शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

शेट्टी-खोत यांचा पेठनाक्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:54 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. वाळवा तालुक्यातील पेठनाका हे महाडिक गटाचे मुख्यालय याच मतदारसंघात येते. नानासाहेब महाडिक, त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्या गटाची ताकद उल्लेखनीय असून, ते सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. शिराळा व वाळवा विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी गावात महाडिक यांचा गट कार्यरत आहे. इस्लामपूर, आष्टा शहरातही त्यांचे कार्यकर्ते आहेत. काही ग्रामपंचायतींवर त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या गटाचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंबई-दिल्लीकडे जाता-येता राष्टÑीय महामार्गावरील पेठनाक्यावरच्या भेटी वाढवल्या आहेत.मात्र प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आपला फक्त वापरच करून घेतला आहे, अशी महाडिक यांची भावना आहे. शेट्टी यांच्या पाठीशीही महाडिक ठामपणे होते. आता मात्र त्यांच्यासमोर शेट्टी का खोत?, असा प्रश्न आहे. त्यातून त्यांनी आता स्वत:च्या पेठ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी शेट्टी आणि खोत यांना समान अंतरावर ठेवले आहे.आमदार शिवाजीराव नाईक यांचीही दोघांशी जवळीकशिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार नाईक यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधात असणाºया सर्वच घटकपक्षांची व गटांची ताकद एकत्रित करून लढावे लागते. साखरसम्राटांच्या विरोधात असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही मदत त्यांना घ्यावी लागते. परंतु आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. मात्र आ. नाईक यांनी भाजपसाठी सदाभाऊ खोत यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. खोत यांच्या मदतीने मतदारसंघासाठी शासनाकडून निधी मिळवण्यावर त्यांनी भर दिला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत खासदार शेट्टी यांची मिळालेली मदत न विसरता शेट्टी यांनाही त्यांनी जवळ ठेवले आहे.