शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

चांदोली धरणग्रस्तांच्या ग्रामपंचायतींमुळे खळबळ

By admin | Updated: June 11, 2016 00:56 IST

आष्टा शहराचे तुकडे : शासनाच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या हालचाली; पालिका विशेष सभा घेणार

सुरेंद्र शिराळकर --- आष्टा  शहरातील चांदोली धरणग्रस्तांच्या छोट्या-छोट्या वसाहतींच्या ग्रामपंचायती करीत आष्टा शहराचे तुकडे करण्याचा घाट शासनाने घातला आहे. या नवीन ग्रामपंचायतींमुळे अनेकांचे राजकीय अस्तित्व संकटात आले आहे. आष्ट्यावर राज्य करणाऱ्या शिंदे मळ्याचाही या ग्रामपंचायतीत समावेश झाल्याने, आष्ट्यात राजकीय खळबळ माजली आहे. शासनाच्या या निर्णयाला जोरदार आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून याबाबत पालिका सभा बोलाविण्यात आली आहे.आष्टा हे राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आष्ट्याने प्रगती साधली आहे. पालिकेवर शिंदे घराण्याचेच वर्चस्व राहिले आहे. चांदोली धरणग्रस्तांना जिल्ह्यात इतरत्र विरोध होत असताना, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नाने आष्टा-तासगाव रस्त्यालगत तसेच अंकलखोप फाट्यानजीक व आष्टा-नागाव रस्त्यावर झोळंबी वसाहत येथे त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. अनेकांनी गेल्या अनेक वर्षांपासून येथे घरे बांधून आष्ट्याचे नागरिकत्व स्वीकारले आहे.प्रारंभीच्या काळात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी या धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत अनेक लढे उभारत शासनाशी संघर्ष केल्याने, या सर्व नागरिकांच्या रक्तातच अण्णांबद्दल आत्मियता आहे. शासनाने पालिका हद्दीतील झोळंबी, क्रांतिनगर व नागनाथअण्णानगर अशा तीन ग्रामपंचायती नव्याने निर्माण केल्या आहेत. याबाबत पालिकेस पत्र मिळाले असून, २६० कुटुंबे व ९३४ लोकसंख्या गृहित धरण्यात आली आहे. झोळंबी व क्रांतिनगरमधील मूळ नागरिकांचा या नवीन ग्रामपंचायतीला विरोध नाही. मात्र नागनाथअण्णानगर या तासगाव रस्त्यावरील ग्रामपंचायतीमध्ये शिंदेमळा, रानमळा, मुळीकमळा, जमादार कॉलनी, महावितरणचा काही भाग जोडला आहे. शिंदे मळ्यातील बापूसाहेब शिंदे, शंकरराव शिंदे, आनंदराव शिंदे यांनी नेतृत्व केले असून यांच्यासह कारखान्याचे संचालक विराज शिंदे, मोहनराव शिंदे सोसायटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, सतीश माळी याच भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शासनाने हा भाग ग्रामपंचायतीला जोडल्याने नागरिकांतून प्रचंड विरोध होत आहे. वर्षाखेर पालिका निवडणुका असल्याने या निर्णयाला सर्वजण आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.दरम्यान, याबाबत राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, म्हणाले की, शिंदेमळा, रानमळा व परिसर आष्टा पालिकेचा भाग आहे. धरणग्रस्तांना न्याय मिळावा, मात्र आमच्यावर अन्याय होऊ नये. आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे आम्हाला न्याय देतील.अधिकारी धारेवर आष्टा येथील कार्यक्रमात माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांनी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत, तातडीने प्रश्न सोडविण्यास सांगितले. आष्टा पालिकेचे तुकडे करु नका, अशी मागणी यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी केली. याबाबत अहवाल देण्याचीही मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.