शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

‘रयत क्रांती’च्या पेरणीला अर्थचिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:30 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून रणशिंग फुंकल्यानंतर आता दसºयाच्या मुहूर्तावर होणाºया पहिल्याच मेळाव्याची तयारी करताना आर्थिक अडचणींचा सामना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करावा लागणार आहे. यासाठीच्या पेरणीकरिता उद्योजकमित्र आणि काही नेत्यांना त्यांनी मदतीची हाक दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला अद्याप दुजोरा मात्र कोणाकडून मिळालेला ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून रणशिंग फुंकल्यानंतर आता दसºयाच्या मुहूर्तावर होणाºया पहिल्याच मेळाव्याची तयारी करताना आर्थिक अडचणींचा सामना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करावा लागणार आहे. यासाठीच्या पेरणीकरिता उद्योजकमित्र आणि काही नेत्यांना त्यांनी मदतीची हाक दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला अद्याप दुजोरा मात्र कोणाकडून मिळालेला नाही.इचलकरंजी येथे होणाºया शेतकरी मेळाव्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. राज्यातील माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, विनय कोरे आदी बड्या नेत्यांसह काही नेत्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्ष चालविण्यासाठी आर्थिक ताकदही असावी लागते. खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस उत्पादकांच्या आर्थिक मदतीवर स्वाभिमानी संघटनेला सक्षम केले होते. प्रारंभीच्या काळात प्रत्येक सभेच्या ठिकाणी आर्थिक मदत मिळण्यासाठी डबे ठेवले जात होते. त्यामध्ये शेतकरी स्वखुशीने पैसे टाकत होते. परंतु आता हे दोघेही शेतकरी नेते एकमेकांपासून दुरावले आहेत. त्यामुळे ‘एक नोट एक वोट’ हा त्यांचा नारा हवेतच विरला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखानदारांनी उसाला चांगला दर दिला आहे, तर आगामी गळीत हंगामासाठी किमान ३२00 ते ३५00 रुपयांपर्यंत उसाला दर मिळणार असल्याने, आता शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाची गरजच नाही. साखरसम्राटांनीच चांगला दर देऊन शेतकरी संघटनेला थोपविण्याचा प्रयत्न केला आहे.एकेकाळी शेट्टी-खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीसाठी रयतेकडूनच पैसा गोळा केला. अलीकडच्या राजकारणात नेत्यांना गर्दी खेचण्यासाठी पैशाचा मोठा वापर करावा लागतो. काही ठिकाणी तर पैसे देऊन लोकांना सभा, मेळाव्याला आणावे लागते. हे तंत्र अनेकांनी अवलंबिले आणि पदरात यश घेतले.पक्ष, संघटना चालवण्यासाठी पैशाची गरज भासते. यापूर्वीही अनेक पक्ष, संघटनांना आर्थिक बळ न मिळाल्याने ते पक्ष आणि संघटना प्रभावी काम करु शकले नाहीत.सदाभाऊंनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेचा पहिलाच शेतकरी मेळावा दसºयाच्या मुहूर्तावर इचलकरंजी येथे होत आहे. या मेळाव्याला ३0 हजारहून अधिक शेतकरी जमविण्याचा निर्धार मंत्री खोत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाळवा-शिराळ्यातून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना नेण्यासाठी त्यांनी काही उद्योजक आणि राजकीय नेत्यांना मदतीची साद घातल्याचे समजते.मेळाव्यातील घोषणेकडे सर्वांचे लक्षइचलकरंजी मेळाव्यात, मीच ठरवेन तो ऊसदर, अशी घोषणा केली आहे. या घोषणेचे भवितव्य काय आणि त्यानंतरची सदाभाऊंची नेमकी वाटचाल कशी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ३० सप्टेंबररोजी रयत क्रांती संघटनेचा मेळावा घेण्यात येत आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यावेळी ते कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.