शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

शिराळा-वाळवा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

शिवाजीराव नाईक : विरोधकांना निवडणुकीत झोपवलेय

कोकरूड : शिराळा व वाळवा तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करून या गावांना दुष्काळाच्या सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिराळा येथे पत्रकार बैठकीत केली. आमदार नाईक म्हणाले की, चांदोली धरण यावर्षी शंभर टक्के भरलेले नाही. पावसाळ््यात प्रारंभीचे काही दिवस सोडले, तर दोन ते अडीच महिने कोरडे गेले. या दोन्ही तालुक्यात डोंगर-उताराची जमीन, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी असल्याने पावसाचे पाणी वाहून गेले. आम्ही तहसीलदार, प्रांत तसेच जिल्हाअधिकारी व कृषी व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांना निवेदन देऊन काही गावांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. पाटबंधारे विभाग, वारणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून वारणा नदीचे पाणी वाकुर्डेच्या खिरवडे, हात्तेगाव व डावा कालव्यातून रिळेपर्यंत सोडण्यासंदर्भात विनंती केली आहे.आमदार नाईक म्हणाले की, खरीप पिकांची वाढ व्हायची असेल तर, सातत्याने पाऊस पडावा लागतो; मात्र तो न झाल्याने या दोन्ही तालुक्यातील भात, सोयाबीन, मका, भुईमूग, नाचणी, उडीद, तूर, हायब्रीड ही पिके वाया गेली आहेत. प्रशासनाने या पिकांची केलेली नजरपाहणी अत्यंत चुकीची असून, प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुनिष्ठ सर्व्हे करावा व त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल जाहीर करावा. आमचे विरोधक शे-दीडशे लोकांचा मोर्चा काढून शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचा आव आणून आमच्यावर टीका करतात. त्यांना आम्ही प्रशासकीय पातळीवर काय प्रयत्न केले आहे, याची माहिती घेण्याचेही भान नाही. खोटेनाटे सांगून ते आपण जागरुक असल्याचा आव आणत आहेत. मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीत झोपवले आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर गेले. ज्यांचे पुण्या-मुंबईत अस्तित्व असते, त्यांना यापुढे कायमचेच झोपवू. ज्यांनी उत्तर भागातील जनतेला सोन्याच्या कळशीतून पाणी मागू नये, असे सांगितले होते, त्यांना वाकुर्डे योजनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी शिवाजीराव देशमुख यांना लगावला. (वार्ताहर)गिरजवडे प्रकल्प आम्हीच पूर्ण करणार...आमदार नाईक म्हणाले, गिरजवडे, मोंडेवाडी, मुळीकवाडी ही गावे वाकुर्डेचे पाणी जात नसल्याने पाण्यापासून वंचित राहत होती. त्यामुळे या गावांची शेती व पिण्याच्या पाण्याकरिता गिरजवडे तलावासाठी पाठपुरावा सुरू आहे. गिरजवडे प्रकल्पाचे आतापर्यंत १० कोटींचे काम झाले आहे. ठेकेदाराला फक्त दोन कोटी मिळाल्याने त्याच्या कामाची बिले थकली आहेत. येत्या आठ-पंधरा दिवसांत ठेकेदाराला बिले अदा होतील व गिरजवडे प्रकल्पाचे काम जोमाने सुरू होऊन हा प्रकल्प मे महिन्यापर्यंत मार्गी लागेल. तांत्रिक अडचणींमुळे हा निधी थांबला आहे. हा प्रकल्प आम्हीच मंजूर केला असून, तो आम्हीच पूर्ण करणार आहोत.