शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शिराळा तालुक्यात धूळवाफ पेरणीचे मुहूर्त ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : शिराळा पश्चिम आणि उत्तर भागातील खरीप हंगामातील धूळवाफ पेरणीच्या पूर्वमशागतीला वेग आला असून, या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : शिराळा पश्चिम आणि उत्तर भागातील खरीप हंगामातील धूळवाफ पेरणीच्या पूर्वमशागतीला वेग आला असून, या महिन्यातील तीन मुहूर्तांवर पेरणी करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. कुटुंबातील सर्वजण कामाला लागले आहेत.

शिराळा पश्चिम आणि उत्तर भागांतील जमिनी निचऱ्याच्या आहेत. या परिसरात भात हे पारंपरिक पीक आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी या भागातील शेतकरी धूळवाफ पद्धतीने पेरणी करीत असतो. चांदोली अभयारण्य परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने चिखलगठ्ठा लागण पद्धतीने पेरणी करण्यात येते. शिराळी, कोमल, राधानगरी, इंद्रायणी, गंगा-कावेरी, आर-वन, पूनम, बलवान, आरजे-९५, मंजिरी बासमती, आदी भात बियाण्यांची पेरणी करण्यात येते. गेल्या १५ दिवसांत पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या मशागतीला वेग आला आहे. कचरा, दगड-धोंडे वेचणे, कुळवणी, नांगरणी करण्याच्या कामाला वेग आला आहे. खरीप हंगामाच्या पेरणीचा मुहूर्त १८, २१, २५ मे असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे.

धूळवाफ पेरणी म्हणजे काय?

एक-दोन उन्हाळी पाऊस पडल्यानंतर जमिनीत मुरलेले पाणी पूर्ण सुकल्यानंतर नांगरणी, कुळवणी करून मातीचे बारीक कण तयार होतात. त्या मातीत चार इंच खोलवर विविध प्रकारच्या भाताची पेरणी केली जाते. पेरणी केल्यानंतर एक महिना पाऊस उशिरा पडला तरी बियाणे खराब होत नसल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धूळवाफ पद्धतीने पेरणी करीत असतो.