शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

पन्नास मीटर पाइपलाइनसाठी शामरावनगर वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्वराज चौक ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्वराज चौक ते कोल्हापूर रोड आणि कोल्हापूर रोड ते भोबे गटार, असे दोन टप्प्यात काम झाले आहे. त्यातील पन्नास मीटरच्या बंदिस्त पाइपलाइनचे काम रखडल्याने शामरावनगरमध्ये पाणी साचून राहत आहे. या परिसरातील नागरिकांनी किती वर्षे नरकयातना भोगायच्या, असा सवाल मदनभाऊ युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी केला.

याबाबत त्यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदनही दिले आहे. लेंगरे म्हणाले की, शामरावनगरमध्ये पावसाळ्यात नागरिकांची दैना होते. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले. स्वराज चौक ते कोल्हापूर रोड व भोबे गटार ते कोल्हापूर रोडपर्यंत पाइपलाइनचे काम हाती घेतले; पण चार वर्षांत हे काम पूर्ण झाले नाही. आता केवळ ५० मीटर पाइपलाइनचे काम रखडले आहे. ते पूर्ण झाल्यास शामरावनगरमधील ८० टक्के पाण्याचा निचरा होणार आहे.

यंदा पहिल्याच पावसात शामरावनगर परिसर पाण्याने तुडुंब भरलेला होता. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जनतेला रोगराई, आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी ५० मीटर काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा युवा मंचाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.