शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘रयत क्रांती’च्या पेरणीला अर्थचिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:30 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून रणशिंग फुंकल्यानंतर आता दसºयाच्या मुहूर्तावर होणाºया पहिल्याच मेळाव्याची तयारी करताना आर्थिक अडचणींचा सामना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करावा लागणार आहे. यासाठीच्या पेरणीकरिता उद्योजकमित्र आणि काही नेत्यांना त्यांनी मदतीची हाक दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला अद्याप दुजोरा मात्र कोणाकडून मिळालेला ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून रणशिंग फुंकल्यानंतर आता दसºयाच्या मुहूर्तावर होणाºया पहिल्याच मेळाव्याची तयारी करताना आर्थिक अडचणींचा सामना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करावा लागणार आहे. यासाठीच्या पेरणीकरिता उद्योजकमित्र आणि काही नेत्यांना त्यांनी मदतीची हाक दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला अद्याप दुजोरा मात्र कोणाकडून मिळालेला नाही.इचलकरंजी येथे होणाºया शेतकरी मेळाव्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. राज्यातील माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, विनय कोरे आदी बड्या नेत्यांसह काही नेत्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्ष चालविण्यासाठी आर्थिक ताकदही असावी लागते. खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस उत्पादकांच्या आर्थिक मदतीवर स्वाभिमानी संघटनेला सक्षम केले होते. प्रारंभीच्या काळात प्रत्येक सभेच्या ठिकाणी आर्थिक मदत मिळण्यासाठी डबे ठेवले जात होते. त्यामध्ये शेतकरी स्वखुशीने पैसे टाकत होते. परंतु आता हे दोघेही शेतकरी नेते एकमेकांपासून दुरावले आहेत. त्यामुळे ‘एक नोट एक वोट’ हा त्यांचा नारा हवेतच विरला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखानदारांनी उसाला चांगला दर दिला आहे, तर आगामी गळीत हंगामासाठी किमान ३२00 ते ३५00 रुपयांपर्यंत उसाला दर मिळणार असल्याने, आता शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाची गरजच नाही. साखरसम्राटांनीच चांगला दर देऊन शेतकरी संघटनेला थोपविण्याचा प्रयत्न केला आहे.एकेकाळी शेट्टी-खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीसाठी रयतेकडूनच पैसा गोळा केला. अलीकडच्या राजकारणात नेत्यांना गर्दी खेचण्यासाठी पैशाचा मोठा वापर करावा लागतो. काही ठिकाणी तर पैसे देऊन लोकांना सभा, मेळाव्याला आणावे लागते. हे तंत्र अनेकांनी अवलंबिले आणि पदरात यश घेतले.पक्ष, संघटना चालवण्यासाठी पैशाची गरज भासते. यापूर्वीही अनेक पक्ष, संघटनांना आर्थिक बळ न मिळाल्याने ते पक्ष आणि संघटना प्रभावी काम करु शकले नाहीत.सदाभाऊंनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेचा पहिलाच शेतकरी मेळावा दसºयाच्या मुहूर्तावर इचलकरंजी येथे होत आहे. या मेळाव्याला ३0 हजारहून अधिक शेतकरी जमविण्याचा निर्धार मंत्री खोत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाळवा-शिराळ्यातून मोठ्या प्रमाणात शेतकºयांना नेण्यासाठी त्यांनी काही उद्योजक आणि राजकीय नेत्यांना मदतीची साद घातल्याचे समजते.मेळाव्यातील घोषणेकडे सर्वांचे लक्षइचलकरंजी मेळाव्यात, मीच ठरवेन तो ऊसदर, अशी घोषणा केली आहे. या घोषणेचे भवितव्य काय आणि त्यानंतरची सदाभाऊंची नेमकी वाटचाल कशी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ३० सप्टेंबररोजी रयत क्रांती संघटनेचा मेळावा घेण्यात येत आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यावेळी ते कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.