, पण त्यांना व त्यांच्या टीकेला मी घाबरत नाही. त्यांच्या सत्तेचा मी लाभधारक नाही. कधीही आमदारकी, महामंडळ मागितले नाही. केवळ जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्या दारात जात होतो. टेंभू प्रकल्प आघाडीच्याच काळात रखडला आहे. अनेकदा अनुशेषाचा मुद्दा पुढे आणला गेला, पण त्यांच्या मतदारसंघात काम सुरू झाले की अनुशेषाचा प्रश्न कुठे जात होता? दोन वर्षांत टेंभू पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या मागे शक्ती उभी करा. आटपाडी-खानापूरमधून मला उमेदवारी द्यावी, अशी अट नाही, पण टेंभूचे पाणी शिवारापर्यंत पोहोचल्यानंतर जनतेच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, उपप्रमुख शिवाजी शिंदे, आप्पासाहेब काटकर, नितीन बानुगडे-पाटील, उपसभापती सुहास बाबर, युवानेते अमोल बाबर, जि. प.चे सदस्य फिरोज शेख, नगरसेवक अनिल म. बाबर, अ‍ॅड. विनोद गुळवणी, बबनराव भगत, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, कडेगाव तालुकाप्रमुख सुभाष मोहिते, दिलीप बागल, संजय विभूते, बाळासाहेब लकडे, सुशांत देवकर, सुनीता मोरे, राजश्री शिंदे, शुभांगी कुलकर्णी, अ‍ॅड. विनोद गोसावी, उत्तम चोथे उपस्थित होते. (प्रतिनिधी)