शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शेट्टी-खोत यांचा पेठनाक्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:54 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. वाळवा तालुक्यातील पेठनाका हे महाडिक गटाचे मुख्यालय याच मतदारसंघात येते. नानासाहेब महाडिक, त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्या गटाची ताकद उल्लेखनीय असून, ते सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. शिराळा व वाळवा विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी गावात महाडिक यांचा गट कार्यरत आहे. इस्लामपूर, आष्टा शहरातही त्यांचे कार्यकर्ते आहेत. काही ग्रामपंचायतींवर त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या गटाचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंबई-दिल्लीकडे जाता-येता राष्टÑीय महामार्गावरील पेठनाक्यावरच्या भेटी वाढवल्या आहेत.मात्र प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आपला फक्त वापरच करून घेतला आहे, अशी महाडिक यांची भावना आहे. शेट्टी यांच्या पाठीशीही महाडिक ठामपणे होते. आता मात्र त्यांच्यासमोर शेट्टी का खोत?, असा प्रश्न आहे. त्यातून त्यांनी आता स्वत:च्या पेठ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी शेट्टी आणि खोत यांना समान अंतरावर ठेवले आहे.आमदार शिवाजीराव नाईक यांचीही दोघांशी जवळीकशिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार नाईक यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधात असणाºया सर्वच घटकपक्षांची व गटांची ताकद एकत्रित करून लढावे लागते. साखरसम्राटांच्या विरोधात असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही मदत त्यांना घ्यावी लागते. परंतु आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. मात्र आ. नाईक यांनी भाजपसाठी सदाभाऊ खोत यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. खोत यांच्या मदतीने मतदारसंघासाठी शासनाकडून निधी मिळवण्यावर त्यांनी भर दिला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत खासदार शेट्टी यांची मिळालेली मदत न विसरता शेट्टी यांनाही त्यांनी जवळ ठेवले आहे.