शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणग्रस्तांच्या ग्रामपंचायतींमुळे खळबळ

By admin | Updated: June 11, 2016 00:56 IST

आष्टा शहराचे तुकडे : शासनाच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या हालचाली; पालिका विशेष सभा घेणार

सुरेंद्र शिराळकर --- आष्टा  शहरातील चांदोली धरणग्रस्तांच्या छोट्या-छोट्या वसाहतींच्या ग्रामपंचायती करीत आष्टा शहराचे तुकडे करण्याचा घाट शासनाने घातला आहे. या नवीन ग्रामपंचायतींमुळे अनेकांचे राजकीय अस्तित्व संकटात आले आहे. आष्ट्यावर राज्य करणाऱ्या शिंदे मळ्याचाही या ग्रामपंचायतीत समावेश झाल्याने, आष्ट्यात राजकीय खळबळ माजली आहे. शासनाच्या या निर्णयाला जोरदार आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून याबाबत पालिका सभा बोलाविण्यात आली आहे.आष्टा हे राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आष्ट्याने प्रगती साधली आहे. पालिकेवर शिंदे घराण्याचेच वर्चस्व राहिले आहे. चांदोली धरणग्रस्तांना जिल्ह्यात इतरत्र विरोध होत असताना, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नाने आष्टा-तासगाव रस्त्यालगत तसेच अंकलखोप फाट्यानजीक व आष्टा-नागाव रस्त्यावर झोळंबी वसाहत येथे त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. अनेकांनी गेल्या अनेक वर्षांपासून येथे घरे बांधून आष्ट्याचे नागरिकत्व स्वीकारले आहे.प्रारंभीच्या काळात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी या धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत अनेक लढे उभारत शासनाशी संघर्ष केल्याने, या सर्व नागरिकांच्या रक्तातच अण्णांबद्दल आत्मियता आहे. शासनाने पालिका हद्दीतील झोळंबी, क्रांतिनगर व नागनाथअण्णानगर अशा तीन ग्रामपंचायती नव्याने निर्माण केल्या आहेत. याबाबत पालिकेस पत्र मिळाले असून, २६० कुटुंबे व ९३४ लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. झोळंबी व क्रांतिनगरमधील मूळ नागरिकांचा या नवीन ग्रामपंचायतीला विरोध नाही. मात्र नागनाथअण्णानगर या तासगाव रस्त्यावरील ग्रामपंचायतीमध्ये शिंदेमळा, रानमळा, मुळीकमळा, जमादार कॉलनी, महावितरणचा काही भाग जोडला आहे. शिंदे मळ्यातील बापूसाहेब शिंदे, शंकरराव शिंदे, आनंदराव शिंदे यांनी नेतृत्व केले असून यांच्यासह कारखान्याचे संचालक विराज शिंदे, मोहनराव शिंदे सोसायटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, सतीश माळी याच भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शासनाने हा भाग ग्रामपंचायतीला जोडल्याने नागरिकांतून प्रचंड विरोध होत आहे. वर्षाखेर पालिका निवडणुका असल्याने या निर्णयाला सर्वजण आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.दरम्यान, याबाबत राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, म्हणाले की, शिंदेमळा, रानमळा व परिसर आष्टा पालिकेचा भाग आहे. धरणग्रस्तांना न्याय मिळावा, मात्र आमच्यावर अन्याय होऊ नये. आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे आम्हाला न्याय देतील.अधिकारी धारेवर आष्टा येथील कार्यक्रमात माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांनी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत, तातडीने प्रश्न सोडविण्यास सांगितले. आष्टा पालिकेचे तुकडे करु नका, अशी मागणी यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी केली. याबाबत अहवाल देण्याचीही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.