शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘रयत क्रांती’च्या पेरणीला अर्थचिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:30 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून रणशिंग फुंकल्यानंतर आता दसºयाच्या मुहूर्तावर होणाºया पहिल्याच मेळाव्याची तयारी करताना आर्थिक अडचणींचा सामना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करावा लागणार आहे. यासाठीच्या पेरणीकरिता उद्योजकमित्र आणि काही नेत्यांना त्यांनी मदतीची हाक दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला अद्याप दुजोरा मात्र कोणाकडून मिळालेला ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून रणशिंग फुंकल्यानंतर आता दसºयाच्या मुहूर्तावर होणाºया पहिल्याच मेळाव्याची तयारी करताना आर्थिक अडचणींचा सामना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करावा लागणार आहे. यासाठीच्या पेरणीकरिता उद्योजकमित्र आणि काही नेत्यांना त्यांनी मदतीची हाक दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला अद्याप दुजोरा मात्र कोणाकडून मिळालेला नाही.इचलकरंजी येथे होणाºया शेतकरी मेळाव्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. राज्यातील माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, विनय कोरे आदी बड्या नेत्यांसह काही नेत्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्ष चालविण्यासाठी आर्थिक ताकदही असावी लागते. खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस उत्पादकांच्या आर्थिक मदतीवर स्वाभिमानी संघटनेला सक्षम केले होते. प्रारंभीच्या काळात प्रत्येक सभेच्या ठिकाणी आर्थिक मदत मिळण्यासाठी डबे ठेवले जात होते. त्यामध्ये शेतकरी स्वखुशीने पैसे टाकत होते. परंतु आता हे दोघेही शेतकरी नेते एकमेकांपासून दुरावले आहेत. त्यामुळे ‘एक नोट एक वोट’ हा त्यांचा नारा हवेतच विरला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखानदारांनी उसाला चांगला दर दिला आहे, तर आगामी गळीत हंगामासाठी किमान ३२00 ते ३५00 रुपयांपर्यंत उसाला दर मिळणार असल्याने, आता शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाची गरजच नाही. साखरसम्राटांनीच चांगला दर देऊन शेतकरी संघटनेला थोपविण्याचा प्रयत्न केला आहे.एकेकाळी शेट्टी-खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीसाठी रयतेकडूनच पैसा गोळा केला. अलीकडच्या राजकारणात नेत्यांना गर्दी खेचण्यासाठी पैशाचा मोठा वापर करावा लागतो. काही ठिकाणी तर पैसे देऊन लोकांना सभा, मेळाव्याला आणावे लागते. हे तंत्र अनेकांनी अवलंबिले आणि पदरात यश घेतले.पक्ष, संघटना चालवण्यासाठी पैशाची गरज भासते. यापूर्वीही अनेक पक्ष, संघटनांना आर्थिक बळ न मिळाल्याने ते पक्ष आणि संघटना प्रभावी काम करु शकले नाहीत.सदाभाऊंनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेचा पहिलाच शेतकरी मेळावा दसºयाच्या मुहूर्तावर इचलकरंजी येथे होत आहे. या मेळाव्याला ३0 हजारहून अधिक शेतकरी जमविण्याचा निर्धार मंत्री खोत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाळवा-शिराळ्यातून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना नेण्यासाठी त्यांनी काही उद्योजक आणि राजकीय नेत्यांना मदतीची साद घातल्याचे समजते.मेळाव्यातील घोषणेकडे सर्वांचे लक्षइचलकरंजी मेळाव्यात, मीच ठरवेन तो ऊसदर, अशी घोषणा केली आहे. या घोषणेचे भवितव्य काय आणि त्यानंतरची सदाभाऊंची नेमकी वाटचाल कशी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ३० सप्टेंबररोजी रयत क्रांती संघटनेचा मेळावा घेण्यात येत आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यावेळी ते कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.