शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टी-खोत यांचा पेठनाक्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:54 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. वाळवा तालुक्यातील पेठनाका हे महाडिक गटाचे मुख्यालय याच मतदारसंघात येते. नानासाहेब महाडिक, त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्या गटाची ताकद उल्लेखनीय असून, ते सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. शिराळा व वाळवा विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी गावात महाडिक यांचा गट कार्यरत आहे. इस्लामपूर, आष्टा शहरातही त्यांचे कार्यकर्ते आहेत. काही ग्रामपंचायतींवर त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या गटाचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंबई-दिल्लीकडे जाता-येता राष्टÑीय महामार्गावरील पेठनाक्यावरच्या भेटी वाढवल्या आहेत.मात्र प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आपला फक्त वापरच करून घेतला आहे, अशी महाडिक यांची भावना आहे. शेट्टी यांच्या पाठीशीही महाडिक ठामपणे होते. आता मात्र त्यांच्यासमोर शेट्टी का खोत?, असा प्रश्न आहे. त्यातून त्यांनी आता स्वत:च्या पेठ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी शेट्टी आणि खोत यांना समान अंतरावर ठेवले आहे.आमदार शिवाजीराव नाईक यांचीही दोघांशी जवळीकशिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार नाईक यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधात असणाºया सर्वच घटकपक्षांची व गटांची ताकद एकत्रित करून लढावे लागते. साखरसम्राटांच्या विरोधात असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही मदत त्यांना घ्यावी लागते. परंतु आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. मात्र आ. नाईक यांनी भाजपसाठी सदाभाऊ खोत यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. खोत यांच्या मदतीने मतदारसंघासाठी शासनाकडून निधी मिळवण्यावर त्यांनी भर दिला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत खासदार शेट्टी यांची मिळालेली मदत न विसरता शेट्टी यांनाही त्यांनी जवळ ठेवले आहे.