शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा-वाळवा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

शिवाजीराव नाईक : विरोधकांना निवडणुकीत झोपवलेय

कोकरूड : शिराळा व वाळवा तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करून या गावांना दुष्काळाच्या सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिराळा येथे पत्रकार बैठकीत केली. आमदार नाईक म्हणाले की, चांदोली धरण यावर्षी शंभर टक्के भरलेले नाही. पावसाळ््यात प्रारंभीचे काही दिवस सोडले, तर दोन ते अडीच महिने कोरडे गेले. या दोन्ही तालुक्यात डोंगर-उताराची जमीन, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी असल्याने पावसाचे पाणी वाहून गेले. आम्ही तहसीलदार, प्रांत तसेच जिल्हाअधिकारी व कृषी व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांना निवेदन देऊन काही गावांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. पाटबंधारे विभाग, वारणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून वारणा नदीचे पाणी वाकुर्डेच्या खिरवडे, हात्तेगाव व डावा कालव्यातून रिळेपर्यंत सोडण्यासंदर्भात विनंती केली आहे.आमदार नाईक म्हणाले की, खरीप पिकांची वाढ व्हायची असेल तर, सातत्याने पाऊस पडावा लागतो; मात्र तो न झाल्याने या दोन्ही तालुक्यातील भात, सोयाबीन, मका, भुईमूग, नाचणी, उडीद, तूर, हायब्रीड ही पिके वाया गेली आहेत. प्रशासनाने या पिकांची केलेली नजरपाहणी अत्यंत चुकीची असून, प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुनिष्ठ सर्व्हे करावा व त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल जाहीर करावा. आमचे विरोधक शे-दीडशे लोकांचा मोर्चा काढून शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचा आव आणून आमच्यावर टीका करतात. त्यांना आम्ही प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न केले आहे, याची माहिती घेण्याचेही भान नाही. खोटेनाटे सांगून ते आपण जागरुक असल्याचा आव आणत आहेत. मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीत झोपवले आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर गेले. ज्यांचे पुण्या-मुंबईत अस्तित्व असते, त्यांना यापुढे कायमचेच झोपवू. ज्यांनी उत्तर भागातील जनतेला सोन्याच्या कळशीतून पाणी मागू नये, असे सांगितले होते, त्यांना वाकुर्डे योजनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी शिवाजीराव देशमुख यांना लगावला. (वार्ताहर)गिरजवडे प्रकल्प आम्हीच पूर्ण करणार...आमदार नाईक म्हणाले, गिरजवडे, मोंडेवाडी, मुळीकवाडी ही गावे वाकुर्डेचे पाणी जात नसल्याने पाण्यापासून वंचित राहत होती. त्यामुळे या गावांची शेती व पिण्याच्या पाण्याकरिता गिरजवडे तलावासाठी पाठपुरावा सुरू आहे. गिरजवडे प्रकल्पाचे आतापर्यंत १० कोटींचे काम झाले आहे. ठेकेदाराला फक्त दोन कोटी मिळाल्याने त्याच्या कामाची बिले थकली आहेत. येत्या आठ-पंधरा दिवसांत ठेकेदाराला बिले अदा होतील व गिरजवडे प्रकल्पाचे काम जोमाने सुरू होऊन हा प्रकल्प मे महिन्यापर्यंत मार्गी लागेल. तांत्रिक अडचणींमुळे हा निधी थांबला आहे. हा प्रकल्प आम्हीच मंजूर केला असून, तो आम्हीच पूर्ण करणार आहोत.