शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

जिल्ह्यातील ८५ टक्के द्राक्षाचा हंगाम उरकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:40 IST

सांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ८५ टक्के उरकला आहे. निर्यातक्षम द्राक्षाला सुरुवातीला अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र नंतर ...

सांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ८५ टक्के उरकला आहे. निर्यातक्षम द्राक्षाला सुरुवातीला अपेक्षित दर मिळाला नाही. मात्र नंतर चांगला दर मिळाला. स्थानिक बाजारात योग्य दर न मिळाल्यामुळे ३५ हजार एकर क्षेत्रातील शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत.जिल्ह्यात यंदा पाऊसमान कमी झाल्याने टँकरच्या पाण्याने बागा जगविण्यात आल्या. फळछाटणी एकाचवेळी झाली. फळधारणाही चांगली झाली. रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. बाजारात द्राक्षे एकाच वेळी आली. त्यानंतर थंडी आणि पाऊस यामुळे मालाला दक्षिणेतून मागणी वाढली नाही. त्याचा परिणाम दरावर झाला. सुरुवातीला चार किलोची पेटी २५० रुपयांना विकली गेली. नंतर मात्र १५० रुपयांपर्यंत घसरण झाली. द्राक्षाला अपेक्षित दर नसल्याने द्राक्षविक्री करण्याऐवजी बेदाणा तयार करण्याकडे शेतकरी वळले आहेत. बेदाण्यासाठी सुमारे ३५ ते ४० हजार एकर क्षेत्रातील द्राक्षांचा वापर झाला. उत्पादन चांगले झाले असले तरी, दर तुलनेने कमीच राहिला, अशी माहिती बागायतदार महादेव पाटील यांनी दिली. सध्या बेदाण्याला प्रतिकिलोस १९० ते २२५ रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याचेही पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यातील दहा ते पंधरा टक्के द्राक्षाची काढणी शिल्लक आहे. दरात प्रतिकिलोस २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. परंतु जिल्ह्यात द्राक्षे ठेवण्यासाठी शीतगृहांची संख्या कमी आहे. जी शीतगृहे आहेत, त्यामध्ये बेदाणा ठेवला जातो. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदी करून ती शीतगृहात ठेवली आहेत. याचा फायदा थेट व्यापाऱ्यांना होणार आहे. काही शेतकºयांनीही २० ते २५ टनाहून अधिक द्राक्षे शीतगृहात ठेवली आहेत.शीतगृहांची संख्या वाढवा : अभिजित जाधवएकाचवेळी द्राक्षांची काढणी सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत लगेच द्राक्षाचे दर कमी होतात. काहीवेळा अवकाळी पाऊस झाल्यानंतर व्यापारीही द्राक्षांचे दर कमी करून खरेदी करतात. यावर उपाय म्हणजे शासनानेच द्राक्षाची साठवणूक करण्यासाठी शीतगृहे उभा करण्याची गरज आहे. दर नसेल तेव्हा शेतकरी द्राक्षाची छाटणी करून शीतगृहामध्ये ठेवू शकतो, अशी प्रतिक्रिया द्राक्षबागायतदार अभिजित जाधव यांनी दिली.